शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

समृद्धी महामार्गाने शेतकरी होणार समृद्ध !

By admin | Updated: November 4, 2016 06:27 IST

भूसंपादनाच्या मोबदल्यामध्ये भरीव वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी ‘वर्षा’ निवासस्थानी झालेल्या बैठकीत घेण्यात आला

यदु जोशी,

मुंबई- केवळ सहा तासांत उपराजधानी नागपूरहून राजधानी मुंबईला पोहोचविणार असलेल्या समृद्धीच्या महामार्गासाठी (सुपर कम्युनिकेशन एक्स्प्रेस वे) भूसंपादनाच्या मोबदल्यामध्ये भरीव वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी ‘वर्षा’ निवासस्थानी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयांचा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. या महामार्गासाठी कोरडवाहू (जिरायती) जमीन सरकारने संपादित केल्यास, जमीन मालकाला पूर्वीच्या फॉर्म्युल्यानुसार एकरी २० हजार रुपयांचे वार्षिक अनुदान दहा वर्षांपर्यंत दिले जायचे होते. आता ही रक्कम ३० हजार रुपये करण्यात येणार आहे. बागायती शेतीसाठी एकरी ३० हजार रुपये दिले जात होते. आता एकरी ५० हजार रुपये देण्यात येतील.या शिवाय, ऊस वा फळांची लागवड न होणाऱ्या पण जेथे पालेभाज्यांसारखी बागायती पिके घेतली जातात अशा शेतजमिनींसाठी ‘हंगामी बागायती’ हा नवीन घटक तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी एकरी वार्षिक ४० हजार रुपये या प्रमाणे दहा वर्षांपर्यंत थेट प्रकल्पग्रस्तांच्या बँक खात्यात अनुदान जमा करण्यात येणार आहे. या रकमेत दरवर्षी दहा टक्के वाढ करण्याचा आधीचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे. आजच्या बैठकीला उद्योगमंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील, अन्य मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. उरलेल्या तुकड्याचेही संपादनया प्रकल्पासाठीच्या भूसंपादनात एक मोठी अडचण समोर आली. एखाद्या शेतकऱ्याची अडीच एकर जमीन असेल व त्यापैकी पावणेदोन एकरच जमीन संपादित केली जाणार असेल तर उरलेल्या पाऊण एकराचे त्याने काय करायचे, त्याला तेथे धड शेतीही करता येणार नाही, अशी ही अडचण होती. आता त्यावर उपाय काढण्यात आला आहे. आता संपूर्ण जमीन सरकार संपादित करेल आणि त्याचा एकत्रित मोबदला ठरलेल्या सूत्रानुसार देईल.>उच्चशिक्षणाचा खर्च करणार : समृद्धी महामार्गातील प्रकल्पग्रस्तांच्या पाल्यांच्या उच्चशिक्षणाचा खर्च राज्य शासन उचलेल. या महामार्गासाठी लँड पूलिंग आणि जमीन मोजणीचे काम तातडीने सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठकीत दिले.महामार्गासाठी भूसंपादन करताना सामान्य माणसांना विश्वासात घ्या, त्यांच्या शंकांचे निरसन करा, असे त्यांनी बजावले.>संपूर्ण विकसित भूखंड>कोरडवाहू शेतीच्या २५ टक्के इतक्या क्षेत्रफळाचे संपूर्ण विकसित भूखंड नजीक उभ्या राहणाऱ्या समृद्धी वसाहतींमध्ये प्रकल्पग्रस्तांना मालकीहक्काने देण्यात येतील. बागायती शेतीसाठी ३० टक्के विकसित भूखंड देण्यात येतील, हे निर्णय आधीच झालेले आहेत, ते कायम असतील. हंगामी बागायती शेतीचे संपादन करताना बागायतीच्या बरोबरीने म्हणजे ३० टक्के भूखंड दिले जातील.