शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे नीच कृत्य! इंडिगोचे विमान वादळात, २२७ प्रवाशांचा जीव होता धोक्यात; तरीही नाकारली परवानगी
2
'हुंड्याच्या पैशातून उभारलेली घरंदारं, प्रॉपर्टी पेटवून द्या'; वैष्णवी हगवणे प्रकरणात अभिनेते प्रवीण तरडेंची संतप्त पोस्ट
3
IPL 2025 : शाहरुख खान काटावर पास! GT च्या मध्यफळीतील बाकी सर्व नापास; शेवटी LSG नं मारली बाजी
4
"आई-बाबा, मला माफ करा; अपेक्षा पूर्ण करू शकत नाही", लातुरात विद्यार्थिनीने मृत्यूला कवटाळलं
5
Vaishnavi Hagawane: फरार राजेंद्र हगवणेच्या सख्ख्या भावाला पोलिसांनी घेतलं ताब्यात, संशय काय?
6
झारीतील शुक्राचार्यांनी ८ अधिकारी-कर्मचाऱ्यांची केली बेकादेशीर नेमणूक; संजय राठोडांच्या खात्यावर भाजप आमदार जोशींचा आरोप
7
गडचिरोली: ‘माझे आवडते चॅनेल पाहू दिले नाही’ म्हणत घरामागे गेली अन् १० वर्षीय मुलीने संपवलं आयुष्य
8
IPL 2025 : DSP सिराजनं खेळला स्लेजिंगचा डाव; निक्कीनं त्याला असा दिला रिप्लाय (VIDEO)
9
शालार्थ आयडी घोटाळा: बोर्डाचे अध्यक्ष चिंतामण वंजारी ‘एसआयटी’च्या जाळ्यात; शिक्षण विभागाला मोठा हादरा
10
Vaishnavi Hagawane case: अखेर निलेश चव्हाणविरुद्ध गुन्हा दाखल; बाळाला घ्यायला गेल्यानंतर दिली होती धमकी 
11
Vaishnavi Hagawane: हगवणेंचे मित्र, नातेवाईक पोलिसांच्या रडारवर! सुनील चांदेरे यांच्यासह अनेकांची चौकशी 
12
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं! आधी थोरल्यानं मग धाकट्या भावानंही मारली सेंच्युरी
13
आणखी एका हेराला अटक! वाराणसीच्या तुफैलने पाकिस्तानमध्ये भारतातील कोणत्या ठिकाणांची माहिती पाठवली?
14
हगवणे कुटुंबीय हे माझे दूरचे नातेवाईक, वैष्णवीचे मामासासरे IG सुपेकरांनी मांडली बाजू
15
'बाबा, माझी पत्नी आणि तिच्या प्रियकराला सोडू नका', निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाची आत्महत्या
16
Thane: 2.25 कोटींचे ड्रग्ज, तीन पेडलर; तीन महिन्यांपासून फरार महिलेला अखेर बेड्या
17
Kishtwar Encounter: जम्मू- काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण!
18
Vaishnavi Hagawane: 'पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर शशांकचे मामा, त्यांची चौकशी झाली पाहिजे' अंजली दमानियांचे गंभीर आरोप
19
'पाकिस्तानला दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवण्यास सांगा', भारताने तुर्कीला सुनावले
20
मयंतीला फॉलो करणाऱ्या रॉबिन उथप्पाची Live शोमध्ये गंमत; दोघांना बघून गावसकरांना पडला हा प्रश्न

खासगीकरणाचा घाट ‘स्मार्ट’पणे

By admin | Updated: June 26, 2016 03:07 IST

भाजपाच्या निवडणूक जाहीरनाम्यात नवीन शहरांचा मुद्दा होता. पण त्याऐवजी आता ‘जेएनएनयूआरएम’ या योजनेचे नाव बदलून आयटी कंपन्यांच्या दबावाखाली ‘स्मार्ट सिटी’ ही योजना आणण्यात

पुणे : भाजपाच्या निवडणूक जाहीरनाम्यात नवीन शहरांचा मुद्दा होता. पण त्याऐवजी आता ‘जेएनएनयूआरएम’ या योजनेचे नाव बदलून आयटी कंपन्यांच्या दबावाखाली ‘स्मार्ट सिटी’ ही योजना आणण्यात आली आहे. स्मार्ट सिटीसाठी कंपनी स्थापन करणे बंंधनकारक करण्यात आले आहे. त्या माध्यमातून व्यवस्थांचे खासगीकरण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी येथे केला. तसेच केंद्र सरकारने नवीन शहरे उभारण्यासाठी पैसे खर्च करावेत, असेही चव्हाण म्हणाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्यात स्मार्ट सिटी योजनेतील प्रकल्पांचे उद्घाटन झाले. या पार्श्वभूमीवर चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधत या योजनेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले, स्मार्ट सिटी या योजनेला आमचा मुळापासून विरोध आहे. त्यांनी यूपीए सरकारच्या ‘जेएनएनयूआरएम’ या योजनेऐवजी स्मार्ट सिटी ही योजना आणली. पंतप्रधान मोदींचे आयटी कंपन्यांमधील अनेक मित्र आहेत. त्यांच्या दबावाखाली ही योजना आणण्यात आली. पण स्मार्ट सिटीची व्याख्या अद्याप केंद्र शासनाला करता आलेली नाही. याबाबत त्यांच्या मनात संभ्रम आहे. विविध शहरांमध्ये नागरीकरण, घनकचरा व्यवस्थापनाचा मोठा प्रश्न आहे. त्यावर केंद्राने खर्च करायला हवा. भाजपाने निवडणूक जाहीरनाम्यात नवीन शहरांचा मुद्दा मांडला होता. नवीन शहरेच निर्माण करण्याची आवश्यकता आहे. मोठ्या शहरांमध्ये सुधारणा करण्यासाठी तेथील महापालिका समर्थ आहेत. त्यासाठी केंद्राने केवळ निधी द्यावा, त्यात हस्तक्षेप करू नये. पण स्मार्ट सिटी विकास महामंडळ स्थापन करण्याचे बंधन घालून केंद्र सरकार खासगीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे. याला आमचा विरोध आहे. ७४व्या घटनादुरुस्तीने मिळालेले अधिकार हिसकावून घेण्याचा हा प्रयत्न आहे, असा आरोप चव्हाण यांनी केला. (प्रतिनिधी)स्मार्ट सिटी योजनेत शहरांची निवड करताना पक्षपात करण्यात आला. भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांमधील प्रमुख शहरांना वगळण्यात आले. पिंपरी-चिंचवड शहरावरही अन्याय करण्यात आला. निकष बदलून मुंबईचा समावेश करण्यात आला. निधीचे वाटप करतानाही पक्षपात झाला आहे. ११ हजार लोकसंख्या असलेले शहर व मुंबईसारख्या शहरालाही वर्षाला १०० कोटी रुपयेच मिळणार आहेत. शहरांचे लोकसंख्येनुसार वर्गीकरण करून निधी द्यायला हवा.- पृथ्वीराज चव्हाण