शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
2
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
3
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
4
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
5
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
6
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!
7
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी! रिलायन्स-टाटासह 'या' शेअर्स ठरले हिरो; कुठे झाली घसरण?
8
"तेजस्विनीचा रात्री ११ वाजता फोन आला अन्...", सुचित्रा बांदेकरांनी सांगितलं नक्की काय घडलं?
9
Thane Rain: कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ
10
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
11
४४ रुपयांच्या स्मॉलकॅप स्टॉकमध्ये तेजी; ५ वर्षात दिला ४०,०००% रिटर्न, FII नं वाढवला हिस्सा
12
नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद
13
विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या नेत्याचे निलंबन भाजपकडून रद्द, राणेंची डोकेदुखी वाढणार?
14
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाच्या आगमनाला उरले ८ दिवस, घराबाहेर काढा 'या' वस्तू; ज्यामुळे राहू केतू करतात अमंगल!
15
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे महाराष्ट्राचं 'मिनी काश्मीर'! तुम्ही कधी फिरायला गेलात का?
16
नोकरी खाजगी, पैसा सरकारी! पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजनेचं पोर्टल सुरू, किती मिळणार पैसे?
17
फक्त १० वर्षांत कोट्यधीश होण्याची संधी! पती-पत्नीसाठी आर्थिक तज्ज्ञांनी सांगितला ‘स्मार्ट’ गुंतवणूक प्लॅन
18
आईने दोन पेग घेतले, त्यानंतर..., निळ्या ड्रमातील मृतदेह प्रकरणात मुलाने दिली धक्कादायक माहिती  
19
Asia Cup 2025 : त्याची काही चूक नाही, पण... आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? पुन्हा तोच रिप्लाय
20
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?

विदर्भातील कापसासाठी प्रियदर्शिनी सुरू होणे जरुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 03:55 IST

यवतमाळची प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणी पुन्हा सुरू करणे ही काळाची गरज आहे. कारण, त्यामुळे परंपरागत कापूस आधारित अर्थव्यवस्था यवतमाळ जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण विदर्भात आणणे शक्य होणार आहे.

सोपान पांढरीपांडे ।नागपूर : यवतमाळची प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणी पुन्हा सुरू करणे ही काळाची गरज आहे. कारण, त्यामुळे परंपरागत कापूस आधारित अर्थव्यवस्था यवतमाळ जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण विदर्भात आणणे शक्य होणार आहे.यवतमाळ जिल्ह्याचे मोठे दुर्भाग्य म्हणजे या जिल्ह्यात राज्याचा २५ टक्के कापूस पिकतो; परंतु कापसाचे मूल्यवर्धन करणाºया सूतगिरण्या नसल्यामुळे यवतमाळची ओळख देशातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्यांचा जिल्हा म्हणून झाली आहे. चालू वर्षाच्या पहिल्या सात महिन्यांत १४४ आत्महत्या झाल्या.राज्य सरकारने विविध भागांचा समतोल विकास साधण्यासाठी जी इंटर रिजनल कमिटी (आयआरसी)च्या अहवालानुसार २०१५-१६ साली राज्यात कापसाचे उत्पादन ८० लाख गासड्या झाले. त्यापैकी एकट्या यवतमाळ जिल्ह्यात २१.२१ लाख गासड्या कापूस पिकला. दुर्दैवाने यवतमाळ जिल्ह्यात फक्त दोन सूतगिरण्या असून त्यापैकी प्रियदर्शिनी गिरणी बंद आहे. पुसदनजीकची बाबासाहेब नाईक सूतगिरणी रडतखडत सुरू आहे. या बिकट स्थितीमुळे यवतमाळ जिल्ह्यातील कापसावर इचलकरंजी, कोल्हापूर, भिवंडी तसेच आंध्र प्रदेश, मध्यप्रदेश व गुजरातमधील सूतगिरण्या चालत आहेत. विदर्भात १९७०पूर्वी १३ कॉम्पोझिट कापड गिरण्या होत्या. त्या सर्व २००० सालापर्यंत बंद पडल्या. त्यामुळे प्रियदर्शिनी सूतगिरणीचे अध्यक्ष व ‘लोकमत’चे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा हे या गिरणीला सुरू करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत आहेत. यासाठी ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह वित्त व वस्त्रोद्योग विभागाच्या उच्चाधिकाºयांना अनेक वेळा भेटले आहेत व बराच पत्रव्यवहारही झाला आहे.