शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

रिलायन्स नागपूरमध्ये करणार प्रवासी विमानांचे उत्पादन

By admin | Updated: May 14, 2016 13:42 IST

रिलायन्स डिफेन्स ही अनिल अंबानी समूहाची कंपनी भारतामध्ये प्रवासी विमानांचे उत्पादन करण्याचा विचार करत आहे

- मिहानमध्ये 6,500 कोटी रुपयांचा प्रकल्प
- 25 वर्षातली पहिलीच भारतीय कंपनी
- युक्रेनमधल्या अंतोनोव्हशी केला भागिदारी करार
 
ऑनलाइन लोकमत
 
हैदराबाद, दि. 14 - रिलायन्स डिफेन्स ही अनिल अंबानी समूहाची कंपनी भारतामध्ये प्रवासी विमानांचे उत्पादन करणार आहे. युक्रेनमधल्या अंतोनोव्ह या कंपनीशी संयुक्त भागिदारी करून भारतामध्ये 50 ते 80 आसनक्षमता असलेल्या प्रवासी वाहतुकीच्या विमानांचे उत्पादन करण्याचे कंपनीने निश्चित केल्याचे रिलायन्स डिफेन्सचे अध्यक्ष एम. माथेश्वरन यांनी सांगितले. जगातलं सगळ्यात मोठं मालवाहतूक करणारं अंतोनोव्हचं विमान म्रिया दी ड्रीम शुक्रवारी भारतात लँड झाले असून या पार्श्वभूमीवर माथेश्वरन यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
 
जगातलं सगळ्यात मोठं मालवाहूतक विमान हैदराबादमध्ये लँड
 
 
हिंदुस्थान एरोनॉटिक्सही या म्हणजे 50 ते 80 आसनक्षमता असलेल्या प्रवासी श्रेणीतल्या विमानांच्या उत्पादनांचा विचार करत आहे. हिंदुस्थान एरोनॉटिक्सने 25 वर्षांपूर्वी प्रवासी विमानांचं उत्पादन बंद केलं. त्यामुळे रिलायन्सची योजना प्रत्यक्षात उतरली तर ती 25 वर्षातली असं करणारी पहिलीच कंपनी ठरणार आहे. रिलायन्स व हिंदुस्थान एरोनॉटिक्स एकत्र येऊन या प्रकल्पासाठी काम करण्याची चाचपणीही सुरू आहे. भारतामध्ये येत्या काळात या प्रकारच्या सुमाऱे 200 विमानांना मागणी असल्याचा अंदाज आहे.
भारतामध्ये टिअर 2 व टिअर 3 या श्रेणीतली म्हणजे बऱ्यापैकी मोठी अशी जवळपास 400 शहरं असून या शहरांना हवाईमार्गाने जोडण्यासाठी 50 ते 80 आसन क्षमता असलेली विमाने आवश्यक असल्याचे सांगण्यात आले.
 
6,500 कोटी रुपयांची गुंतवणूक
 
रिलायन्स व अंतोनोव्हमध्ये 51:49 टक्के भागिदारीचा करार करण्यात येणार असून नागपूरच्या एरोस्पेस पार्कमध्ये विमानांची सुरुवातीला असेंब्ली करण्यात येणार आहे. सुमारे 6,500 कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या या प्रकल्पामध्ये 15 ते 20 वर्षांमध्ये संपूर्ण भारतीय बनावटीची विमाने तयार करण्याची योजना आहे. मिहानमधला हा प्रकल्प लवकरात लवकर सुरू होईल अशी आशा आहे.
 
उपखंडात व जागतिक स्तरावर निर्यातीचे लक्ष्य
 
अंतोनोव्ह कंपनीसोबतची भागिदारी केवळ भारतीय बाजारपेठेला समोर ठेवून करण्यात आली नसल्याचे माथेश्वरन म्हणाले. कमी किमतीच्या विमानांची भारतीय उपखंडातील मागणी तसेच जागतिक बाजारात असलेल्या संधी यांचाही विचार करून निर्यातीचे लक्ष्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.