शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
6
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
7
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
8
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
9
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
10
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
11
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
12
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
13
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
14
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
15
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
16
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
17
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
18
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
19
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
20
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 

दादरीचा संघाकडून निषेध

By admin | Updated: October 20, 2015 00:20 IST

संपूर्ण देशाला हादरविणाऱ्या दादरी येथील धर्मांधांनी केलेल्या हत्येचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून निषेध करण्यात आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना कडक शिक्षा देण्यात यावी,

नागपूर : संपूर्ण देशाला हादरविणाऱ्या दादरी येथील धर्मांधांनी केलेल्या हत्येचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून निषेध करण्यात आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना कडक शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी संघाकडून करण्यात आली आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, गोहत्या प्रकरणातील वादग्रस्त लेखामुळे वादात भर टाकणारे ‘पांचजन्य’ साप्ताहिक हे आपले मुखपत्रच नसल्याचा दावा संघातर्फे करण्यात आला आहे.दादरी येथे गोमांस खाल्ल्याच्या अफवेवरून मोहम्मद इकलाख या व्यक्तीची हत्या झाली व देशात एका नव्या वादाला तोंड फुटले. त्यातच ‘गोहत्या करणे हे पाप आहे आणि असे पाप करणाऱ्यांची हत्याच केली पाहिजे,’ असे वेदांमध्ये सांगण्यात आले असल्याचे नमूद करून ‘पांचजन्य’ या संघाच्या मुखपत्राने या वादात आणखी भर घातली. परंतु हा लेख प्रसिद्ध होताच संघावर सर्व स्तरांतून टीका होऊ लागली. त्यानंतर लगेच संघाने सारवासारव करण्याची भूमिका घेतली.दादरी घटनेला संघाचे समर्थन होते, हे सर्व दावे कपोलकल्पित आहेत. संघाने हिंसेचे समर्थन केलेले नाही. चौकशी व्हायला हवी व दोषींना कडक शिक्षा व्हायला हवी, अशी संघाची भूमिका असल्याचे मत संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख डॉ. मनमोहन वैद्य यांनी व्यक्त केले आहे. शिवाय ‘पांचजन्य’ व ‘आॅर्गनायझर’ ही साप्ताहिके संघाची मुखपत्रे नाहीत. संघाचे अधिकृत पदाधिकारीच संघाकडून भाष्य करतात, असेदेखील त्यांनी स्पष्ट केले.