शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

‘ध’चा ‘मा’ केल्याने खबऱ्यांचे बक्षीस पक्के

By admin | Updated: February 16, 2015 03:11 IST

नक्षलवाद्यांबाबत माहिती देणाऱ्या व्यक्तीस देण्यात येणाऱ्या बक्षिसाच्या रकमेत आॅगस्ट २०१४ मध्ये घसघशीत वाढ करण्यात आली. परंतु खबऱ्याने सांगितलेला नक्षलवादी ‘धरला’ गेला तरच बक्षीस देण्याची मेख

संदीप प्रधान, मुंबईनक्षलवाद्यांबाबत माहिती देणा-या व्यक्तीस देण्यात येणा-या बक्षिसाच्या रकमेत आॅगस्ट २०१४ मध्ये घसघशीत वाढ करण्यात आली. परंतु खब-याने सांगितलेला नक्षलवादी ‘धरला’ गेला तरच बक्षीस देण्याची मेख गृह खात्याने मारल्याने आतापर्यंत एकाही खब-याला या निर्णयाचा लाभ झाला नाही. त्यामुळे आता खबऱ्याने माहिती दिलेला नक्षलवादी चकमकीत ‘मारला’ गेला तरीही बक्षिसाची रक्कम खबऱ्याला मिळणार आहे. अखेर गृहखात्याने ‘ध’चा ‘मा’ केल्याने किमान २० खबऱ्यांचा बक्षिसाचा रोखलेला मार्ग मोकळा झाला आहे.महाराष्ट्रातील गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, नांदेड, यवतमाळ व भंडारा या जिल्ह्यातील नक्षलवाद्यांविषयी माहिती देणाऱ्या व्यक्तींना रोख बक्षिसे देण्याची योजना २४ नोव्हेंबर २००६ रोजी अमलात आली. आंध्र प्रदेश सरकारने नक्षलवाद्याची माहिती खबऱ्याने दिल्यानुसार त्याला अटक झाली किंवा चकमकीत हत्या झाली तर बक्षिस देण्याची योजना सुरु केली होती. त्याच धर्तीवर ही योजना सुरु झाली. ८ आॅगस्ट २०१४ रोजी गृह खात्याने आदेश काढून रक्कमेत घसघशीत वाढ केली.गृह खात्याच्या मखलाशीमुळे २०१३ व २०१४ या वर्षात ज्या खबऱ्यांच्या सूचनेवरून किमान ३५ नक्षलवादी मारले गेले त्यापैकी एकाही खबऱ्याला बक्षिस मिळू शकले नाही. असे किमान २० खबरे बक्षिसाच्या प्रतिक्षेत होते. याबाबत पोलीस महानिरीक्षक रवींद्र कदम यांना विचारले असता ते म्हणाले की, नक्षलवाद्यांबाबत खबर कुणी दिली ते लपून राहत नसल्याने खबऱ्यांना घरदार सोडून जावे लागते. अशावेळी त्यांना चरितार्थाकरिता दुसरा मार्ग मिळावा हा बक्षिसाची रक्कम वाढवण्यामागे हेतू होता. नव्या आदेशांमुळे तो साध्य होईल. तसेच पूर्वलक्षी प्रभावाने आदेश लागू होत असल्याने गेल्या दोन वर्षातील कारवायांना सहाय्य केलेल्या खबऱ्यांना याचा लाभ होणार आहे.