शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

रिलायन्स नागपूरमध्ये करणार प्रवासी विमानांचे उत्पादन

By admin | Updated: May 14, 2016 13:42 IST

रिलायन्स डिफेन्स ही अनिल अंबानी समूहाची कंपनी भारतामध्ये प्रवासी विमानांचे उत्पादन करण्याचा विचार करत आहे

- मिहानमध्ये 6,500 कोटी रुपयांचा प्रकल्प
- 25 वर्षातली पहिलीच भारतीय कंपनी
- युक्रेनमधल्या अंतोनोव्हशी केला भागिदारी करार
 
ऑनलाइन लोकमत
 
हैदराबाद, दि. 14 - रिलायन्स डिफेन्स ही अनिल अंबानी समूहाची कंपनी भारतामध्ये प्रवासी विमानांचे उत्पादन करणार आहे. युक्रेनमधल्या अंतोनोव्ह या कंपनीशी संयुक्त भागिदारी करून भारतामध्ये 50 ते 80 आसनक्षमता असलेल्या प्रवासी वाहतुकीच्या विमानांचे उत्पादन करण्याचे कंपनीने निश्चित केल्याचे रिलायन्स डिफेन्सचे अध्यक्ष एम. माथेश्वरन यांनी सांगितले. जगातलं सगळ्यात मोठं मालवाहतूक करणारं अंतोनोव्हचं विमान म्रिया दी ड्रीम शुक्रवारी भारतात लँड झाले असून या पार्श्वभूमीवर माथेश्वरन यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
 
जगातलं सगळ्यात मोठं मालवाहूतक विमान हैदराबादमध्ये लँड
 
 
हिंदुस्थान एरोनॉटिक्सही या म्हणजे 50 ते 80 आसनक्षमता असलेल्या प्रवासी श्रेणीतल्या विमानांच्या उत्पादनांचा विचार करत आहे. हिंदुस्थान एरोनॉटिक्सने 25 वर्षांपूर्वी प्रवासी विमानांचं उत्पादन बंद केलं. त्यामुळे रिलायन्सची योजना प्रत्यक्षात उतरली तर ती 25 वर्षातली असं करणारी पहिलीच कंपनी ठरणार आहे. रिलायन्स व हिंदुस्थान एरोनॉटिक्स एकत्र येऊन या प्रकल्पासाठी काम करण्याची चाचपणीही सुरू आहे. भारतामध्ये येत्या काळात या प्रकारच्या सुमाऱे 200 विमानांना मागणी असल्याचा अंदाज आहे.
भारतामध्ये टिअर 2 व टिअर 3 या श्रेणीतली म्हणजे बऱ्यापैकी मोठी अशी जवळपास 400 शहरं असून या शहरांना हवाईमार्गाने जोडण्यासाठी 50 ते 80 आसन क्षमता असलेली विमाने आवश्यक असल्याचे सांगण्यात आले.
 
6,500 कोटी रुपयांची गुंतवणूक
 
रिलायन्स व अंतोनोव्हमध्ये 51:49 टक्के भागिदारीचा करार करण्यात येणार असून नागपूरच्या एरोस्पेस पार्कमध्ये विमानांची सुरुवातीला असेंब्ली करण्यात येणार आहे. सुमारे 6,500 कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या या प्रकल्पामध्ये 15 ते 20 वर्षांमध्ये संपूर्ण भारतीय बनावटीची विमाने तयार करण्याची योजना आहे. मिहानमधला हा प्रकल्प लवकरात लवकर सुरू होईल अशी आशा आहे.
 
उपखंडात व जागतिक स्तरावर निर्यातीचे लक्ष्य
 
अंतोनोव्ह कंपनीसोबतची भागिदारी केवळ भारतीय बाजारपेठेला समोर ठेवून करण्यात आली नसल्याचे माथेश्वरन म्हणाले. कमी किमतीच्या विमानांची भारतीय उपखंडातील मागणी तसेच जागतिक बाजारात असलेल्या संधी यांचाही विचार करून निर्यातीचे लक्ष्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.