शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
ठाकरे गटाला पुन्हा कोकणात मोठा धक्का; बडे पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा रामराम, भाजपात प्रवेश
5
भाचाच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
6
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
7
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
8
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
9
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
10
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
11
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
12
मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!
13
भयंकर! कर्ज फेडण्यासाठी, विम्याचे २ कोटी हडपण्यासाठी मित्राची केली हत्या, जिवंत जाळलं अन्...
14
अनिल अग्रवाल याच्या वेदांतानं भाजपला चार पट जास्त देणगी दिली, काँग्रेसच्या देणगीत मोठी घट, रिपोर्टमधून खुलासा
15
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
16
Karka Sankranti 2025 : कर्क संक्रांतीला 'या' पाच राशींच्या आयुष्यात होईल मोठे संक्रमण; येतील अच्छे दिन!
17
“एसटीचे कदापि खाजगीकरण होऊ देणार नाही”; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
19
Ahilyanagar: पोलिसांना बघून धरणात मारल्या उड्या, एका चोराचा बुडून मृत्यू, तर दुसरा...
20
Astro Tips: बायपाससारख्या मोठ्या शस्त्रक्रीया होण्यामागे कारणीभूत असते 'ही' ग्रहस्थिती!

उत्तर प्रदेशात काँग्रेसचा विजय निश्चित- प्रियांका चतुर्वेदी

By admin | Updated: June 6, 2016 03:15 IST

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा विजय निश्चित आहे, असा दावा पक्षाच्या प्रवक्ता प्रियंका चतुर्वेदी यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत केला.

नागपूर : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा विजय निश्चित आहे, असा दावा पक्षाच्या प्रवक्ता प्रियंका चतुर्वेदी यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत केला.लोकमत वृत्तपत्र समूहाच्या ‘नॉलेज सिरीज’ उपक्रमांतर्गत शुक्रवारी झालेल्या ‘इंडिया अ‍ॅण्ड पाकिस्तान : अ डायलॉग विदाऊट बॉर्डर्स’ विषयावरील चर्चासत्रात सहभागी होण्यासाठी त्या नागपुरात आल्या होत्या. काँग्रेसने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. विकास, भ्रष्टाचार व समाजवादी पक्षाच्या कार्यकाळात उत्तर प्रदेशची झालेली दुर्दशा हे प्रचाराचे मुख्य मुद्दे असतील. तसेच, महिला व युवा सशक्तीकरणावर भर दिला जाईल. उत्तर प्रदेशातील मतदारांचा काँग्रेसला भक्कम पाठिंबा आहे. यामुळे निवडणुकीत काँग्रेसचा विजय निश्चित आहे, असा दावा चतुर्वेदी यांनी केला.आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ व पुदुचेरी येथील निवडणुकांतून काँग्रेसबाबत अनेक सकारात्मक बाबी पुढे आल्या. आसाम येथे काँग्रेसचा पराभव झाला असला तरी, नागरिकांचा पाठिंबा कमी झाला नाही. शिवाय कोणत्याही पक्षाला एका राज्यात चौथ्यांदा विजय मिळविणे कठीण असते. आसाम येथे काँग्रेसने १५ वर्षे राज्य केले. पश्चिम बंगाल व केरळ येथे काँग्रेस दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष आहे. पुदुचेरीत काँग्रेसचे शासन आले असून तामिळनाडूमध्येही अनेक जागांवर विजय मिळाला आहे, असे त्यांनी सांगितले. राहुल गांधी यांच्यामध्ये काँग्रेसचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे. त्यांच्यामुळे पक्षातील युवकांमध्ये आत्मविश्वास जागृत झाला आहे. इतर पक्षातील नेत्यांकडून त्यांच्यावर होत असलेल्या टीकेला काहीच महत्त्व नाही. परंतु, राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष होणार की, नाही यावर आताच काही बोलता येणार नाही. असे निर्णय काँग्रेस कार्यकारिणी घेते. मात्र, राहुल गांधी यांनी पक्षाचे अध्यक्षपद सांभाळावे यावर सर्वांचे एकमत आहे, असे सांगून चतुर्वेदी म्हणाल्या, वरिष्ठ नेत्यांकडे भाजपाप्रमाणे दुर्लक्ष केले जाणार नाही. ते पक्षाचा आधारस्तंभ आहेत. त्यांना नवीन जबाबदाऱ्या दिल्या जातील, असे चतुर्वेदी यांनी सांगितले.