शहरं
Join us  
Trending Stories
1
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
2
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
3
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
4
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
5
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
6
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
7
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
8
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
9
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
10
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
11
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
12
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
13
"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा
14
प्रीतीचा 'मोहरा' विमानातून उतरला जयपूरमध्ये अन् त्याचं लगेज पोहचलं बंगळुरुला; मग भाऊनं असा काढला राग
15
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प
16
'लापता लेडीज'च्या 'फूल'ची कान्समध्ये एन्ट्री, नितांशीच्या वेणीमध्ये 'या' ८ अभिनेत्रींचे फोटो
17
"मराठी मुलांनी आता उत्तर प्रदेशात जाऊन नोकऱ्या करायच्या का?"; शरद पवार गटाचा संतप्त सवाल
18
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
19
सोशल मीडियावर ट्रेंड होतंय #BoycottSitaareZameenPar, नेमकं कारण काय?
20
दिलजीत दोसांझची 'नो एन्ट्री २' मधून एक्झिट! 'या' कारणामुळे दिला नकार; नेटकरी खूश

आघाडीचा निर्णय लांबणीवर

By admin | Updated: January 20, 2017 04:14 IST

मागील निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी आघाडी करुन निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला होता.

उल्हासनगर : मागील निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी आघाडी करुन निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला होता. या निवडणुकीतही आघाडी व्हावी ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे. मात्र ओमी कलानींच्या निर्णयाभोवती राष्ट्रवादी गुरफटल्याने आघाडीची बोलणी लांबणीवर पडली आहे. ओमी टीमच्या हट्टामुळे आघाडीची बोलणीही रखडली आहे. ओमी कलानींचा भाजपा प्रवेश टळला तर राष्ट्रवादी ओमी टीमला घेऊन स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाणार असून काँग्रेसलाही स्वबळावरच लढावे लागणार आहे. त्या अनुषंगाने काँग्रेसने उमेदवारांची तयारीही सुरु केली आहे. निवडणुकीची रणधुमाळी सुरु झालेली असली तरी पक्षांतराचा निर्णय अद्यापही गुलदस्त्यातच आहे. ओमी कलानी भाजपाच्या संपर्कात असल्याचे दिसत असले तरी भाजपाने अद्याप त्यांना हिरवा कंदील न दाखविल्याने ओमी टीम ही राष्ट्रवादीच्या झेंड्याखाली शहरभर प्रचाराचे काम करत आहेत. ओमींचा निर्णय होत नसल्याने राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या आघाडीचा निर्णयही लांबणीवर पडला आहे. ओमी टीमला काँग्रेससोबत निवडणूक लढविण्यात रस नसल्याचे स्पष्ट असले तरी काँग्रेसने आघाडीचा धर्म म्हणून राष्ट्रवादीकडे आघाडीचा प्रस्ताव ठेवला आहे. तर दुसरीकडे ओमीच्या हट्टामुळे राष्ट्रवादीचे नेतेही आघाडीच्या बोलणीसाठी पुढे सरकत नसल्याचे चित्र आहे. ओमींचा भाजपा प्रवेश टळावा ही इच्छा राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची आहे. ओमी टीमने शहरात चांगला दबदबा निर्माण केल्याने ओमी ज्या पक्षात राहतील त्याला सत्तेची गणिते सोपी होणार आहे. भाजपाने ओमीचा स्वीकार केल्यास उल्हासनगरमध्ये राष्ट्रवादी ही नावापुरती राहणार हे निश्चित. अशा पडतीच्या काळात राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्रित येणे शक्य होणार आहे. ओमी टीमला काँग्रेसची अ‍ॅलर्जी असल्याने नवीन समीकरणे जुळविण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारीही काँग्रेसने ठेवली आहे. >चांगले उमेदवार दिल्यास मतदार पक्षासोबतचकाँग्रेसच्या नगरसेवकांचा आकडा जरी कमी असला तरी काँग्रेसच्या विचारांना मानणारा मोठा वर्ग उल्हासनगरमध्ये आहे. मतदारांसमोर चांगले उमेदवार दिल्यास मतदार काँग्रेस पक्षासोबत राहतील असा आमचा ठाम विश्वास आहे. काँग्रेस पक्ष या निवडणुकीत कुठेच कमी पडणार नाही. मतदारांपुढे एक पर्याय म्हणून ठामपणे काँग्रेसचे उमेदवार जातील.- निलेश पेंढारी, प्रभारी- उल्हासनगर ओमी भाजपात गेल्यास राष्ट्रवादीला उमेदवार मिळणे अवघड जाणार आहे. ही नामुष्की टाळण्यासाठी राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील नेत्यांनी उल्हासनगरवर लक्ष केंद्रीत केले आहे. राष्ट्रवादीचे सर्व गणित हे कलानी कुटुंबियांभोवती रेंगाळत आहे. तर काँग्रेसचे सर्व गणित हे इतर पक्षातील नाराज उमेदवारांभोेवती फिरत आहे.