शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
3
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
4
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
5
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
6
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
7
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
8
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
9
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
10
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
11
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
12
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
13
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
14
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
15
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
16
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
17
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
18
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
19
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
20
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 

खासगीकरणाचा मुद्दाच नाही

By admin | Updated: July 7, 2015 04:28 IST

‘आंदोलन मागे घ्या नाहीतर एफटीआयचे खासगीकरण करू,’ असे संकेत चर्चेदरम्यान केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने दिले असल्याचे एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी सांगितले होते.

पुणे : ‘आंदोलन मागे घ्या नाहीतर एफटीआयचे खासगीकरण करू,’ असे संकेत चर्चेदरम्यान केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने दिले असल्याचे एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी सांगितले होते. मात्र, मंत्रालयाने ‘आम्ही असे बोललो नाही,’ असे स्पष्टीकरण देत विद्यार्थ्यांनी केलेला आरोप फेटाळून लावला. ‘सेंटर आॅफ एक्सिल्न्स’चा दर्जा दिल्याने फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया ही संस्था बदलाच्या अवस्थेत आहे. दिल्ली येथे माहिती व प्रसारण मंत्रालयाबरोबर विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेदरम्यान अभ्याक्रमाविषयी, प्रशासकीय प्रश्नांविषयी चर्चा झाली. एकंदरीत चर्चेचा सूर सकारात्मक होता. मात्र, या वेळी संस्थेचे खासगीकरण केले जाईल, अशी कोणत्याही प्रकारची वाच्यता करण्यात आलेली नसल्याचा खुलासा सोमवारी माहिती व प्रसारण मंत्रालयाने केला आहे. यावर मंत्रालयाने ई-मेल पाठवून भूमिका स्पष्ट केली.मंत्रालयाने पाठवलेल्या ई-मेल नुसार, विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाशी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय व अरुण जेटली यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान मंत्रालयाने संस्थेसाठीचा नियोजित आराखडा विद्यार्थ्यांसमोर मांडला. त्यामुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासक्रम व प्रशासकीय प्रश्नांचे निरसन झाले. त्यामुळे चर्चेचा सूर सकारात्मक होता. पण, विद्यार्थ्यांनी केलेल्या संचालक मंडळाच्या बरखास्तीच्या मागणीत ठोस असे मुद्दे नव्हते. त्यामुळे त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. वास्तविक या संबंधी कोणताही आक्षेप घेण्याचा विद्यार्थ्यांना अधिकारच नाही. एफटीआयआयच्या प्रत्येक विद्यार्थ्यामागे शासन प्रत्येक वर्षी १० लाख रुपये खर्च करते. मात्र, अजून येथील २००८चीच बॅच पासआऊट झालेली नाही. निधीचा अभाव असताना व शासन इतका खर्च करते, या पार्श्वभूमीवर एफटीआयआयच्या मागण्यांपेक्षा लहान मुलांच्या प्राथमिक शिक्षण आणि आरोग्याचा प्रश्न अधिक गंभीर आहे. (प्रतिनिधी)-------------------------१ एफटीआयआयला ‘सेंटर आॅफ एक्सिलन्स’चा दर्जा दिल्याने त्यासाठी आवश्यक असणारी पावले सरकार सध्या उचलत आहे. त्यासाठीच संचालक मंडळाची नियुक्ती करण्यात आलेली असून ते पुढील ध्येयधोरणे ठरवणार आहेत. २ एफटीआयआय (पुणे), सत्यजिर रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट (कोलकता) आणि आयआयएमसी (दिल्ली) या तीन संस्था मानवी संसाधन विकास मंत्रालयाअंतर्गत वर्ग करण्यात येणार आहेत. ३ पाच वर्षांचा हा मोठा प्रोजेक्ट असून त्यासाठी तब्बल २०० कोटी रुपये केंद्र सरकार खर्च करणार आहे. शिवाय या वर्षापासून एफटीआयआय येथे नवीन अभ्यासक्रम लागू करण्यात येणार आहे, असे ही या मेलमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.