शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवसाचे दिग्दर्शक झालात तर...; अक्षय कुमारच्या प्रश्नावर CM फडणवीसांचं दमदार उत्तर, टाळ्यांचा कडकडाट
2
"मला निवडणूक लढवण्याची इच्छा"; मैथिली ठाकूरने सांगितली दोन मतदारसंघांची नावे
3
'या' एका निर्णयाने फिरलं वातावरण! ग्राहक जोडणीत BSNL ने Airtel ला टाकले मागे; जिओची काय स्थिती?
4
Cough Syrup : "पप्पा, घरी जाऊया...", कफ सिरपमुळे मुलीने गमावला जीव; १६ डायलिसिस, २२ दिवस मृत्यूशी झुंज
5
धक्कादायक! विरारमध्ये दोन विद्यार्थ्यांची १२ व्या मजल्यावरून उडी; दोघांचाही मृत्यू
6
“गेम करण्याएवढी ताकद नाही, आम्ही भांडी घासायला बसलोय का”; ओबीसी नेत्यांचे जरांगेंना उत्तर
7
म्हणे, कसलाही पश्चात्ताप नाही... दैवी शक्तीनं सांगितलं!; सरन्यायाधीश हल्ला प्रकरणात 'त्या' वकिलाचं विधान
8
VIDEO: रस्त्याखाली काम, रस्त्यावर 'जॅम'! मेट्रो सुरू झाली, पण कार अजूनही ट्रॅफिकमध्येच; वरळी नाक्याजवळची कोंडी कधी फुटणार?
9
Video - राईड संपल्यानंतर 'ती' रॅपिडोवाल्याशी भिडली, पैसे मागताच डोळ्यात फेकली मिरची फूड
10
१५ राण्या, ३० मुलं अन् १०० नोकरांसह दुबईला पोहोचला 'या' देशाचा राजा; शेख पाहत राहिले...
11
जबरदस्त फिचर! नंबरशिवाय तुमचे WhatsApp काम करेल, लवकरच अपडेट होणार
12
Australia Squad Against India : टीम इंडियाच्या २ कॅप्टनसमोर ऑस्ट्रेलियाकडून मार्श दाखवणार ताकद
13
सगळ्याच मर्यादा ओलांडल्या! १८ वर्षांच्या जावयाशी लग्न करणार होती सासू; मंगळसूत्र घालण्याआधीच मुलीची एंट्री झाली अन्.. 
14
‘मविआ’सोबत न घेण्याच्या हर्षवर्धन सपकाळांचा निर्णय, मनसेची पहिली प्रतिक्रिया; नेते म्हणाले...
15
चालत्या कारच्या छतावर जोडप्याचे खुल्लम खुल्ला प्रेम, व्हिडिओ व्हायरल झाल्याने लोकांमध्ये संतापाची लाट
16
आज नवान्न पौर्णिमा: अन्नपूर्णेच्या कृपेने धन-संपत्तीप्राप्तीसाठी आज 'हा' विधी चुकवू नका!
17
Lifelesson: प्रेमानंद महाराजांच्या 'या' ३ सूचना, तुमच्या मनाला उभारी देतील हे नक्की!
18
"धर्मांतरणासाठी सुरू होती परदेशी फंडिंग...", छांगूर बाबाविरोधातील चार्जशीटमध्ये ATS चे मोठे दावे!
19
Cough Syrup : भयंकर! कफ सिरपमध्ये शाई, पेंटमधील केमिकलचा वापर? मुलांच्या औषधामागचं 'विषारी' सत्य
20
GST कपातीनंतर ₹८ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये येतील अनेक भारी कार्स, खरेदीचा विचार करत असाल तर पाहा यादी

आघाडीचा निर्णय लांबणीवर

By admin | Updated: January 20, 2017 04:14 IST

मागील निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी आघाडी करुन निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला होता.

उल्हासनगर : मागील निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी आघाडी करुन निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला होता. या निवडणुकीतही आघाडी व्हावी ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे. मात्र ओमी कलानींच्या निर्णयाभोवती राष्ट्रवादी गुरफटल्याने आघाडीची बोलणी लांबणीवर पडली आहे. ओमी टीमच्या हट्टामुळे आघाडीची बोलणीही रखडली आहे. ओमी कलानींचा भाजपा प्रवेश टळला तर राष्ट्रवादी ओमी टीमला घेऊन स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाणार असून काँग्रेसलाही स्वबळावरच लढावे लागणार आहे. त्या अनुषंगाने काँग्रेसने उमेदवारांची तयारीही सुरु केली आहे. निवडणुकीची रणधुमाळी सुरु झालेली असली तरी पक्षांतराचा निर्णय अद्यापही गुलदस्त्यातच आहे. ओमी कलानी भाजपाच्या संपर्कात असल्याचे दिसत असले तरी भाजपाने अद्याप त्यांना हिरवा कंदील न दाखविल्याने ओमी टीम ही राष्ट्रवादीच्या झेंड्याखाली शहरभर प्रचाराचे काम करत आहेत. ओमींचा निर्णय होत नसल्याने राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या आघाडीचा निर्णयही लांबणीवर पडला आहे. ओमी टीमला काँग्रेससोबत निवडणूक लढविण्यात रस नसल्याचे स्पष्ट असले तरी काँग्रेसने आघाडीचा धर्म म्हणून राष्ट्रवादीकडे आघाडीचा प्रस्ताव ठेवला आहे. तर दुसरीकडे ओमीच्या हट्टामुळे राष्ट्रवादीचे नेतेही आघाडीच्या बोलणीसाठी पुढे सरकत नसल्याचे चित्र आहे. ओमींचा भाजपा प्रवेश टळावा ही इच्छा राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची आहे. ओमी टीमने शहरात चांगला दबदबा निर्माण केल्याने ओमी ज्या पक्षात राहतील त्याला सत्तेची गणिते सोपी होणार आहे. भाजपाने ओमीचा स्वीकार केल्यास उल्हासनगरमध्ये राष्ट्रवादी ही नावापुरती राहणार हे निश्चित. अशा पडतीच्या काळात राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्रित येणे शक्य होणार आहे. ओमी टीमला काँग्रेसची अ‍ॅलर्जी असल्याने नवीन समीकरणे जुळविण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारीही काँग्रेसने ठेवली आहे. >चांगले उमेदवार दिल्यास मतदार पक्षासोबतचकाँग्रेसच्या नगरसेवकांचा आकडा जरी कमी असला तरी काँग्रेसच्या विचारांना मानणारा मोठा वर्ग उल्हासनगरमध्ये आहे. मतदारांसमोर चांगले उमेदवार दिल्यास मतदार काँग्रेस पक्षासोबत राहतील असा आमचा ठाम विश्वास आहे. काँग्रेस पक्ष या निवडणुकीत कुठेच कमी पडणार नाही. मतदारांपुढे एक पर्याय म्हणून ठामपणे काँग्रेसचे उमेदवार जातील.- निलेश पेंढारी, प्रभारी- उल्हासनगर ओमी भाजपात गेल्यास राष्ट्रवादीला उमेदवार मिळणे अवघड जाणार आहे. ही नामुष्की टाळण्यासाठी राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील नेत्यांनी उल्हासनगरवर लक्ष केंद्रीत केले आहे. राष्ट्रवादीचे सर्व गणित हे कलानी कुटुंबियांभोवती रेंगाळत आहे. तर काँग्रेसचे सर्व गणित हे इतर पक्षातील नाराज उमेदवारांभोेवती फिरत आहे.