शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

लेखी परीक्षेतील २० टक्के गुणांचा प्रस्ताव लालफितीत

By admin | Updated: December 1, 2015 03:25 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी- बारावीच्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला लेखी परीक्षेतील एकूण गुणांपैकी २० टक्के गुण मिळवावे लागतील

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी- बारावीच्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला लेखी परीक्षेतील एकूण गुणांपैकी २० टक्के गुण मिळवावे लागतील, असे मंडळातर्फे जाहीर करण्यात आले असले तरी शासनाने अद्याप त्यावर शिक्कामोर्तब केलेले नाही. उपरोक्त निर्णयाची अंमलबजावणी चालू शैक्षणिक वर्षापासून होणार का?, याबाबत विद्यार्थ्यांसह मंडळाच्या अधिकाऱ्यांमध्येही संभ्रम आहे. राज्य मंडळातर्फे ८०/२० ‘पॅटर्न’नुसार दहावी-बारावीच्या परीक्षा घेतल्या जातात. विद्यार्थ्यांना ८० गुणांच्या लेखी परीक्षेत आणि २० गुणांच्या तोंडी परीक्षेत मिळालेल्या एकत्रित गुणांच्या आधारे उत्तीर्ण केले जाते. मात्र, शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांना तोंडी परीक्षेसाठी सढळपणे २० पैकी २० गुण दिले जातात. त्याचप्रमाणे अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना मंडळाकडून ग्रेस गुणांची सवलत दिली जाते. परिणामी लेखी परीक्षेतील ८० गुणांपैकी ५ किंवा १० गुण मिळविणारे विद्यार्थीही दहावी- बारावीच्या परीक्षेत सहज उत्तीर्ण होतात. मागील वर्षी दहावीच्या परीक्षेत केवळ ग्रेस गुणांचा आधार घेवून पावणे तीन लाखांहून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. लेखी परीक्षेत ५ ते १० गुण मिळविणारे विद्यार्थी उत्तीर्ण होत असल्याचे राज्य मंडळाच्याही लक्षात आले होते. शैक्षणिक गुणवत्तेच्या दृष्टीने ही बाब योग्य नसल्यानेच राज्य मंडळाने लेखी परीक्षेत २० टक्के गुण मिळविण्याचे बंधन घातले. विज्ञान शाखेच्या काही विषयांच्या परीक्षा ७०/३० गुणांच्या आधारे घेतल्या जातात. या विषयांनाही हाच निकष लागू राहील,असे मंडळाने जाहीर केले होते. मात्र, सत्ताबदल झाल्यामुळे राज्य मंडळाने नव्या सरकारकडे याबाबतचा प्रस्ताव पुन्हा एकदा मंजुरीसाठी सादर केला. परंतु, लालफितीच्या कारभारामुळे हा प्रस्ताव शासन दरबारी पडून आहे. (प्रतिनिधी)