शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

बांबू व्यवसायाला प्रोत्साहन देणार

By admin | Updated: December 20, 2014 01:48 IST

राज्यातील बांबू व्यवसायाला उभारी देण्यासाठी हरतऱ्हेने प्रयत्न करण्यात येतील. याअंतर्गत खाजगी जमिनीवर बांबू लागवड करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येईल

नागपूर : राज्यातील बांबू व्यवसायाला उभारी देण्यासाठी हरतऱ्हेने प्रयत्न करण्यात येतील. याअंतर्गत खाजगी जमिनीवर बांबू लागवड करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येईल अशी माहिती राज्य शासनातर्फे देण्यात आली. अनिल सोले व नागो गाणार यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. यावर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लेखी उत्तरात ही माहिती दिली.बांबू व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन बांबू धोरण जाहीर करण्यात आले आहे. खाजगी जमिनीवरील बांबूस वाहतूक पासच्या बंधनातून मुक्त करणे, बांबू क्षेत्रातील उद्योजकांना ई-लिलाव पद्धतीने पारदर्शकरीत्या बांबू पुरवठा करणे तसेच बांबू लागवड व औद्योगिक वापरासाठी प्रशिक्षण केंद्राची स्थापना करणे यांचा समावेश असल्याचे उत्तरात नमूद करण्यात आले.ठाणे, पालघर जिल्ह्यात तीन महिन्यात १५६ बालमृत्यूएप्रिल ते जून २०१४ या कालावधीत ठाणे व पालघर जिल्ह्यामध्ये १५६ बालमृत्यू झाल्याची माहिती राज्य शासनातर्फे देण्यात आली. निरंजन डावखरे यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. यावर लेखी उत्तरात महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी ही माहिती दिली.हे सर्व बालमृत्यू कुपोषणामुळे नव्हे तर इतर आजारांमुळे झाले आहेत. या दोन्ही जिल्ह्यांत तीव्र कमी वजनाची १३ हजार ५१४, मध्यम कमी वजनाची ५६ हजार ७४६ बालके आढळून आली होती. परंतु आरोग्य यंत्रणेच्या विस्कळीत कामकाजामुळे त्यांना कुपोषित म्हणता येणार नसल्याचे या लेखी उत्तरात नमूद करण्यात आले आहे.वनक्षेत्रांवरील अतिक्रमण तीन महिन्यात हटविणारऔरंगाबाद वनविभागांतर्गत औरंगाबाद व जालना या दोन जिल्ह्यांमधील वनक्षेत्रावर झालेले अतिक्रमण येत्या तीन महिन्यात हटविण्यात येईल अशी ग्वाही वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. जयंत पाटील यांनी यासंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.या दोन्ही जिल्ह्यांमध्ये एप्रिल २०१४ अखेर असलेल्या १०७ हेक्टर ३३ आर वनक्षेत्रातील अतिक्रमणापैकी ६१.१८ हेक्टर क्षेत्रावरील अतिक्रमण हटविण्यात आले आहे. सतेच ११.५० हेक्टर अतिक्रमित क्षेत्राची दोन प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. उर्वरित २६.६५ हेक्टर क्षेत्रावरील अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही सुरू असून येत्या तीन महिन्यात ही अतिक्रमणे पूर्णपणे हटविण्यात येतील अशी माहिती मुनगंटीवार यांनी दिली.तिवरांच्या जंगलांवर बेकायदा भरावमुंबईतील मालाड येथील मार्वे समुद्रकिनाऱ्याजवळील टॅबच्या पार्किंगशेजारी असलेल्या तिवरांच्या जंगलात बेकायदा भराव टाकून घरे बांधण्यात आल्याची माहिती राज्य शासनाने दिली आहे. यासंदर्भात विजय गिरकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावर लेखी उत्तरात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली. या क्षेत्रावर भरावापूर्वी तिवराचे जंगल असल्याचे गुगल इमेजवरून लक्षात आले. यासंदर्भात पश्चिम मुंबईच्या वनक्षेत्रपालांनी बोरीवलीच्या तहसीलदारांना अहवाल पाठवला असू यावर नियमांप्रमाणे कार्यवाही करण्यात येत आहे असे लेखी उत्तरात नमूद करण्यात आले. (प्रतिनिधी)