शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
3
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
4
सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
5
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
6
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
7
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
8
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
9
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
10
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
11
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
12
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
13
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
14
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
15
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
16
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
17
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
18
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
19
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
20
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार

राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी

By admin | Updated: December 1, 2014 00:47 IST

८० च्या दशकात शेतकरी संघटनेच्या ज्या आंदोलनामुळे राजकीय पुढाऱ्यांच्या उरात धडकी भरली होती त्या राजकीय पुढाऱ्यांना ‘गावबंदी’ आंदोलनाची घोषणा संघटनेचे नेते शरद जोशी यांनी येथे पुन्हा करून

शरद जोशींची घोषणा: आंदोलनाचा पुढचा टप्पा जाहीरनागपूर : ८० च्या दशकात शेतकरी संघटनेच्या ज्या आंदोलनामुळे राजकीय पुढाऱ्यांच्या उरात धडकी भरली होती त्या राजकीय पुढाऱ्यांना ‘गावबंदी’ आंदोलनाची घोषणा संघटनेचे नेते शरद जोशी यांनी येथे पुन्हा करून शेतकरी संघटना पुढच्या काळात आक्रमक होणार असल्याचे संकेत दिले.शेतकरी संघटनेच्या ठिय्या आंदोलनात सहभागी झालेल्या हजारो शेतकऱ्यांपुढे जोशी यांनी आज आंदोलनाचा पुढचा टप्पा जाहीर केला. शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत आहेत. त्यांना आंदोलनासाठी मुंबई-दिल्ली-पुणे येथे जाणे शक्य नाही. त्यांना ते परवडतही नाही. त्यामुळे आपल्या गावात राहूनच पुढाऱ्यांना गावबंदी करा, त्यातून भाजप, सेना, काँग्रेस, राष्ट्रवादीसह एकाही प्रमुख राजकीय पक्षाच्या नेत्यांना वगळू नका, असे जोशी यांनी निक्षून सांगितले. ८० च्या दशकात शेतकरी संघटनेच्या याच आंदोलनामुळे तेव्हाच्या सत्ताधाऱ्यांचे धाबे दणाणले होते. अनेक केंद्रीय मंत्र्यांना त्याचा फटका बसला होता. या आंदोलनाची माहिती कार्यकर्त्यांना आहे. त्यामुळे तेच आंदोलन नव्या जोमाने करण्याचे आवाहन जोशी यांनी केले. ‘गावबंदी’च्या जुन्याच अस्त्राद्वारे नव्या सरकारला घेरण्याचा प्रयत्न संघटनेने सुुरू केला आहे. मोदींनी शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावेसंपूर्ण देशातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेश दौरे करून काही देशांना आर्थिक मदतही करीत आहे. त्याऐवजी त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देऊन त्यांना मदत करावी, असे जोशी यांनी आंदोलनापूर्वी पत्रकारांशी बोलताना सांगितले. राज्यात सरकार येऊन एक महिना झाला. या काळात सरकारने अनेक निर्णय घेतले. त्याचप्रमाणे शेतमालाच्या भावासंदर्भात निर्णय घ्यावा. अल्पमतातील सरकार केव्हाही कोसळू शकते. त्याआधी त्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्यास पुढच्या निवडणुकीत शेतकरी त्यांना मतदान करणार नाही, असे जोशी म्हणाले.(प्रतिनिधी)