शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

प्रकल्पग्रस्तांचा आंदोलनाचा इशारा

By admin | Updated: August 25, 2016 02:50 IST

प्रशासकीय स्तरावरून झालेल्या चुकांचे विपरीत परिणाम मात्र महामार्ग प्रकल्पग्रस्त आणि प्रवाशांना भोगावे लागत आहेत.

अलिबाग : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे २००८ पासून पळस्पे-इंदापूर दरम्यानच्या ८४ किलोमीटरच्या पहिल्या टप्प्याच्या सहापदरीकरणाची प्रक्रिया सुरू असताना प्रशासकीय स्तरावरून झालेल्या चुकांचे विपरीत परिणाम मात्र महामार्ग प्रकल्पग्रस्त आणि प्रवाशांना भोगावे लागत आहेत. गेल्या १६ वर्षांतील शासकीय स्तरावरील बेफिकिरीला कंटाळून तसेच प्रलंबित समस्यांच्या अंतिम निवारणाच्या मागणीकरिता सोमवारी २९ आॅगस्टपासून पेण उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती पळस्पा-इंदापूर राष्ट्रीय महामार्ग क्र.१७ रुंदीकरण प्रकल्पग्रस्त कृती समितीचे समन्वयक संतोष ठाकूर यांनी दिली आहे. या आंदोलनाची कल्पना देणारे लेखी निवेदन गेल्या १९ आॅगस्ट रोजी रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले असल्याचेही ठाकूर यांनी सांगितले. गोवा राष्ट्रीय महामार्गावर २००६पासून वाढलेल्या अपघातांचे प्रमाण लक्षात घेऊन रायगडमधील पत्रकारांनी आंदोलने करून रुंदीकरणाची मागणी केली. त्यांच्या या मागणीस मंजुरीही मिळाली परंतु तद्नंतर भूसंपादन कार्यालय, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि भूमी अभिलेख कार्यालयाने तत्परता न दाखविल्यामुळे आजतागायत हा महामार्ग मृत्यूचा मार्ग बनला असल्याचे निवेदनात नमूद आहे. गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या प्रक्रियेत नियंत्रकाची भूमिका निभावणारे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक, कार्यकारी अभियंता आणि गुणवत्ता तपासणी अधिकाऱ्यांनी सुप्रीम रोड बिल्डर आणि महावीर रोड इन्फ्राप्रोजेक्ट या ठेकेदारांच्या कामावर लक्ष दिले नसल्याने २००८ ते आॅगस्ट २०१६ या ८ वर्षे ८ महिन्यात ८४ कि. मी. पैकी फक्त २० कि .मी. चे काम पूर्ण झाले आहे. ही माहिती महामार्ग प्राधिकरण कार्यालयातून माहितीच्या अधिकारात दिली आहे. >बेमुदत धरणे आंदोलनाच्या प्रमुख मागण्या : गणेशोत्सवापूर्वी पळस्पे-इंदापूर दरम्यानचा महामार्ग खड्डेमुक्त करण्यात यावा, महामार्गाच्या दुरवस्थेमुळे अपघातांमध्ये त्यांचा कोणताही दोष नसताना जीव गमवावा लागला आहे.याला जबाबदार असलेले ठेकेदार सुप्रीम इन्फ्राप्रोजेक्ट आणि महावीर रोड बिल्डर या ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, ठेकेदारांवर नियंत्रण ठेवणारे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक, कार्यकारी अभियंता आणि संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करावी.>प्रकल्पग्रस्तांपैकी अनेकांना शासकीय मोबदला नाहीगोवा राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणासाठी राहते घर आणि पिकती जमीन देणाऱ्या प्रकल्पग्रस्तांवर आणि महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर मात्र वारंवार अन्याय होत आहे. प्रकल्पग्रस्तांपैकी अनेकांना आजतागायत मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे अशा त्रस्त शेतकऱ्यांनी २९ आॅगस्टपासून पेण उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याबाबत लेखी कळविले असून, प्रकल्पग्रस्तांच्या अांदोलनाला आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या प्रमुख वैशाली पाटील, खार-डोंगर मेहनत आघाडीचे प्रमुख अरुण शिवकर, श्रमिक क्रांती संघटनेच्या प्रमुख अ‍ॅड.सुरेखा दळवी यांच्यासह पेण व रायगड प्रेसक्लब या संघटनांनी पाठिंबा दिला आहे.>84 किलोमीटरच्या पहिल्या टप्प्याच्या सहापदरीकरणाची प्रक्रि या सुरू असताना प्रशासकीय स्तरावरून झालेल्या चुकांचे विपरीत परिणाम महामार्ग प्रकल्पग्रस्त आणि प्रवाशांना भोगावे लागत आहे. 2008 ते आॅगस्ट २०१६ या ८ वर्षे ८ महिन्यात ठेकेदाराने कामावर लक्ष न दिल्याने ८४ किलोमीटरपैकी फक्त २० किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे.