शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
5
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
6
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
7
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
8
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
9
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
10
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
11
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
12
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
13
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
14
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
15
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
16
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
17
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
18
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
20
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार

मूल्यवर्धित शेतीसाठी प्रोत्साहन

By admin | Updated: September 23, 2014 04:49 IST

महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पातंर्गत राज्यात मनुष्यबळ विकासावर भर देण्यात येत असून, फळ काढणी पश्चात तंत्रज्ञान व मूल्यवर्धीत शेतीसाठी

अकोला : महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पातंर्गत राज्यात मनुष्यबळ विकासावर भर देण्यात येत असून, फळ काढणी पश्चात तंत्रज्ञान व मूल्यवर्धीत शेतीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. या उपक्रमांतर्गत पश्चिम विदर्भातील शेकडो शेतकऱ्यांनी प्रशिक्षण घेवून, विविध प्रक्रिया उद्योगही सुरू केले आहेत.मनुष्यबळ विकास कार्यक्रमांतर्गत कृषी व फळकाढणी पश्चात प्रशिक्षणाचे ४७ भाग तयार केले आहेत. कौशल्य वृद्धीच्या या प्रशिक्षणासाठी कृषी विज्ञान केंद्राचे सहकार्य घेतले जात आहे. तीन ते सात दिवसांच्या या प्रशिक्षणासाठी २० प्रशिक्षणार्थींच्या एका बॅचकरीता या प्रकल्पातंर्गत ५० हजार रू पयांची तरतूद करण्यात आली आहे. या माध्यमातून राज्यात दहा हजार ग्रामीण महिला, युवक व शेतकरी गटांच्या सदस्यांमधून प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्यात येत आहे. पश्चिम विदर्भात पाचशेच्यावर शेतकऱ्यांना असे प्रशिक्षण देण्यात आले आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमातंर्गत सोयाबीनपासून विविध प्रक्रिया उत्पादनांची निर्मीती आणि विक्री, मक्यावर आधारित लघू उद्योग, लिंबूवर्गीय फळ पिकांची काढणी व पश्चात व्यवस्थापन, कापूस पिकाची वेचणी व काढणीनंतरच्या विविध कामांचे व्यवस्थापन, लिंबूवर्गीय फळांवर आधारित प्रक्रिया उद्योग, डाळ गिरणी व डाळीच्या पिठाची गीरणी,भात प्रक्रिया उद्योग, परदेशी भाजीपाला उत्पादन आणि विक्री, व्यावसायिकदृष्ट्या दुर्लक्षित फळांचे प्रक्रियेच्या माध्यमातून मूल्यवर्धन, चटणी, लोणची गृह उद्योग, फळे भाजीपाला सुकवून हवाबंद डब्यात साठविणे तसेच गोठविण्याचा व्यवसाय, पारंपारिक मसाला पिकांची काढणी, हाताळणी साठवण व विक्री व्यवस्था, आंबा प्रकिया उद्योग, ऊसापासून रस, गुळ आणि काकवीचे उत्पादन व विक्री, केळी प्रक्रिया उद्योग, हरितगृह तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन, दुध प्रक्रिया उद्योग, टोमॅटो, बटाटा व मिरची प्रक्रिया उद्योग, पुष्परचना आणि पुष्प सजावट व्यवसाय, काजू प्रक्रिया उद्योग, शेतमालाची सुरक्षित वाहतूक व्यवस्था आदीचे प्रशिक्षण शेतकरी, बचत गटांना देण्यात येत आहे. (प्रतिनिधी)