शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
4
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
5
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
6
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
7
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
8
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
9
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
10
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
11
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
12
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
13
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
14
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
15
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
16
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
17
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
18
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
19
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
20
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 

मलनिस्सारण योजनेसाठी ६८३ कोटींचा प्रस्ताव

By admin | Updated: March 8, 2016 02:38 IST

कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत दुसऱ्या टप्प्यात भुयारी मलवाहिन्या टाकण्यासाठी पालिका प्रशासनाने ६८३ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार केला आहे.

मुरलीधर भवार,  कल्याणकल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत दुसऱ्या टप्प्यात भुयारी मलवाहिन्या टाकण्यासाठी पालिका प्रशासनाने ६८३ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार केला आहे. अटल मिशन अमृत योजनेअंतर्गत हा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यास लगेचच या कामाला सुरुवात होईल.पालिका हद्दीत ३० वर्षांपूर्वी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने भुयारी गटारे व मलवाहिन्या टाकल्या होत्या. शहरात जवळपास ५० चौरस किलोमीटरच्या मलनिस्सारण वाहिन्या होत्या. त्या १५० ते ६०० मिली मीटर व्यासाच्या होत्या. या मलवाहिन्यावर साडेचार हजार मॅनहोल होते. या जुन्या मलवाहिन्या बदलून नव्या मलवाहिन्या टाकण्यासाठी पालिकेने जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुर्त्थान अभियानांतर्गत (जेएनएनयूआरएम) पहिल्या टप्प्यात केंद्र सरकारला प्रस्ताव सादर केला. त्यास २०१० मध्ये सरकारने मंजुरी दिली. त्यानुसार २०१० पासून मलवाहिन्या टाकणे व मलनिस्सारण सांडपाणी प्रक्रिया केंद्रे उभारण्यास सुरुवात झाली. पालिकेच्या ३० पैकी १८ सेक्टरमध्ये ४० टक्के मलवाहिन्यांचे काम झाले आहे. कल्याण पूर्व व पश्चिम आणि डोंबिवली परिसरात जवळपास ४८ किलोमीटर भुयारी गटार मलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. मलनिस्सारण प्रक्रियेसाठी आठ केंद्रे तयार केली जात आहे. त्यापैकी सात केंद्रांचे काम झाले आहे. तर एकाचे काम सुरू आहे.दुुसऱ्या टप्प्यात पालिकेने केंद्र सरकारकडे प्रकल्प सादर केला होता. त्यास युपीए सरकारने तत्वत: मंजुरी दिली हेती. मात्र पालिकेने बीएसयूपी प्रकल्प पूर्ण करण्यास विलंब केल्याचे कारण देत केंद्राच्या नियोजन समितीने दुसऱ्या टप्प्याला वित्तीय मंजुरी देण्यास नकार दिला. भुयारी मलनिस्सारण प्रकल्पासोबत २४ तास पाणीपुरवठा योजनेलाही रेड सिग्नल मिळाला. त्यामुळे या योजना बारगळल्या. दरम्यानच्या काळात केंद्रात भाजपचे सरकार आले. या सरकारने जेएनएनयूआरएम योजना गुंडाळली. त्याऐवजी अटल मिशन अमृत योजना आणली. त्याअंतर्गत भुयारी मलनिस्सारणाच्या दुसऱ्या टप्प्याला मंजुरी मिळविण्यासाठी पालिकेने ६८३ कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला आहे. ते हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवतील.