शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

प्रज्ञासिंह ठाकूरसह समीर कुलकर्णीची याचिका दाखल, मालेगाव २००८ बॉम्बस्फोट प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 01:57 IST

मालेगाव २००८ बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर व समीर कुलकर्णी यांच्या दोषमुक्ततेच्या याचिका उच्च न्यायालयाने सुनावणीसाठी सोमवारी दाखल करून घेतल्या.

मुंबई : मालेगाव २००८ बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर व समीर कुलकर्णी यांच्या दोषमुक्ततेच्या याचिका उच्च न्यायालयाने सुनावणीसाठी सोमवारी दाखल करून घेतल्या.मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी लेफ्टनंट कर्नल श्रीकांत प्रसाद पुरोहित यानेही दोषमुक्ततेसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने यापूर्वी ही याचिका सुनावणीसाठी दाखल करून घेतली आहे. साध्वी व समीरची याचिका दाखल करून घेत न्या. रणजीत मोरे व न्या. अनुजा प्रभुदेसाई यांनी या तिन्ही याचिकांवरील सुनावणी १३ आॅगस्ट रोजी ठेवली आहे.२९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगावमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात सात जणांचा मृत्यू झाला, तर १०० हून अधिक जखमी झाले. ज्या मोटारसायकलमध्ये स्फोटके होती, ती साध्वीच्या मालकीची होती. स्फोटाच्या काही दिवसांपूर्वी तिने ती विकली होती. भोपाळ प्रिंटिंग प्रेसमध्ये काम करणाऱ्या समीर कुलकर्णी याला नोव्हेंबर २००८ मध्ये एटीएसने अटक केली. तो बॉम्बस्फोटाच्या कटात सहभागी असल्याचा आरोप तपास यंत्रणेने केला आहे.दरम्यान, २७ डिसेंबर २०१७ रोजी विशेष एनआयए न्यायालयाने बॉम्बस्फोटाप्रकरणी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल श्रीकांत प्रसाद पुरोहित, रमेश उपाध्याय, अजय राहिरकर यांची मकोकातून सुटका केली. मात्र बेकायदा कृत्ये (प्रतिबंध) कायद्यातील काही कलम व भारतीय दंड संहितेतील काही कलमांतर्गत सर्वांवर खटला चालणार आहे.

टॅग्स :Courtन्यायालय