शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

सीआयडीकडील महत्वाच्या गुन्ह्यांच्या तपासात प्रगती

By admin | Updated: August 29, 2016 20:56 IST

सीआयडीकडील महत्वाच्या गुन्ह्यांच्या तपासात प्रगती असून लवकरच भंडारा धान्य घोटाळा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्याचे आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे.

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि.29 -  सीआयडीकडील महत्वाच्या गुन्ह्यांच्या तपासात प्रगती असून लवकरच भंडारा धान्य घोटाळा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्याचे आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे. यासोबतच तुळजापूर आणि कोल्हापूर देवस्थानातील घोटाळ्यांचा तपासही प्रगतीपथावर असल्याची माहिती राज्याचे अतिरीक्त सचिव (गृह) के. पी. बक्षी यांनी दिली. 
बक्षी पुण्याच्या एकदिवसाच्या दौ-यावर आलेले असताना पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. बक्षी म्हणाले  ह्यसीआयडीमार्फत तपास सुरु असलेल्या भंडारा धान्य घोटाळ्याचा तपास पुर्ण झाला असून आरोपींचा जामीन रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयापुढे काही नविन पुरावे सादर करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने हे पुरावे सत्र न्यायालयात सादर करुन आरोपींचा जामीन रद्द करण्यासाठी अर्ज करण्याच्या सुचना केल्या आहेत. त्यानुसार प्रक्रिया केली जाणार आहे. यासोबतच आण्णाभाऊ साठे महामंडळामधील घोटाळ्याचा 70 टक्के तपास पुर्ण झाला असून 30 टक्के तपास सुरु आहे. लवकरच या गुन्ह्यातही आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. तुळजापूर आणि कोल्हापूर देवस्थानातील कथित घोटाळ्यांच्या तपासाच्या कागदपत्रांची पुर्तता करुन शासनाकडे अहवाल पाठवणार आहे.ह्ण
पुण्याची पोलीस व्यवस्था चांगली आहे. राज्यामध्ये आरोपींना शिक्षा होण्याच्या प्रमाणात 35 टक्क्यांवरुन 54 टक्यांपर्यंत वाढ झाली आहे. सध्या सीसीटीव्हीचे काम समाधानकारक सुरु आहे. केवळ साडेतीन टक्के खोदाई आणि कंपनीच्या तांत्रिक कारणांमुळे अडचण येत आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी आणखी कॅमेरे बसविण्यात येणार असून ते कायम राहतील असेही बक्षी यांनी स्पष्ट केले. 
  पोलीस आयुक्तालयामध्ये बैठक घेऊन गुन्ह्यांचे प्रमाण, शिक्षेचे प्रमाण, सीसीटीव्ही, तसेच पोलिसांच्या घरांसंदर्भात माहिती घेतली. मागील वर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांसाठी एक लाख घरे देणार असल्याची घोषणा केली होती. लोहगाव येथे पाच हजार घरांची मेगा सिटी साकारत आहे. त्यांना आवश्यकत ती सर्व मदत देणार असून मुंबईमध्ये लवकरच यासंदर्भात एक बैठक बोलावण्यात येणार असल्याचे बक्षी यांनी सांगितले. बक्षी यांनी पोलीस आयुक्तालयासह स्वारगेट, औंध आणि शिवाजीनगर पोलीस वसाहतींना भेट दिली. यासोबतच राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी)च्या अधिका-यांची बैठक घेतली. संध्याकाळी त्यांनी पोलीस मुख्यालयामध्ये मुद्देमाल प्रदान कार्यक्रमात उपस्थिती लावली. 
--------
पिंपरी चिंचवड साठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची मागणी करण्यात येत आहे. मात्र, आपल्याकडे अद्याप पुर्ण प्रस्ताव आलेला नाही. या मागणीवर शासनाच्या वरिष्ठ पातळीवर विचार झालेला नाही. 
- के. पी. बक्षी, अतिरीक्त सचिव (गृह)