शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

इनामी जमिनीवरील बांधकामे नियमित

By admin | Updated: March 15, 2016 01:36 IST

इनामी जमिनींवरील अतिक्रमण आणि बांधकामे नियमित करण्याचा सरकारचा मानस असून, शहर विस्तारीकरणात ज्या जमिनीवर अकृषक परवाना न घेताच बांधकामे करण्यात आली

मुंबई : इनामी जमिनींवरील अतिक्रमण आणि बांधकामे नियमित करण्याचा सरकारचा मानस असून, शहर विस्तारीकरणात ज्या जमिनीवर अकृषक परवाना न घेताच बांधकामे करण्यात आली, तिथे रेडीरेकनरच्या ७५ टक्के रक्कम घेऊन नियमित करण्यात येतील, अशी घोषणा महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी सोमवारी विधान परिषदेत केली. या निर्णयामुळे कोल्हापूर, औरंगाबाद आणि नागपुरातील इनामी जमिनीवरील रहिवाशांना दिलासा मिळणार आहे. औंढा नागनाथ येथील इनामी जमिनी मूळ मालकांच्या नावे करण्याबाबतचा मुद्दा राष्ट्रवादीचे रामराव वडकुते यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होेता, तर काँग्रेस सदस्य सतेज पाटील यांनी कोल्हापुरात छत्रपती शाहू महाराजांनी दिलेल्या इनामी जमिनी नजराणा भरून नियमित करण्याची मागणी केली. यावर बोलताना खडसे म्हणाले की, ‘कोल्हापूर जिल्ह्यात छत्रपती शाहू महाराजांनी वहिवाटीने अनेक इनामी जमिनी शेतीसाठी दिल्या होत्या.’ ‘या जमिनींवर आता निवासी बांधकामे झाली आहेत. तिथे रेडीरेकनरच्या ७५ टक्के दंड आकारून नियमित करण्यात येतील,’ असेही खडसे यांनी पुढे स्पष्ट केले. देवस्थान, गायरान आणि वक्फसारख्या ज्या जमिनींचे हस्तांतरण होऊ शकत नाहीत, अशा जमिनींव्यतिरिक्त उर्वरित जमिनीवर्ग-१ मध्ये वर्ग करून तेथील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत लवकरच कायदा करण्यात येणार असल्याचेही खडसे यांनी स्पष्ट केले. हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथील भूखंड सेवाधारी इनामी आहेत की, वक्फच्या याबाबत वाद आहेत. या जमिनीची मालकी ठरविण्याबाबतचे अधिकार वक्फला असून, त्यांचा अहवाल आल्यावर पुढील निर्णय घेतला जाईल, असे खडसे यांनी सांगितले. रामराव वडकुते यांनी याबाबतचा प्रश्न विचारला होता. (प्रतिनिधी)