शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
2
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
3
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
4
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?
5
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
6
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
7
नोएल टाटांनी करुन दाखवलं! अशी कामगिरी करणारा टाटा ग्रुप पहिलाच भारतीय ब्रँड; दुसरा-तिसरा कोण?
8
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
9
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
10
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
11
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
12
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
13
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
14
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी
15
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी
16
Prada : कोल्हापुरी चप्पलसाठी संभाजीराजे मैदानात; फेसबुक पोस्ट करुन केली मोठी मागणी
17
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
18
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
19
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
20
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'

स्थलांतराचा प्रश्न जैसे थे

By admin | Updated: November 3, 2016 02:42 IST

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाने वेग घेतला आहे. या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात होणार आहे.

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाने वेग घेतला आहे. या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. परंतु विमानतळाच्या मुख्य गाभा क्षेत्रातील गावांतील प्रकल्पग्रस्तांकडून स्थलांतराला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने सिडकोची डोकेदुखी वाढली आहे. यामुळे प्रकल्प रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी पनवेल तालुक्यातील नऊ गावे स्थलांतरित करावी लागणार आहेत. त्यामुळे या गावांतील साडेतीन हजार कुटुंबे निर्वासित होणार आहेत. त्यांचे वहाळ आणि वडघर येथे पुनर्वसन करण्यात येणार आहे. बाधित होणाऱ्या या ग्रामस्थांना त्यांच्या मूळ बांधकाम क्षेत्राच्या तीन पट क्षेत्राचा भूखंड देण्यात येणार आहे. त्याची सोडत प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली आहे. स्थलांतरित होणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना लवकरच प्रत्यक्ष भूखंडांचा ताबाही देण्यात येणार आहे. तसेच त्यांना अठरा महिन्यांचे घरभाडे व बांधकाम खर्चही दिला जाणार आहे. मात्र स्थलांतरासाठी प्रकल्पग्रस्तांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळताना दिसत नाही. प्रकल्पग्रस्तांच्या काही मागण्यांवर सिडकोकडून अद्यापि निर्णय होणे बाकी आहे. जोपर्यंत या मागण्यांचा विचार होत नाही, तोपर्यंत स्थलांतर न करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतल्याने सिडकोची अडचण वाढली आहे. याचा फटका विमानतळ प्रकल्पाला बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. >सिडकोचे प्रयत्न सुरूचविमानतळ प्रकल्पाच्या मार्गातील मुख्य अडसर ठरणाऱ्या गावांच्या स्थलांतराची प्रक्रिया जलदगतीने सुरू व्हावी, यादृष्टीने सिडकोचे प्रयत्न सुरू आहेत. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी हे स्वत:हून ग्रामस्थांच्या भेटी घेवून चर्चा करीत आहेत. गणेशोत्सवाच्या काळात स्थलांतरित होणाऱ्या अनेक गावांना भेटी देवून त्यांनी यासंदर्भात चर्चा केली होती. आजही सिडकोच्या माध्यमातून विविध स्तरावर ग्रामस्थांशी संवाद सुरूच आहे. प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांवर लवकरच सकारात्मक तोडगा काढण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याची माहिती सिडकोच्या सूत्राने दिली.