शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

सीमाभागातील मराठी शाळांबाबत कार्यवाही

By admin | Updated: April 1, 2016 00:10 IST

सीमाभागातील गावांमधील शाळांमध्ये मराठी माध्यमातून शिकण्याची इच्छा असणाऱ्या बांधवांना शिक्षण घेण्याची पुरेशी सोय नसल्याची व्यथा शिक्षक परिषदेने मांडली होती.

मुंबई : सीमाभागातील गावांमधील शाळांमध्ये मराठी माध्यमातून शिकण्याची इच्छा असणाऱ्या बांधवांना शिक्षण घेण्याची पुरेशी सोय नसल्याची व्यथा शिक्षक परिषदेने मांडली होती. त्यामुळे या भागातील विद्यार्थ्यांना इतर माध्यमातून शिकावे लागत असल्याचेही परिषदेने निदर्शनास आणले होते. त्यावर एका महिन्यात कार्यवाही करू, असे आश्वासन शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले आहे. शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी सांगितले की, चंद्रपूर, सांगली व नाशिक जिल्ह्यांतील सीमालगतची गावे आंध्रप्रदेश, कर्नाटक व गुजरात राज्यांच्या जवळ आहेत. या भागातील गावे, तांडा व वस्तीमध्ये मराठी माध्यमाच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा सुरु करण्याची मागणी संबंधित भागातील नागरिकांकडून व लोकप्रतिनिधींकडून शासनाकडे सातत्याने सुरु होती. सीमेवरील भागांत मराठी माध्यमाच्या माध्यमिक शाळा उपलब्ध नसलेल्या ठिकाणी मराठी माध्यमाच्या शाळा सुरु करण्याबाबत ८ आॅगस्ट २०११ रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सदरचा विषय चर्चेला आला होता. मंत्रीमंडळाने सकारात्मक निर्णय घेऊन सीमावर्ती भागातील सुमारे ३६ गावांमध्ये मराठी माध्यमाच्या नवीन माध्यमिक शाळा विशेषबाब म्हणून अनुदान तत्वावर सुरु करण्यास मान्यता दिली. ७ आॅगस्ट २०१३ रोजी शालेय शिक्षण विभागाने याबाबत शासन निर्णयही जारी केला होता. या शासन निर्णयानंतर सुद्धा सीमावर्ती भागातील ३६ गावांमध्ये मराठी माध्यमाच्या एकाही माध्यमिक शाळेला शासनाने अद्यापही परवानगी दिलेली नाही. या भागांमध्ये मराठी माध्यमाच्या शाळा सुरु करण्यासाठी मार्च २०१४ मध्ये संस्थांकडून प्रस्ताव आले होते. याबाबत शासनाने कोणताही निर्णय घेतला नसल्याचे मोते यांनी निदर्शनास आणून दिले आहे.मराठी शाळांची मागणी- सीमेवरील गावांमधील मराठी भाषिक नागरिक मराठी माध्यमाच्या शाळांची मागणी करीत असतांना त्यांच्या शिक्षणाची सोय न करणे मराठी भाषिकांवर अन्याय आहे.- सुमारे ५ वषार्पूर्वी घेतलेल्या या निर्णयाची तातडीने शासनाने अंमलबजावणी न केल्याने परिषदेने नाईलाजाने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला होता, असे शिक्षक परिषदेचे अनिल बोरनारे यांनी सांगितले.