शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
3
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
4
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
5
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
6
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
7
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
8
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
9
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
10
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
11
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
12
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
13
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
14
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
15
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
16
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
17
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
18
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
19
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
20
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले

मूल्यवर्धित शेतीसाठी प्रोत्साहन

By admin | Updated: September 23, 2014 04:49 IST

महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पातंर्गत राज्यात मनुष्यबळ विकासावर भर देण्यात येत असून, फळ काढणी पश्चात तंत्रज्ञान व मूल्यवर्धीत शेतीसाठी

अकोला : महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पातंर्गत राज्यात मनुष्यबळ विकासावर भर देण्यात येत असून, फळ काढणी पश्चात तंत्रज्ञान व मूल्यवर्धीत शेतीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. या उपक्रमांतर्गत पश्चिम विदर्भातील शेकडो शेतकऱ्यांनी प्रशिक्षण घेवून, विविध प्रक्रिया उद्योगही सुरू केले आहेत.मनुष्यबळ विकास कार्यक्रमांतर्गत कृषी व फळकाढणी पश्चात प्रशिक्षणाचे ४७ भाग तयार केले आहेत. कौशल्य वृद्धीच्या या प्रशिक्षणासाठी कृषी विज्ञान केंद्राचे सहकार्य घेतले जात आहे. तीन ते सात दिवसांच्या या प्रशिक्षणासाठी २० प्रशिक्षणार्थींच्या एका बॅचकरीता या प्रकल्पातंर्गत ५० हजार रू पयांची तरतूद करण्यात आली आहे. या माध्यमातून राज्यात दहा हजार ग्रामीण महिला, युवक व शेतकरी गटांच्या सदस्यांमधून प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्यात येत आहे. पश्चिम विदर्भात पाचशेच्यावर शेतकऱ्यांना असे प्रशिक्षण देण्यात आले आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमातंर्गत सोयाबीनपासून विविध प्रक्रिया उत्पादनांची निर्मीती आणि विक्री, मक्यावर आधारित लघू उद्योग, लिंबूवर्गीय फळ पिकांची काढणी व पश्चात व्यवस्थापन, कापूस पिकाची वेचणी व काढणीनंतरच्या विविध कामांचे व्यवस्थापन, लिंबूवर्गीय फळांवर आधारित प्रक्रिया उद्योग, डाळ गिरणी व डाळीच्या पिठाची गीरणी,भात प्रक्रिया उद्योग, परदेशी भाजीपाला उत्पादन आणि विक्री, व्यावसायिकदृष्ट्या दुर्लक्षित फळांचे प्रक्रियेच्या माध्यमातून मूल्यवर्धन, चटणी, लोणची गृह उद्योग, फळे भाजीपाला सुकवून हवाबंद डब्यात साठविणे तसेच गोठविण्याचा व्यवसाय, पारंपारिक मसाला पिकांची काढणी, हाताळणी साठवण व विक्री व्यवस्था, आंबा प्रकिया उद्योग, ऊसापासून रस, गुळ आणि काकवीचे उत्पादन व विक्री, केळी प्रक्रिया उद्योग, हरितगृह तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन, दुध प्रक्रिया उद्योग, टोमॅटो, बटाटा व मिरची प्रक्रिया उद्योग, पुष्परचना आणि पुष्प सजावट व्यवसाय, काजू प्रक्रिया उद्योग, शेतमालाची सुरक्षित वाहतूक व्यवस्था आदीचे प्रशिक्षण शेतकरी, बचत गटांना देण्यात येत आहे. (प्रतिनिधी)