शहरं
Join us  
Trending Stories
1
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
2
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
3
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
4
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
5
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
6
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
7
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
8
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
9
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
10
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
11
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
12
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
13
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!
14
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती
15
सेल्फी अन् रीलचा नाद लय बेक्कार! काही सेकंदांचं वेड करतंय जीवाशी खेळ; फुकट जातोय वेळ...
16
नवीन कर प्रणालीतही टॅक्स वाचवता येतो! NPS, EPF पासून ते 'या' खास पर्यायांपर्यंत, बचत करण्याचे ७ प्रभावी मार्ग!
17
रायगड बोट दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या ३ मच्छिमारांचे मृतदेह सापडले!
18
ऐकावं ते नवलच! नाव डॉग बाबू, वडील कुत्ता बाबू अन् आई कुटिया देवी; कुत्र्यासाठी बनवले रहिवासी प्रमाणपत्र
19
गुंतवणुकीसाठी बेस्ट आहे 'ही' सरकारी स्कीम; एकदा गुंतवणूक करा आणि दरवर्षी मिळवा २ लाखांचं फिक्स व्याज
20
दहशतवादी पहलगाममध्ये घुसलेच कसे? PoK का घेतले नाही? काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल

पुरोगामी विचारवंत कलबुर्गींची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2015 00:39 IST

अज्ञाताने घातल्या गोळ्या : दाभोलकर, पानसरेंनंतर आणखी एक विवेकवादी ठरले बळी

धारवाड /बेळगाव : मूर्तीपूजेविरुद्ध जनजागृती अभियान सुरू केलेले कर्नाटकातील ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत आणि विद्रोही साहित्यिक डॉ. मल्लेशप्पा एम. कलबुर्गी यांची रविवारी सकाळी अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. ते ७७ वर्षांचे होते. त्यांच्यामागे तीन मुले आणि एक मुलगी आहे.महाराष्ट्रातील पुरोगामी विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरेंपाठोपाठ आणखी एका पुरोगामी विचारवंताची हत्या झाल्याने या चळवळीतील कार्यकर्त्यांना धक्का बसला आहे. डॉ. कलबुर्गी यांच्या हत्येबाबत हिंदुत्ववादी संघटनांवर संशय व्यक्त केला जात आहे. डॉ. दाभोलकर आणि पानसरे यांच्यावर ज्या पद्धतीने हल्ला करण्यात आला. त्याच पद्धतीने कलबुर्गी यांच्यावरही हल्ला झाला. धारवाडमधील कल्याणनगर परिसरात कलबुर्गी यांचे निवासस्थान आहे. रविवारी सकाळी दुचाकीवरून दोन अज्ञात हल्लेखोर कलबुर्गी यांच्या घरी आले. त्यापैकी एकजण दुचाकीवर थांबला, तर दुसऱ्या व्यक्तीने आपण विद्यार्थी आहोत, असे सांगून दरवाजा ठोठावला. कलबुर्गी यांनी दरवाजा उघडताच हल्लेखोराने दोन गोळ्या झाडल्या. त्यापैकी एक गोळी कलबुर्गी यांचे कपाळ भेदून आरपार गेली, तर दुसरी गोळी शरीरात घुसली. त्यामुळे ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. हल्ल्यानंतर हल्लेखोरांनी लगेचच दुचाकीवरून पळ काढला. हल्ल्यानंतर कलबुर्गी यांना तत्काळ धारवाडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. (प्रतिनिधी)हिंदुत्ववाद्यांवर संशयमूर्तीपूजेविरुद्ध डॉ. कलबुर्गी यांनी जागृती अभियान सुरू केले होते. त्यांना काही हिंदुत्ववादी संघटनांकडून धमक्याही मिळाल्या होत्या. पण, त्याकडे कलबुर्गी यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे त्यांची हत्या हिंदुत्ववादी संघटनांकडून केली गेली असावी, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.बजरंग दलाचे वादग्रस्त टिष्ट्वटबजरंग दलाच्या भुवंत शेट्टी याने टिष्ट्वटरवर कलबुर्गी यांच्या हत्येचे समर्थन केले असून, हिंदुत्वाच्या विरोधात लिहिणाऱ्या, बोलणाऱ्यांची हीच गत होईल, अशी धमकीही दिली आहे.कोल्हापूरचे पथक धारवाडला रवानाज्येष्ठ साहित्यिक डॉ. एम. एम. कलबुर्गी यांची रविवारी सकाळी अज्ञाताने गोळ्या घालून हत्या केली. कलबुर्गी आणि ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येमध्ये साम्य असल्याने कोल्हापूरचे विशेष पथक सकाळी धारवाड येथे रवाना झाले. गेली सहा महिने हे पथक पानसरेंच्या मारेकऱ्यांचा शोध घेत आहे. पानसरे यांचे मारेकरीच कलबुर्गी यांच्या हत्येमागे असावेत, असा संशय कोल्हापूर पोलिसांना आहे. यानुसार हे पथक धारवाडकडे रवाना झाले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. सुरक्षा परत केली डॉ. कलबुर्गी यांना हिंदुत्ववादी संघटनांकडून जिवे मारण्याची धमकी आल्यानंतर कर्नाटक पोलिसांनी त्यांना सशस्त्र सुरक्षा पुरविली होती. त्यासाठी दोन पोलीस कर्मचारी कायम त्यांच्यासोबत राहत होते. पण काही दिवसांपूर्वी डॉ. कलबुर्गी यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन आपल्या सुरक्षेसाठी सरकारच्या पैशांचा अपव्यय होत आहे; त्यामुळे सुरक्षा काढून घ्यावी, अशी मागणी केली होती. त्या आधारे पोलीस प्रशासनाने त्यांची सुरक्षा काढून घेतली होती.