शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कसबा बीड-महे धरणाची उंची वाढविण्यात प्रस्ताव ३९ वर्षे अडगळीत

By admin | Updated: May 6, 2014 19:08 IST

पुरपरिस्थितीत ४० गावांचे जनजीवन विस्कळीत : नेत्यांचे दुर्लक्ष

पुरपरिस्थितीत ४० गावांचे जनजीवन विस्कळीत : नेत्यांचे दुर्लक्ष

फोटो - 06एमएपी01
करवीर तालुक्यातील कसबा बीड ते महे दरम्यान भोगावती नदी पात्रातील धरणाची उंची वाढविणे गरजेचे आहे. पूरकाळ हे धरण पाण्यासाठी बुडते.
छाया : महेश पाटील, महे.

शिवराज लोंढे
सावरवाडी : भोगावती नदी पात्रातील कसबा बीड ते महे (ता. करवीर) दरम्यान असलेल्या धरणाची उंची वाढविण्याचा प्रस्ताव तब्बल ३९ वर्षे अडगळीत आहे. धरणांची उंची वाढविण्याचे प्रस्ताव शासनदरबारी धूळ खाऊ लागले आहे.
करवीर तालुक्याच्या पश्चिम भागातील ४० गावांची वाहतूक असणार्‍या कसबा बीड ते महे दरम्यान भोगावती नदी पात्रातील धरणाची उंची कमी असल्यामुळे पावसाळ्यात पुरपरिस्थितीचा तडाखा जनतेला बसतो. पूर काळात तुळशी भोगावती या दोन नद्याचे पाणी या धरणावर येते. परिणामी ग्रामीण वाहतूक ठप्प होते. कोल्हापूर शहराचा पावसाळ्यात संपर्क तुटला जातो. पावसाळा ऋतुमध्ये १५ दिवस ग्रामीण भागातील जनतेचे जनजीवन विस्कळीत होते. हजारो ग्रामीण विद्यार्थ्यांचे पूरपरिस्थितीत उच्च शैक्षणिक नुकसान होते. पुरकाळात नावेतून प्रवास करणे कठीण बनते.
नव्या बदलत्या काळात करवीर पश्चिम भागात अजून दळण वळणाचा प्रश्न ऐरणीवर आहे. राज्य शासनाने २४ एप्रिल १९७३ साली या धरणांची उभारणी केली. त्यावेळी सात लाख रुपये खर्चुन हे धरण उभारले गेले. पण धरणाची मुळातच उंची कमी असल्यामुळे पूरपरिस्थितीत या धरणावर पाणी येते परिणामी ग्रामीण जनजीवन विस्कळीत होते. ३५ गावांची या धरणावरून वाहतूक होत असते.
गेल्या २० वर्षात विविध राजकीय पक्षांच्या नेत्यानी शासकीय निधीतून धरणाची उंची वाढविण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे ग्रामीण जनतेचे पावसाळ्यात हाल होतात. या धरणांच्या उंची वाढविण्याचा प्रस्ताव शासनदरबारी धूळ खात पडला आहे. पुरकाळात कसबा बीड ते महे दरम्यान भोगावती नदी पात्रातून नावे (होडी)द्वारे प्रवास करावा लागतो.
नदीवरील धरणांची उंची कमी असल्यामुळे पावसाळा ऋतुमध्ये ग्रामीण जनजीवन विस्कळीत होत असते. दळणवळणाचा गुंता वाढतच आहे. परिणामी ग्रामीण भागातील शेतीमाल शहरी बाजारात पूरकाळात जाऊ शकत नाही. कसबा बीड ते महे दरम्यान भोगावती नदी पात्रातील धरणाची उंचीी वाढविणे किंवा उड्डाण पूलाची उभारणी करणे ही काळाची गरज झाली आहे. नव्या विकासात्मक बदलाकडे पश्चिम भाग मागे पडू लागल्याची चर्चा मात्र जनतेत सुरू आहे.

पॉईंटर
* धरणांच्या उंची वाढविण्याकडे लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष
* कमी असल्यामुळे पूरकाळात ३५ गावांचे पुरकाळात जनजीवन विस्कळीत होते
* पर्यायी उड्डाण पूलाची उभारणी करणे गरजेचे
* नावेतून प्रवास करणे धोक्याचे
* नव्या बदलत्या काळात करवीर पश्चिम भागाच्या दळणवळणाकडे दुर्लक्ष

प्रतिक्रिया
जनतेतून अनेक वर्षापासून धरणाची उंची वाढविण्याची मागणी होत आहे. मात्र लोकप्रतिनिधीच्या दुर्लक्षपणामुळे काम रेंगाळले गेले. नदीपात्रात पर्यायी उड्डाण पुलाच्या पाठपुराव्यासाठी जनतेची चळपळ उभारणे गरजेचे आहे.
सज्जन पाटील, सामाजिक कार्यकर्ते