शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
7
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
8
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
9
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
10
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
11
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
12
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
13
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
14
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
15
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
16
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
17
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
18
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
19
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
20
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!

प्रचाराला चढला वेग

By admin | Updated: November 5, 2016 03:48 IST

डोंबिवलीत होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या रिंगणातील उमेदवारांच्या प्रचाराने वेग घेतला आहे.

जान्हवी मोर्ये,

डोंबिवली- डोंबिवलीत होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या रिंगणातील उमेदवारांच्या प्रचाराने वेग घेतला आहे. अक्षयकुमार काळे, प्रवीण दवणे यांनी मतदारांशी संपर्क पूर्ण झाला असून प्रत्यक्ष गाठीभेटीही घेतल्याचे नमूद केले आहे. जयप्रकाश घुमटकर यांनी आयोजक संस्थेची मते मिळण्याचा दावा केला असून दौरे सुरू असल्याचे सांगितले. मदन कुलकर्णी यांचा मतदारांशी फोनवरून संपर्क झाला आहे. ते ५ नोव्हेंबरपासून प्रचाराठी फिरणार आहेत. चारही उमेदवारांना निवडून येण्याची खात्री आहे.मतदारांचा प्रतिसाद उत्साहवर्धक असला, तरी प्रत्यक्षात किती मते मिळतील त्याचा अद्याप नेमका अंदाज बांधता येत नसल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे. साहित्यिक मतदार हा सूज्ञ असल्याने तो चांगल्याचीच निवड करेल, अशीही उमेदवारांची भूमिका आहे. >प्रत्यक्ष संवादावर भर : प्रविण दवणेमी मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा या ठिकाणी जाऊन मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधला आहे. प्रत्येक मतदाराने मला सांगितले, माझी पुस्तके त्यांनी वाचलेली आहेत. माझ्या पुस्तकांचे संच त्यांच्याकडे आहे, असा अनुभव प्रवीण दवणे यांनी सांगितला. माझे विद्यार्थी गावोगावी पसरलेले आहेत. त्यांनी मला हमी दिली आह,े ते आनंदाने माझा प्रचार करतील. मतदार हा सुजाण व अभिरुचीसंपन्न असल्याने उमेदवाराचे मूल्यमापन करुन ते मतदान करतील. प्रत्येक मतदाराशी मी शंभर टक्के संवाद साधला आहे. माझी गीते व पुस्तके आधीच त्यांच्यापर्यंत पोहचलेली असल्याने मला अधिक बोलण्याची गरज नाही. सध्याचा काळ प्रयत्नाने पुढे जाण्याचा असल्याने कोण विजयी होईल, याचा निश्चित अंदाज बांधता येत नाही. जय-पराजयाचा आनंदाने स्वीकार करु. मिळणारा प्रतिसाद उत्तम आहे, असेही त्यांनी सांगितले. >सर्व ठिकाणचा प्रचार पूर्ण : काळे सर्व ठिकाणी माझा प्रचार पूर्ण झाला आहे. परवाच त्यांचे हैदराबाद येथे व्याख्यान झाले, असे अक्षयकुमार काळे यांनी सांगितले. मतदारांची अपेक्षा आणि अध्यक्षपदाची भूमिका ही वेगळी असू शकत नाही. आत्तापर्यंत मला १०४ साहित्यिकांचा पाठिंबा मिळाला आहे. मला मिळणारा प्रतिसाद अभूतपूर्व आहे. त्यामुळे मी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत १०० टक्के निवडून येईन, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.>माझे पारडे जड : घुमटकरअन्य उमेदवारांपेक्षा माझे पारडे जड असल्याचा आणि आयोजक संस्थेची सर्व मते मलाच मिळतील, असा दावा जयप्रकाश घुमटकर यांनी केला. नाशिक, धुळ््याचा दौरा केला आहे. रावसाहेब पवार, रावसाहेब कसबे यांचा मला पाठिंबा आहे. ३५० पेक्षा जास्त मतदारांशी माझा संवाद झाला आहे. त्यांच्या थेट गाठीभेटी घेतल्या आहेत. त्यामुळे माझा विजय निश्चित आहे, असा दावा त्यांनी केला. >प्रत्यक्ष गाठीभेटींना सुरूवात : कुलकर्णी माझ्या कामाची माहिती मी प्रत्येक मतदाराला पाठविली आहे. प्रत्येकाशी फोनद्वारे संवाद साधला.भेटीगाठींसाठी शनिवारपासून बाहेर पडणार आहे. १५ नोव्हेंबरला डोंबिवलीत येणार आहे. भेटीगाठींआधी ३५० पेक्षा जास्त जणांना मोबाइलवरुन मेसेज पाठविले आहेत, असे मदन कुलकर्णी यांनी सांगितले. ही निवडणूक संक्रमण मतपद्धतीने होत असल्याने नेमके कोण जिंकून येईल याचा अंदाज बांधता येत नाही. मी एक तटस्थ साहित्यिक असल्याने निवडणुकीआधीच विजयाचा दावा करणे मला योग्य वाटत नाही. भेटीगाठीनंतर चित्र पालटू शकते. नागपूरचे साहित्य कला विकास मंडळ, साहित्य विहार, पद्मगंधा साहित्य संस्था, अभिव्यक्ती वैदर्भीय लेखिका संस्था, रसिकराज सांस्कृतिक बहुउद्देशीय संस्थांनी मला पाठिंबा दिल्याचे त्यांनी सांगितले.