शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
2
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
3
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
4
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
5
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
6
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
7
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
8
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
9
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप
10
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
11
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
12
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
13
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
14
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
15
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
16
शू रॅकवर बसल्याने मांजराला नवव्या मजल्यावरून फेकले, आरोपी शेजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
17
‘भारतात मतदार यादी तयार करणे, हे जगात सर्वांत कठीण काम’
18
लोकल लेट का होते? ते शोधा, तरच अपघात कमी होतील, मुंब्रा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संघटनांचे मत
19
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
20
नव्या स्थानकांच्या उभारणीत रेल्वेचा हात आखडताच, नवे ठाणे, चिखलोली, दातीवली, मानस मंदिरसह ३२ स्थानकांचा होता प्रस्ताव

प्राध्यापकांचे निवृत्ती वय ६०, प्राचार्यांना ६५!

By admin | Updated: June 19, 2016 02:16 IST

प्राध्यापकांचे निवृत्ती वय ६२ करण्यात आले होते, मात्र अनेक संस्था, संघटना तसेच काहींची वैयक्तिक निवेदने या सर्वांचा विचार करून प्राध्यापकांचे निवृत्ती वय ६० वर्षेच ठेवण्याचा निर्णय घेण्यात

पुणे : प्राध्यापकांचे निवृत्ती वय ६२ करण्यात आले होते, मात्र अनेक संस्था, संघटना तसेच काहींची वैयक्तिक निवेदने या सर्वांचा विचार करून प्राध्यापकांचे निवृत्ती वय ६० वर्षेच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले. प्राचार्यांसाठी मात्र निवृत्तीची वयोमर्यादा ६५ अशीच कायम ठेवली असल्याचे ते म्हणाले. रात्रशाळा बंदीचा सरकारचा काहीच विचार नसल्याची माहितीही त्यांनी दिली.शिक्षणाशी संबधित विविध विषयांवर तावडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले,‘‘खोटी कागदपत्रे दाखवून पत्र्याच्या शेडमध्ये महाविद्यालये सुरू करणाऱ्या संस्थांवर कारवाई करण्यात येणार आहे. अभियांत्रिकीसारख्या अभ्यासक्रमांच्या जागा रिक्त राहतात, विद्यार्थी मिळत नाहीत तरीही नवी महाविद्यालये सुरू करण्यासाठी अर्ज येत असतात. असे सुमारे ७५० अर्ज आले आहेत. त्यांच्यात काही त्रुटी आहेत. त्याची पूर्तता करण्यासाठी त्यांना ३० जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. किती नव्या संस्थांना परवानगी द्यायची याचा निर्णय घ्यावा लागेल.’’दहावीचा निकाल १०० टक्के लागावा यासाठी नववीत मुलांना नापास करण्याचा प्रकार सुरू झाला आहे. याबाबत विचारले असता तावडे यांनी आठवीपर्यंत परीक्षाच नको या निर्णयाचा वेगळा अर्थ काढला गेल्यामुळे असे होत असल्याचे सांगितले. तो ज्या विषयात कमी पडतो त्याचा विशेष अभ्यास घ्या, असा त्याचा अर्थ आहे. विद्यार्थ्यांना नापास करणाऱ्या शाळांची चौकशी केली जाईल, असे त्यांनी सांगितले.शिक्षक, प्राध्यापक भरतीत खासगी संस्थांकडून मोठा आर्थिक गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यावर उपाय म्हणून पात्र शिक्षक, प्राध्यापक यांची यादीच सरकार तयार करेल. ती नेटवर टाकण्यात येईल. संस्थेला भरती करायची असेल तर त्यांनी या यादीतून निवड करून नंतर मुलाखत वगैरे नेहमीची पद्धत अवलंबून भरती करावी. सरकारी अनुदान घेत असलेल्या संस्थेला हे बंधनकारक असेल अशी माहिती तावडे यांनी दिली. आरटीई शुल्क परताव्यासाठी सरकारने ३२ कोटी रूपयांची तरतुद केली आहे. दप्तरांच्या ओझ्याचा विषय आता सीबीएसई आयसीएसी या शाळांपुरता मर्यादित आहे, असेही तावडे म्हणाले. (प्रतिनिधी)शून्य टक्के निकाल लागलेल्या ६१ शाळा आहेत. त्यांच्या शिक्षकांची २४ जुलैला पुण्यात बैठक आयोजित केली आहे. चौकशी करून शिक्षकांना प्रशिक्षण वगैरे या प्रकारची उपाययोजना राबविण्याचा विचार असल्याची माहिती तावडे यांनी दिली.