शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

देहेणची उत्पादने जाणार युरोप, कॅनडा, अमेरिकेच्या बाजारात

By admin | Updated: February 2, 2015 00:02 IST

वनौषधी प्रकल्प : ३५ एकरवरील प्रकल्पाला परदेशी पाहुण्यांची भेट

दापोली : कोकणातील शेतकऱ्याने केवळ भात, आंबा, काजू यावर अवलंबून न राहता वनौषधी शेती केल्यास एकरी लाखो रुपये मिळू शकतात, असा हा वनौषधीचा प्रोजेक्ट लक्ष्मीकांत व रमाकांत हरलालका यांनी ३५ एकरवर उभा केला आहे. त्यांच्या या वनौषधी प्रकल्पाला युरोप, कॅनडा येथील उद्योजकांनी भेट दिली असून, कोकणातील हर्बल प्रोडक्टला विदेशात मोठे मार्केट उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले आहे. देहेण- सुकोंडी येथे लक्ष्मीकांत हरलालका या शेतकऱ्याने मोठ्या प्रमाणावर चंदन लागवड केली आहे. चंदनाचे फायदे मानवी जीवनात खूप आहेत. चंदनापासून तेल काढून परदेशात पाठविल्यास चांगली बाजारपेठही उपलब्ध होऊ शकते. चंदनाप्रमाणेच अगरउड, दालचिनी, लेमन ग्रास, पचोली, सालऊड यांसारख्या वनौषधींची लागवड करण्यात आली आहे. हरलालका या शेतकऱ्याने देहेन येथे ३५ एकर शेतीमध्ये चंदन, सोनचाफा, काजू, आंबा याचीही लागवड केली आहे. कोकणातील वनौषधीपासून उत्पादने बनवून थेट विदेशी मार्केटमध्ये पाठविण्याचे धाडस या शेतकऱ्याने केले आहे. ३० एकर जमिनीवरील चंदन लागवडीमध्ये तुरीची लागवड करुन चंदनाला पोषक वातावरणसुध्दा निर्माण करण्यात आले आहे. चंदनाच्या रोपासोबत तूर लागवड केल्यास तुरीच्या झाडापासून नायट्रोजन मिळते. चंदनाचे झाड चांगल्या पध्दतीने वाढायला मदत होते. सेंद्रिय शेतीत चंदनाची लागवड करुन त्या झाडापासून चार वर्षात चंदन मिळायला सुरुवात होते. चंदनाची लागवड कोकणातील शेतीला फार उपयुक्त असून, चंदनाच्या झाडापासून तेल व पॉवर तयार करण्याचे युनिटसुध्दा त्यांनी सुरू केले आहे. त्यामुळे कोकणातील वनौषधीची विविध उत्पादने प्रथमच परदेशी वारी करणार आहेत. कोकणच्या उद्योजकांसाठी ही नक्कीच आशादायी बाब आहे.(प्रतिनिधी)कोकणातील वनौषधी शेती पाहून खूप आनंद झाला. हे काम खूप चॅलेंजिंग आहे. कॅनडामध्ये मिळणारे प्रोडक्ट एवढे चांगले नसते. इथल्या प्रोडक्टला कॅनडामध्ये खूप मागणी आहे. येथील तेल, झाडे, फुले, सगळं काही उत्कृष्ट आहे.-विलणीयस, उद्योजक प्रोसेसिंग युनिटद्वारे साहित्य तयार करुन होणारे उत्पादन थेट परदेशी मार्केटमध्ये पाठविण्यात येत आहे. कोकणातील सेंद्रिय शेतीतील हर्बल उत्पादनाला परदेशात मोठी मागणी असून, किंमतही चांगली येत आहे. विदेशी उद्योजकांनी हर्बल फार्मला भेट देऊन येथील शेतीची पाहणी केली. भविष्यात कोकणातील सर्व नैसर्गिक प्रोडक्टस्ना विदेशी बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याची ग्वाही यावेळी परदेशी उद्योजकांनी दिली.