शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
5
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
6
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
7
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
8
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
9
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
10
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
11
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

प्रकल्पग्रस्तांचा आंदोलनाचा इशारा

By admin | Updated: August 25, 2016 02:50 IST

प्रशासकीय स्तरावरून झालेल्या चुकांचे विपरीत परिणाम मात्र महामार्ग प्रकल्पग्रस्त आणि प्रवाशांना भोगावे लागत आहेत.

अलिबाग : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे २००८ पासून पळस्पे-इंदापूर दरम्यानच्या ८४ किलोमीटरच्या पहिल्या टप्प्याच्या सहापदरीकरणाची प्रक्रिया सुरू असताना प्रशासकीय स्तरावरून झालेल्या चुकांचे विपरीत परिणाम मात्र महामार्ग प्रकल्पग्रस्त आणि प्रवाशांना भोगावे लागत आहेत. गेल्या १६ वर्षांतील शासकीय स्तरावरील बेफिकिरीला कंटाळून तसेच प्रलंबित समस्यांच्या अंतिम निवारणाच्या मागणीकरिता सोमवारी २९ आॅगस्टपासून पेण उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती पळस्पा-इंदापूर राष्ट्रीय महामार्ग क्र.१७ रुंदीकरण प्रकल्पग्रस्त कृती समितीचे समन्वयक संतोष ठाकूर यांनी दिली आहे. या आंदोलनाची कल्पना देणारे लेखी निवेदन गेल्या १९ आॅगस्ट रोजी रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले असल्याचेही ठाकूर यांनी सांगितले. गोवा राष्ट्रीय महामार्गावर २००६पासून वाढलेल्या अपघातांचे प्रमाण लक्षात घेऊन रायगडमधील पत्रकारांनी आंदोलने करून रुंदीकरणाची मागणी केली. त्यांच्या या मागणीस मंजुरीही मिळाली परंतु तद्नंतर भूसंपादन कार्यालय, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि भूमी अभिलेख कार्यालयाने तत्परता न दाखविल्यामुळे आजतागायत हा महामार्ग मृत्यूचा मार्ग बनला असल्याचे निवेदनात नमूद आहे. गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या प्रक्रियेत नियंत्रकाची भूमिका निभावणारे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक, कार्यकारी अभियंता आणि गुणवत्ता तपासणी अधिकाऱ्यांनी सुप्रीम रोड बिल्डर आणि महावीर रोड इन्फ्राप्रोजेक्ट या ठेकेदारांच्या कामावर लक्ष दिले नसल्याने २००८ ते आॅगस्ट २०१६ या ८ वर्षे ८ महिन्यात ८४ कि. मी. पैकी फक्त २० कि .मी. चे काम पूर्ण झाले आहे. ही माहिती महामार्ग प्राधिकरण कार्यालयातून माहितीच्या अधिकारात दिली आहे. >बेमुदत धरणे आंदोलनाच्या प्रमुख मागण्या : गणेशोत्सवापूर्वी पळस्पे-इंदापूर दरम्यानचा महामार्ग खड्डेमुक्त करण्यात यावा, महामार्गाच्या दुरवस्थेमुळे अपघातांमध्ये त्यांचा कोणताही दोष नसताना जीव गमवावा लागला आहे.याला जबाबदार असलेले ठेकेदार सुप्रीम इन्फ्राप्रोजेक्ट आणि महावीर रोड बिल्डर या ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, ठेकेदारांवर नियंत्रण ठेवणारे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक, कार्यकारी अभियंता आणि संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करावी.>प्रकल्पग्रस्तांपैकी अनेकांना शासकीय मोबदला नाहीगोवा राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणासाठी राहते घर आणि पिकती जमीन देणाऱ्या प्रकल्पग्रस्तांवर आणि महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर मात्र वारंवार अन्याय होत आहे. प्रकल्पग्रस्तांपैकी अनेकांना आजतागायत मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे अशा त्रस्त शेतकऱ्यांनी २९ आॅगस्टपासून पेण उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याबाबत लेखी कळविले असून, प्रकल्पग्रस्तांच्या अांदोलनाला आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या प्रमुख वैशाली पाटील, खार-डोंगर मेहनत आघाडीचे प्रमुख अरुण शिवकर, श्रमिक क्रांती संघटनेच्या प्रमुख अ‍ॅड.सुरेखा दळवी यांच्यासह पेण व रायगड प्रेसक्लब या संघटनांनी पाठिंबा दिला आहे.>84 किलोमीटरच्या पहिल्या टप्प्याच्या सहापदरीकरणाची प्रक्रि या सुरू असताना प्रशासकीय स्तरावरून झालेल्या चुकांचे विपरीत परिणाम महामार्ग प्रकल्पग्रस्त आणि प्रवाशांना भोगावे लागत आहे. 2008 ते आॅगस्ट २०१६ या ८ वर्षे ८ महिन्यात ठेकेदाराने कामावर लक्ष न दिल्याने ८४ किलोमीटरपैकी फक्त २० किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे.