शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

आघाडीचा निर्णय लांबणीवर

By admin | Updated: January 20, 2017 04:14 IST

मागील निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी आघाडी करुन निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला होता.

उल्हासनगर : मागील निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी आघाडी करुन निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला होता. या निवडणुकीतही आघाडी व्हावी ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे. मात्र ओमी कलानींच्या निर्णयाभोवती राष्ट्रवादी गुरफटल्याने आघाडीची बोलणी लांबणीवर पडली आहे. ओमी टीमच्या हट्टामुळे आघाडीची बोलणीही रखडली आहे. ओमी कलानींचा भाजपा प्रवेश टळला तर राष्ट्रवादी ओमी टीमला घेऊन स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाणार असून काँग्रेसलाही स्वबळावरच लढावे लागणार आहे. त्या अनुषंगाने काँग्रेसने उमेदवारांची तयारीही सुरु केली आहे. निवडणुकीची रणधुमाळी सुरु झालेली असली तरी पक्षांतराचा निर्णय अद्यापही गुलदस्त्यातच आहे. ओमी कलानी भाजपाच्या संपर्कात असल्याचे दिसत असले तरी भाजपाने अद्याप त्यांना हिरवा कंदील न दाखविल्याने ओमी टीम ही राष्ट्रवादीच्या झेंड्याखाली शहरभर प्रचाराचे काम करत आहेत. ओमींचा निर्णय होत नसल्याने राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या आघाडीचा निर्णयही लांबणीवर पडला आहे. ओमी टीमला काँग्रेससोबत निवडणूक लढविण्यात रस नसल्याचे स्पष्ट असले तरी काँग्रेसने आघाडीचा धर्म म्हणून राष्ट्रवादीकडे आघाडीचा प्रस्ताव ठेवला आहे. तर दुसरीकडे ओमीच्या हट्टामुळे राष्ट्रवादीचे नेतेही आघाडीच्या बोलणीसाठी पुढे सरकत नसल्याचे चित्र आहे. ओमींचा भाजपा प्रवेश टळावा ही इच्छा राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची आहे. ओमी टीमने शहरात चांगला दबदबा निर्माण केल्याने ओमी ज्या पक्षात राहतील त्याला सत्तेची गणिते सोपी होणार आहे. भाजपाने ओमीचा स्वीकार केल्यास उल्हासनगरमध्ये राष्ट्रवादी ही नावापुरती राहणार हे निश्चित. अशा पडतीच्या काळात राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्रित येणे शक्य होणार आहे. ओमी टीमला काँग्रेसची अ‍ॅलर्जी असल्याने नवीन समीकरणे जुळविण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारीही काँग्रेसने ठेवली आहे. >चांगले उमेदवार दिल्यास मतदार पक्षासोबतचकाँग्रेसच्या नगरसेवकांचा आकडा जरी कमी असला तरी काँग्रेसच्या विचारांना मानणारा मोठा वर्ग उल्हासनगरमध्ये आहे. मतदारांसमोर चांगले उमेदवार दिल्यास मतदार काँग्रेस पक्षासोबत राहतील असा आमचा ठाम विश्वास आहे. काँग्रेस पक्ष या निवडणुकीत कुठेच कमी पडणार नाही. मतदारांपुढे एक पर्याय म्हणून ठामपणे काँग्रेसचे उमेदवार जातील.- निलेश पेंढारी, प्रभारी- उल्हासनगर ओमी भाजपात गेल्यास राष्ट्रवादीला उमेदवार मिळणे अवघड जाणार आहे. ही नामुष्की टाळण्यासाठी राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील नेत्यांनी उल्हासनगरवर लक्ष केंद्रीत केले आहे. राष्ट्रवादीचे सर्व गणित हे कलानी कुटुंबियांभोवती रेंगाळत आहे. तर काँग्रेसचे सर्व गणित हे इतर पक्षातील नाराज उमेदवारांभोेवती फिरत आहे.