शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

देहेणची उत्पादने जाणार युरोप, कॅनडा, अमेरिकेच्या बाजारात

By admin | Updated: February 2, 2015 00:02 IST

वनौषधी प्रकल्प : ३५ एकरवरील प्रकल्पाला परदेशी पाहुण्यांची भेट

दापोली : कोकणातील शेतकऱ्याने केवळ भात, आंबा, काजू यावर अवलंबून न राहता वनौषधी शेती केल्यास एकरी लाखो रुपये मिळू शकतात, असा हा वनौषधीचा प्रोजेक्ट लक्ष्मीकांत व रमाकांत हरलालका यांनी ३५ एकरवर उभा केला आहे. त्यांच्या या वनौषधी प्रकल्पाला युरोप, कॅनडा येथील उद्योजकांनी भेट दिली असून, कोकणातील हर्बल प्रोडक्टला विदेशात मोठे मार्केट उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले आहे. देहेण- सुकोंडी येथे लक्ष्मीकांत हरलालका या शेतकऱ्याने मोठ्या प्रमाणावर चंदन लागवड केली आहे. चंदनाचे फायदे मानवी जीवनात खूप आहेत. चंदनापासून तेल काढून परदेशात पाठविल्यास चांगली बाजारपेठही उपलब्ध होऊ शकते. चंदनाप्रमाणेच अगरउड, दालचिनी, लेमन ग्रास, पचोली, सालऊड यांसारख्या वनौषधींची लागवड करण्यात आली आहे. हरलालका या शेतकऱ्याने देहेन येथे ३५ एकर शेतीमध्ये चंदन, सोनचाफा, काजू, आंबा याचीही लागवड केली आहे. कोकणातील वनौषधीपासून उत्पादने बनवून थेट विदेशी मार्केटमध्ये पाठविण्याचे धाडस या शेतकऱ्याने केले आहे. ३० एकर जमिनीवरील चंदन लागवडीमध्ये तुरीची लागवड करुन चंदनाला पोषक वातावरणसुध्दा निर्माण करण्यात आले आहे. चंदनाच्या रोपासोबत तूर लागवड केल्यास तुरीच्या झाडापासून नायट्रोजन मिळते. चंदनाचे झाड चांगल्या पध्दतीने वाढायला मदत होते. सेंद्रिय शेतीत चंदनाची लागवड करुन त्या झाडापासून चार वर्षात चंदन मिळायला सुरुवात होते. चंदनाची लागवड कोकणातील शेतीला फार उपयुक्त असून, चंदनाच्या झाडापासून तेल व पॉवर तयार करण्याचे युनिटसुध्दा त्यांनी सुरू केले आहे. त्यामुळे कोकणातील वनौषधीची विविध उत्पादने प्रथमच परदेशी वारी करणार आहेत. कोकणच्या उद्योजकांसाठी ही नक्कीच आशादायी बाब आहे.(प्रतिनिधी)कोकणातील वनौषधी शेती पाहून खूप आनंद झाला. हे काम खूप चॅलेंजिंग आहे. कॅनडामध्ये मिळणारे प्रोडक्ट एवढे चांगले नसते. इथल्या प्रोडक्टला कॅनडामध्ये खूप मागणी आहे. येथील तेल, झाडे, फुले, सगळं काही उत्कृष्ट आहे.-विलणीयस, उद्योजक प्रोसेसिंग युनिटद्वारे साहित्य तयार करुन होणारे उत्पादन थेट परदेशी मार्केटमध्ये पाठविण्यात येत आहे. कोकणातील सेंद्रिय शेतीतील हर्बल उत्पादनाला परदेशात मोठी मागणी असून, किंमतही चांगली येत आहे. विदेशी उद्योजकांनी हर्बल फार्मला भेट देऊन येथील शेतीची पाहणी केली. भविष्यात कोकणातील सर्व नैसर्गिक प्रोडक्टस्ना विदेशी बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याची ग्वाही यावेळी परदेशी उद्योजकांनी दिली.