शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

खासगीकरणाचा घाट ‘स्मार्ट’पणे

By admin | Updated: June 26, 2016 03:07 IST

भाजपाच्या निवडणूक जाहीरनाम्यात नवीन शहरांचा मुद्दा होता. पण त्याऐवजी आता ‘जेएनएनयूआरएम’ या योजनेचे नाव बदलून आयटी कंपन्यांच्या दबावाखाली ‘स्मार्ट सिटी’ ही योजना आणण्यात

पुणे : भाजपाच्या निवडणूक जाहीरनाम्यात नवीन शहरांचा मुद्दा होता. पण त्याऐवजी आता ‘जेएनएनयूआरएम’ या योजनेचे नाव बदलून आयटी कंपन्यांच्या दबावाखाली ‘स्मार्ट सिटी’ ही योजना आणण्यात आली आहे. स्मार्ट सिटीसाठी कंपनी स्थापन करणे बंंधनकारक करण्यात आले आहे. त्या माध्यमातून व्यवस्थांचे खासगीकरण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी येथे केला. तसेच केंद्र सरकारने नवीन शहरे उभारण्यासाठी पैसे खर्च करावेत, असेही चव्हाण म्हणाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्यात स्मार्ट सिटी योजनेतील प्रकल्पांचे उद्घाटन झाले. या पार्श्वभूमीवर चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधत या योजनेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले, स्मार्ट सिटी या योजनेला आमचा मुळापासून विरोध आहे. त्यांनी यूपीए सरकारच्या ‘जेएनएनयूआरएम’ या योजनेऐवजी स्मार्ट सिटी ही योजना आणली. पंतप्रधान मोदींचे आयटी कंपन्यांमधील अनेक मित्र आहेत. त्यांच्या दबावाखाली ही योजना आणण्यात आली. पण स्मार्ट सिटीची व्याख्या अद्याप केंद्र शासनाला करता आलेली नाही. याबाबत त्यांच्या मनात संभ्रम आहे. विविध शहरांमध्ये नागरीकरण, घनकचरा व्यवस्थापनाचा मोठा प्रश्न आहे. त्यावर केंद्राने खर्च करायला हवा. भाजपाने निवडणूक जाहीरनाम्यात नवीन शहरांचा मुद्दा मांडला होता. नवीन शहरेच निर्माण करण्याची आवश्यकता आहे. मोठ्या शहरांमध्ये सुधारणा करण्यासाठी तेथील महापालिका समर्थ आहेत. त्यासाठी केंद्राने केवळ निधी द्यावा, त्यात हस्तक्षेप करू नये. पण स्मार्ट सिटी विकास महामंडळ स्थापन करण्याचे बंधन घालून केंद्र सरकार खासगीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे. याला आमचा विरोध आहे. ७४व्या घटनादुरुस्तीने मिळालेले अधिकार हिसकावून घेण्याचा हा प्रयत्न आहे, असा आरोप चव्हाण यांनी केला. (प्रतिनिधी)स्मार्ट सिटी योजनेत शहरांची निवड करताना पक्षपात करण्यात आला. भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांमधील प्रमुख शहरांना वगळण्यात आले. पिंपरी-चिंचवड शहरावरही अन्याय करण्यात आला. निकष बदलून मुंबईचा समावेश करण्यात आला. निधीचे वाटप करतानाही पक्षपात झाला आहे. ११ हजार लोकसंख्या असलेले शहर व मुंबईसारख्या शहरालाही वर्षाला १०० कोटी रुपयेच मिळणार आहेत. शहरांचे लोकसंख्येनुसार वर्गीकरण करून निधी द्यायला हवा.- पृथ्वीराज चव्हाण