शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

महामुक्काम मोर्चा स्थगित

By admin | Updated: March 31, 2016 00:52 IST

दोन दिवसांपासून नाशिक येथे शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सुरू असलेले किसान सभेचे महामुक्काम आंदोलन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर तात्पुरते स्थगित करण्यात आल्याची

नाशिक : दोन दिवसांपासून नाशिक येथे शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सुरू असलेले किसान सभेचे महामुक्काम आंदोलन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर तात्पुरते स्थगित करण्यात आल्याची माहिती डॉ. अशोक ढवळे, आ. जे. पी. गावित, किसन गुजर व डॉ. अजित नवले यांनी बुधवारी रात्री पत्रकार परिषदेत दिली.बुधवारी विधान भवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी किसान सभेच्या नेत्यांची तासभर चर्चा झाली. त्यात महामुक्काम मोर्चात सहभागी झालेल्या राज्यभरातील एक लाख शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांवर चर्चा झाली. शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करण्यासाठी केंद्र सरकारची मदत घेण्यात येईल. त्यानंतर कर्ज माफ करण्यात येईल. वनजमिनी दाव्यांचा तीन महिन्यांत पुन्हा फेरआढावा घेण्यात येईल. शेतीमालाला ५० टक्के नफा धरून भाव देण्यासाठी व तसा आधारभूत भाव ठरविण्यासाठी पीकनिहाय प्रस्ताव तयार करून केंद्र सरकारकडे पाठविण्यात येईल. देवस्थान गायरान जमिनी, वरकस जमिनी कसणाऱ्यांचे जिल्हावार सर्वेक्षण करून जमिनी त्यांच्या नावे करण्यासाठी कार्यवाही करू, दुष्काळी भागात संपूर्ण वीजबिल मुक्त करण्यात येईल. तसेच बिगर दुष्काळी भागात ३० टक्के बिल माफ करण्यात येईल. दुष्काळी भागात रोहयोची कामे, वेळेवर वेतन, पाणी, चारा, रेशन, जनावरांना छावण्या आदी मागण्या पूर्ण करण्यात येतील. विधानसभा अधिवेशनानंतर या सर्व प्रश्नांवर पुन्हा एकदा किसान सभेच्या नेत्यांबरोबर चर्चा करण्यात येईल, अशी आश्वासने फडणवीस यांनी दिली. त्यांनी महामुक्काम सत्याग्रह मागे घेण्याची विनंती केल्याने हा सत्याग्रह तात्पुरता स्थगित करण्याचा निर्णय किसान सभेने घेतल्याचे नेत्यांनी सांगितले. माजी आ. नरसय्या आडाम, उद्धव पौळ, यशवंत झाडे, उमेश देशमुख, बारक्या मागांत यांच्यासह डॉ. ढवळे, गावित, गुजर, डॉ. नवले मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेत सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)