शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
2
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
3
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
4
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
5
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
6
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
7
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
8
लग्नानंतर घरी कोणालंच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
9
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार
10
'माझे शब्द चुकीचे होते...', डॉक्टरचे निलंबन करणाऱ्या गोव्याच्या आरोग्य मंत्र्यांनी मागितली माफी
11
Mumbra Train Accident: "मुंबईत नोकरीला जाणे म्हणजे जिवाशी..."; मुंब्रातील घटनेनंतर खासदार वर्षा गायकवाडांचा केंद्रावर ठपका
12
Partho Ghosh: प्रसिद्ध दिग्दर्शक पार्थो घोष यांचं निधन, माधुरी दीक्षितच्या 'या' सिनेमामुळे मिळालेली लोकप्रियता
13
नक्षलवाद्यांनी पेरलेल्या IED चा भीषण स्फोट; ASP आकाश राव शहीद, अनेक जवान जखमी
14
Sonam Raghuvanshi : सोनमपर्यंत पोहोचवणारे धागेदोरे, पोलिसांनी कसं उलगडलं राजाच्या हत्येचं गूढ?
15
Sonam Raghuvanshi : ५ वर्षांनी लहान असलेला सोनमचा बॉयफ्रेंड राजाच्या हत्येचा मास्टरमाईंड; अशी सुरू झाली लव्हस्टोरी
16
"सोनम ढाब्यावर आली, घाबरलेली, रडत म्हणाली..."; साहिलने सांगितलं रात्री १ वाजता काय घडलं?
17
१ लाख रुपयांचे झाले ५५ लाख; अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स नव्या उच्चांकी स्तरावर, तुमच्याकडे आहे का?
18
"महेश मांजरेकरांनी माझा अख्खा रोलच कापला...", क्रांती रेडकरचा खुलासा; कोणता होता सिनेमा?
19
Sonam Raghuvanshi : "सोनमला फाशी झालीच पाहिजे"; राजाच्या हत्येनंतर आईचा आक्रोश, घरात कशी वागायची सून?
20
नशीब पहिला मुलगाच झाला! प्रेग्नंसीनंतर नातेवाईकाच्या बोलण्याने दुखावलेल्या रेणुका शहाणे, म्हणाल्या...

पुरोगामी विचारवंत कलबुर्गींची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2015 00:39 IST

अज्ञाताने घातल्या गोळ्या : दाभोलकर, पानसरेंनंतर आणखी एक विवेकवादी ठरले बळी

धारवाड /बेळगाव : मूर्तीपूजेविरुद्ध जनजागृती अभियान सुरू केलेले कर्नाटकातील ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत आणि विद्रोही साहित्यिक डॉ. मल्लेशप्पा एम. कलबुर्गी यांची रविवारी सकाळी अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. ते ७७ वर्षांचे होते. त्यांच्यामागे तीन मुले आणि एक मुलगी आहे.महाराष्ट्रातील पुरोगामी विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरेंपाठोपाठ आणखी एका पुरोगामी विचारवंताची हत्या झाल्याने या चळवळीतील कार्यकर्त्यांना धक्का बसला आहे. डॉ. कलबुर्गी यांच्या हत्येबाबत हिंदुत्ववादी संघटनांवर संशय व्यक्त केला जात आहे. डॉ. दाभोलकर आणि पानसरे यांच्यावर ज्या पद्धतीने हल्ला करण्यात आला. त्याच पद्धतीने कलबुर्गी यांच्यावरही हल्ला झाला. धारवाडमधील कल्याणनगर परिसरात कलबुर्गी यांचे निवासस्थान आहे. रविवारी सकाळी दुचाकीवरून दोन अज्ञात हल्लेखोर कलबुर्गी यांच्या घरी आले. त्यापैकी एकजण दुचाकीवर थांबला, तर दुसऱ्या व्यक्तीने आपण विद्यार्थी आहोत, असे सांगून दरवाजा ठोठावला. कलबुर्गी यांनी दरवाजा उघडताच हल्लेखोराने दोन गोळ्या झाडल्या. त्यापैकी एक गोळी कलबुर्गी यांचे कपाळ भेदून आरपार गेली, तर दुसरी गोळी शरीरात घुसली. त्यामुळे ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. हल्ल्यानंतर हल्लेखोरांनी लगेचच दुचाकीवरून पळ काढला. हल्ल्यानंतर कलबुर्गी यांना तत्काळ धारवाडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. (प्रतिनिधी)हिंदुत्ववाद्यांवर संशयमूर्तीपूजेविरुद्ध डॉ. कलबुर्गी यांनी जागृती अभियान सुरू केले होते. त्यांना काही हिंदुत्ववादी संघटनांकडून धमक्याही मिळाल्या होत्या. पण, त्याकडे कलबुर्गी यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे त्यांची हत्या हिंदुत्ववादी संघटनांकडून केली गेली असावी, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.बजरंग दलाचे वादग्रस्त टिष्ट्वटबजरंग दलाच्या भुवंत शेट्टी याने टिष्ट्वटरवर कलबुर्गी यांच्या हत्येचे समर्थन केले असून, हिंदुत्वाच्या विरोधात लिहिणाऱ्या, बोलणाऱ्यांची हीच गत होईल, अशी धमकीही दिली आहे.कोल्हापूरचे पथक धारवाडला रवानाज्येष्ठ साहित्यिक डॉ. एम. एम. कलबुर्गी यांची रविवारी सकाळी अज्ञाताने गोळ्या घालून हत्या केली. कलबुर्गी आणि ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येमध्ये साम्य असल्याने कोल्हापूरचे विशेष पथक सकाळी धारवाड येथे रवाना झाले. गेली सहा महिने हे पथक पानसरेंच्या मारेकऱ्यांचा शोध घेत आहे. पानसरे यांचे मारेकरीच कलबुर्गी यांच्या हत्येमागे असावेत, असा संशय कोल्हापूर पोलिसांना आहे. यानुसार हे पथक धारवाडकडे रवाना झाले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. सुरक्षा परत केली डॉ. कलबुर्गी यांना हिंदुत्ववादी संघटनांकडून जिवे मारण्याची धमकी आल्यानंतर कर्नाटक पोलिसांनी त्यांना सशस्त्र सुरक्षा पुरविली होती. त्यासाठी दोन पोलीस कर्मचारी कायम त्यांच्यासोबत राहत होते. पण काही दिवसांपूर्वी डॉ. कलबुर्गी यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन आपल्या सुरक्षेसाठी सरकारच्या पैशांचा अपव्यय होत आहे; त्यामुळे सुरक्षा काढून घ्यावी, अशी मागणी केली होती. त्या आधारे पोलीस प्रशासनाने त्यांची सुरक्षा काढून घेतली होती.