शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

कसबा बीड-महे धरणाची उंची वाढविण्यात प्रस्ताव ३९ वर्षे अडगळीत

By admin | Updated: May 6, 2014 19:08 IST

पुरपरिस्थितीत ४० गावांचे जनजीवन विस्कळीत : नेत्यांचे दुर्लक्ष

पुरपरिस्थितीत ४० गावांचे जनजीवन विस्कळीत : नेत्यांचे दुर्लक्ष

फोटो - 06एमएपी01
करवीर तालुक्यातील कसबा बीड ते महे दरम्यान भोगावती नदी पात्रातील धरणाची उंची वाढविणे गरजेचे आहे. पूरकाळ हे धरण पाण्यासाठी बुडते.
छाया : महेश पाटील, महे.

शिवराज लोंढे
सावरवाडी : भोगावती नदी पात्रातील कसबा बीड ते महे (ता. करवीर) दरम्यान असलेल्या धरणाची उंची वाढविण्याचा प्रस्ताव तब्बल ३९ वर्षे अडगळीत आहे. धरणांची उंची वाढविण्याचे प्रस्ताव शासनदरबारी धूळ खाऊ लागले आहे.
करवीर तालुक्याच्या पश्चिम भागातील ४० गावांची वाहतूक असणार्‍या कसबा बीड ते महे दरम्यान भोगावती नदी पात्रातील धरणाची उंची कमी असल्यामुळे पावसाळ्यात पुरपरिस्थितीचा तडाखा जनतेला बसतो. पूर काळात तुळशी भोगावती या दोन नद्याचे पाणी या धरणावर येते. परिणामी ग्रामीण वाहतूक ठप्प होते. कोल्हापूर शहराचा पावसाळ्यात संपर्क तुटला जातो. पावसाळा ऋतुमध्ये १५ दिवस ग्रामीण भागातील जनतेचे जनजीवन विस्कळीत होते. हजारो ग्रामीण विद्यार्थ्यांचे पूरपरिस्थितीत उच्च शैक्षणिक नुकसान होते. पुरकाळात नावेतून प्रवास करणे कठीण बनते.
नव्या बदलत्या काळात करवीर पश्चिम भागात अजून दळण वळणाचा प्रश्न ऐरणीवर आहे. राज्य शासनाने २४ एप्रिल १९७३ साली या धरणांची उभारणी केली. त्यावेळी सात लाख रुपये खर्चुन हे धरण उभारले गेले. पण धरणाची मुळातच उंची कमी असल्यामुळे पूरपरिस्थितीत या धरणावर पाणी येते परिणामी ग्रामीण जनजीवन विस्कळीत होते. ३५ गावांची या धरणावरून वाहतूक होत असते.
गेल्या २० वर्षात विविध राजकीय पक्षांच्या नेत्यानी शासकीय निधीतून धरणाची उंची वाढविण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे ग्रामीण जनतेचे पावसाळ्यात हाल होतात. या धरणांच्या उंची वाढविण्याचा प्रस्ताव शासनदरबारी धूळ खात पडला आहे. पुरकाळात कसबा बीड ते महे दरम्यान भोगावती नदी पात्रातून नावे (होडी)द्वारे प्रवास करावा लागतो.
नदीवरील धरणांची उंची कमी असल्यामुळे पावसाळा ऋतुमध्ये ग्रामीण जनजीवन विस्कळीत होत असते. दळणवळणाचा गुंता वाढतच आहे. परिणामी ग्रामीण भागातील शेतीमाल शहरी बाजारात पूरकाळात जाऊ शकत नाही. कसबा बीड ते महे दरम्यान भोगावती नदी पात्रातील धरणाची उंचीी वाढविणे किंवा उड्डाण पूलाची उभारणी करणे ही काळाची गरज झाली आहे. नव्या विकासात्मक बदलाकडे पश्चिम भाग मागे पडू लागल्याची चर्चा मात्र जनतेत सुरू आहे.

पॉईंटर
* धरणांच्या उंची वाढविण्याकडे लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष
* कमी असल्यामुळे पूरकाळात ३५ गावांचे पुरकाळात जनजीवन विस्कळीत होते
* पर्यायी उड्डाण पूलाची उभारणी करणे गरजेचे
* नावेतून प्रवास करणे धोक्याचे
* नव्या बदलत्या काळात करवीर पश्चिम भागाच्या दळणवळणाकडे दुर्लक्ष

प्रतिक्रिया
जनतेतून अनेक वर्षापासून धरणाची उंची वाढविण्याची मागणी होत आहे. मात्र लोकप्रतिनिधीच्या दुर्लक्षपणामुळे काम रेंगाळले गेले. नदीपात्रात पर्यायी उड्डाण पुलाच्या पाठपुराव्यासाठी जनतेची चळपळ उभारणे गरजेचे आहे.
सज्जन पाटील, सामाजिक कार्यकर्ते