शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange: '...तोपर्यंत मुंबई सोडणार नाही', नोटीसनंतर मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा
2
आंदोलनात बेकायदेशीर कृत्ये, लवकरात लवकर मैदान रिकामं करा; मनोज जरांगेंना पाठवलेल्या पोलिसांच्या नोटीसमध्ये काय?
3
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: आंदोलन सुरूच राहणार, सर्व मागण्या पूर्ण झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही: मनोज जरांगे
4
Punjab Flood: अर्धा पंजाब पाण्यात! १३०० गावांना पुराचा वेढा, हजारो लोक बेघर; २९ जणांचा मृत्यू
5
Maharashtra Rain: राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
6
गणेशोत्सव साजरा करत नाही आलिया? ट्रोल झाल्यानंतर दिलं सडेतोड उत्तर; फोटो शेअर करत म्हणाली...
7
अनंत चतुर्दशी २०२५: गणेशोत्सवाची सांगता; पाहा, मान्यता, २०२६ मध्ये कधी येणार गणपती बाप्पा?
8
Mitchell Starc T20I Retirement : आगामी टी-२० वर्ल्ड कप आधी स्टार गोलंदाजाने घेतला निवृत्तीचा निर्णय; जाणून घ्या त्यामागचं कारण
9
४ राजयोगात परिवर्तिनी एकादशी: ९ राशींचे कल्याण-भरभराट, सुबत्ता-शुभ-लाभ; धनलक्ष्मी प्रसन्न!
10
'ही' आंतरराष्ट्रीय बँक भारतातून गाशा गुंडाळण्याच्या तयारीत? ग्राहकांच्या पैशांचं काय होणार?
11
Mumbai: मुंबईत मोठी वाहतूक कोंडी; कार्यालय गाठता गाठता नोकरदारांच्या नाकीनऊ!
12
तुम्हाला कन्नड येते का? मुख्यमंत्र्यांच्या प्रश्नावर राष्ट्रपतींचे चोख प्रत्युत्तर; म्हणाल्या,'प्रत्येकाने आपली भाषा...'
13
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मसुदा तयार, लवकरच निर्णय!
14
१५ राज्ये, अनेक बँका अन् ओटीपीशिवाय खात्यातून काढले २९ कोटी; ६ आरोपींचे हादरवणारे कृत्य
15
लेख: मतभेद पुसून न टाकता ऐक्य साधता येईल काय?
16
हेमा मालिनी यांनी विकले मुंबईतील दोन आलिशान फ्लॅट्स, १२.५ कोटींची कमाई अन् आता...
17
Raigad Accident: रायगडमध्ये रिक्षाला अपघात, ब्रेक फेल झाल्याने दिशादर्शकाला धडक, तीन ठार
18
Sudan Landslide: अख्खं गावचं गिळलं, १००० लोकांचा मृत्यू, फक्त एक मुलगा वाचला! सुदानमध्ये भुस्खलनाचा प्रकोप
19
आजचे राशीभविष्य, ०२ सप्टेंबर २०२५: प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल, स्वकियांशीच खटके उडतील
20
आजचा अग्रलेख: अमेरिका विरुद्ध सर्व? ट्रम्प यांच्या दादागिरीला उत्तर देण्यासाठी अनेक देश एकत्र

राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी

By admin | Updated: December 1, 2014 00:47 IST

८० च्या दशकात शेतकरी संघटनेच्या ज्या आंदोलनामुळे राजकीय पुढाऱ्यांच्या उरात धडकी भरली होती त्या राजकीय पुढाऱ्यांना ‘गावबंदी’ आंदोलनाची घोषणा संघटनेचे नेते शरद जोशी यांनी येथे पुन्हा करून

शरद जोशींची घोषणा: आंदोलनाचा पुढचा टप्पा जाहीरनागपूर : ८० च्या दशकात शेतकरी संघटनेच्या ज्या आंदोलनामुळे राजकीय पुढाऱ्यांच्या उरात धडकी भरली होती त्या राजकीय पुढाऱ्यांना ‘गावबंदी’ आंदोलनाची घोषणा संघटनेचे नेते शरद जोशी यांनी येथे पुन्हा करून शेतकरी संघटना पुढच्या काळात आक्रमक होणार असल्याचे संकेत दिले.शेतकरी संघटनेच्या ठिय्या आंदोलनात सहभागी झालेल्या हजारो शेतकऱ्यांपुढे जोशी यांनी आज आंदोलनाचा पुढचा टप्पा जाहीर केला. शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत आहेत. त्यांना आंदोलनासाठी मुंबई-दिल्ली-पुणे येथे जाणे शक्य नाही. त्यांना ते परवडतही नाही. त्यामुळे आपल्या गावात राहूनच पुढाऱ्यांना गावबंदी करा, त्यातून भाजप, सेना, काँग्रेस, राष्ट्रवादीसह एकाही प्रमुख राजकीय पक्षाच्या नेत्यांना वगळू नका, असे जोशी यांनी निक्षून सांगितले. ८० च्या दशकात शेतकरी संघटनेच्या याच आंदोलनामुळे तेव्हाच्या सत्ताधाऱ्यांचे धाबे दणाणले होते. अनेक केंद्रीय मंत्र्यांना त्याचा फटका बसला होता. या आंदोलनाची माहिती कार्यकर्त्यांना आहे. त्यामुळे तेच आंदोलन नव्या जोमाने करण्याचे आवाहन जोशी यांनी केले. ‘गावबंदी’च्या जुन्याच अस्त्राद्वारे नव्या सरकारला घेरण्याचा प्रयत्न संघटनेने सुुरू केला आहे. मोदींनी शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावेसंपूर्ण देशातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेश दौरे करून काही देशांना आर्थिक मदतही करीत आहे. त्याऐवजी त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देऊन त्यांना मदत करावी, असे जोशी यांनी आंदोलनापूर्वी पत्रकारांशी बोलताना सांगितले. राज्यात सरकार येऊन एक महिना झाला. या काळात सरकारने अनेक निर्णय घेतले. त्याचप्रमाणे शेतमालाच्या भावासंदर्भात निर्णय घ्यावा. अल्पमतातील सरकार केव्हाही कोसळू शकते. त्याआधी त्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्यास पुढच्या निवडणुकीत शेतकरी त्यांना मतदान करणार नाही, असे जोशी म्हणाले.(प्रतिनिधी)