शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
6
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
7
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
8
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
11
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
12
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
13
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
14
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
15
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
16
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
17
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
18
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
19
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
20
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

लेखी परीक्षेतील २० टक्के गुणांचा प्रस्ताव लालफितीत

By admin | Updated: December 1, 2015 03:25 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी- बारावीच्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला लेखी परीक्षेतील एकूण गुणांपैकी २० टक्के गुण मिळवावे लागतील

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी- बारावीच्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला लेखी परीक्षेतील एकूण गुणांपैकी २० टक्के गुण मिळवावे लागतील, असे मंडळातर्फे जाहीर करण्यात आले असले तरी शासनाने अद्याप त्यावर शिक्कामोर्तब केलेले नाही. उपरोक्त निर्णयाची अंमलबजावणी चालू शैक्षणिक वर्षापासून होणार का?, याबाबत विद्यार्थ्यांसह मंडळाच्या अधिकाऱ्यांमध्येही संभ्रम आहे. राज्य मंडळातर्फे ८०/२० ‘पॅटर्न’नुसार दहावी-बारावीच्या परीक्षा घेतल्या जातात. विद्यार्थ्यांना ८० गुणांच्या लेखी परीक्षेत आणि २० गुणांच्या तोंडी परीक्षेत मिळालेल्या एकत्रित गुणांच्या आधारे उत्तीर्ण केले जाते. मात्र, शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांना तोंडी परीक्षेसाठी सढळपणे २० पैकी २० गुण दिले जातात. त्याचप्रमाणे अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना मंडळाकडून ग्रेस गुणांची सवलत दिली जाते. परिणामी लेखी परीक्षेतील ८० गुणांपैकी ५ किंवा १० गुण मिळविणारे विद्यार्थीही दहावी- बारावीच्या परीक्षेत सहज उत्तीर्ण होतात. मागील वर्षी दहावीच्या परीक्षेत केवळ ग्रेस गुणांचा आधार घेवून पावणे तीन लाखांहून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. लेखी परीक्षेत ५ ते १० गुण मिळविणारे विद्यार्थी उत्तीर्ण होत असल्याचे राज्य मंडळाच्याही लक्षात आले होते. शैक्षणिक गुणवत्तेच्या दृष्टीने ही बाब योग्य नसल्यानेच राज्य मंडळाने लेखी परीक्षेत २० टक्के गुण मिळविण्याचे बंधन घातले. विज्ञान शाखेच्या काही विषयांच्या परीक्षा ७०/३० गुणांच्या आधारे घेतल्या जातात. या विषयांनाही हाच निकष लागू राहील,असे मंडळाने जाहीर केले होते. मात्र, सत्ताबदल झाल्यामुळे राज्य मंडळाने नव्या सरकारकडे याबाबतचा प्रस्ताव पुन्हा एकदा मंजुरीसाठी सादर केला. परंतु, लालफितीच्या कारभारामुळे हा प्रस्ताव शासन दरबारी पडून आहे. (प्रतिनिधी)