शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

भ्रष्ट मंत्र्यांच्या चौकशीवरून गदारोळ

By admin | Updated: July 26, 2016 02:29 IST

राज्यातील भ्रष्ट मंत्र्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच क्लीन चिट दिली असली तरी विरोधकांनी केलेल्या आरोपांचे एकाही मंत्र्याला खंडन करता आले नाही. त्यामुळे जोपर्यंत

मुंबई : राज्यातील भ्रष्ट मंत्र्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच क्लीन चिट दिली असली तरी विरोधकांनी केलेल्या आरोपांचे एकाही मंत्र्याला खंडन करता आले नाही. त्यामुळे जोपर्यंत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अथवा उच्च न्यायालयाच्या न्यायधीशांमार्फत मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराची चौकशी होत नाही तोपर्यंत सभागृहाचे कामकाज चालू देणार नसल्याचे सांगत विरोधकांनी विधान परिषदेचे कामकाज रोखून धरले. विरोधकांच्या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज सुरुवातीला दोनदा आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असून काही प्रकरणात न्यायालयाने ताशेरे ओढलेले असताना त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही. त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळात काढून टाकावे, अशी मागणी विरोधकांनी केली. या चर्चेला उत्तर देताना सभागृह नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांना आरोप करताना भान ठेवण्याचा सल्ला दिला. वारंवार चुकीचे आरोप केले तर एखादा व्यक्ती आयुष्यातून उठू शकतो. पुराव्यांशिवाय वारंवार होणा-या आरोपांमुळे परिवाराला, मित्रपरिवारालाही नाहक त्रास सोसावा लागतो. त्यामुळे मंत्र्यांवर आरोप करताना कुठे थांबायचे त्याचेही भान विरोधकांनी ठेवावे, असे आवाहन पाटील यांनी केले. (प्रतिनिधी)‘...तर तुमच्या शेतात राबू’ कौशल्य विकासमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी आपल्यावरील आरोप खोडताना माझे या बँकेत खातेदार नाही आणि थकबाकीदारही नाही, असे स्पष्ट केले. माझ्यावरील आरोप हे घरगुती वादातून झाले आहेत. मी कोणाचीही संपत्ती हडप केलेली नाही. माझ्यावरील आरोप सिद्ध झाले तर मी तुमच्या शेतात गडी म्हणून राबायला तयार आहे. नाहीतर तुम्हीही तशीच तयारी ठेवा, असे थेट मराठवाडा स्टाईल आव्हान दिले. ‘तर जगातून निघून जावू’एका नव्या पैशाचाही आपण भ्रष्टाचार केला नाही. काँग्रेस सदस्य शरद रणपिसे यांनी मोठ्या थाटात फायलींचा ढीग आणला होता. पण, तासभर बोलून एकही ठोस मुद्दा मांडता आला नाही. फायलींच्या या डोंगरातून उंदीरही निघाला नाही. माझ्याविरोधातील आरोपात तथ्य आढळल्यास राजकारणातूनच नव्हे जगातून निघून जावू, असे गिरीष बापट म्हणाले.