शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
3
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
4
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
5
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
6
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
7
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
8
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
9
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
10
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
11
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
12
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
13
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
14
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
15
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
16
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला
17
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
18
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
19
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
20
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय

लेखी परीक्षेतील २० टक्के गुणांचा प्रस्ताव लालफितीत

By admin | Updated: December 1, 2015 03:25 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी- बारावीच्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला लेखी परीक्षेतील एकूण गुणांपैकी २० टक्के गुण मिळवावे लागतील

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी- बारावीच्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला लेखी परीक्षेतील एकूण गुणांपैकी २० टक्के गुण मिळवावे लागतील, असे मंडळातर्फे जाहीर करण्यात आले असले तरी शासनाने अद्याप त्यावर शिक्कामोर्तब केलेले नाही. उपरोक्त निर्णयाची अंमलबजावणी चालू शैक्षणिक वर्षापासून होणार का?, याबाबत विद्यार्थ्यांसह मंडळाच्या अधिकाऱ्यांमध्येही संभ्रम आहे. राज्य मंडळातर्फे ८०/२० ‘पॅटर्न’नुसार दहावी-बारावीच्या परीक्षा घेतल्या जातात. विद्यार्थ्यांना ८० गुणांच्या लेखी परीक्षेत आणि २० गुणांच्या तोंडी परीक्षेत मिळालेल्या एकत्रित गुणांच्या आधारे उत्तीर्ण केले जाते. मात्र, शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांना तोंडी परीक्षेसाठी सढळपणे २० पैकी २० गुण दिले जातात. त्याचप्रमाणे अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना मंडळाकडून ग्रेस गुणांची सवलत दिली जाते. परिणामी लेखी परीक्षेतील ८० गुणांपैकी ५ किंवा १० गुण मिळविणारे विद्यार्थीही दहावी- बारावीच्या परीक्षेत सहज उत्तीर्ण होतात. मागील वर्षी दहावीच्या परीक्षेत केवळ ग्रेस गुणांचा आधार घेवून पावणे तीन लाखांहून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. लेखी परीक्षेत ५ ते १० गुण मिळविणारे विद्यार्थी उत्तीर्ण होत असल्याचे राज्य मंडळाच्याही लक्षात आले होते. शैक्षणिक गुणवत्तेच्या दृष्टीने ही बाब योग्य नसल्यानेच राज्य मंडळाने लेखी परीक्षेत २० टक्के गुण मिळविण्याचे बंधन घातले. विज्ञान शाखेच्या काही विषयांच्या परीक्षा ७०/३० गुणांच्या आधारे घेतल्या जातात. या विषयांनाही हाच निकष लागू राहील,असे मंडळाने जाहीर केले होते. मात्र, सत्ताबदल झाल्यामुळे राज्य मंडळाने नव्या सरकारकडे याबाबतचा प्रस्ताव पुन्हा एकदा मंजुरीसाठी सादर केला. परंतु, लालफितीच्या कारभारामुळे हा प्रस्ताव शासन दरबारी पडून आहे. (प्रतिनिधी)