शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

खासगीकरणाचा घाट ‘स्मार्ट’पणे

By admin | Updated: June 26, 2016 03:07 IST

भाजपाच्या निवडणूक जाहीरनाम्यात नवीन शहरांचा मुद्दा होता. पण त्याऐवजी आता ‘जेएनएनयूआरएम’ या योजनेचे नाव बदलून आयटी कंपन्यांच्या दबावाखाली ‘स्मार्ट सिटी’ ही योजना आणण्यात

पुणे : भाजपाच्या निवडणूक जाहीरनाम्यात नवीन शहरांचा मुद्दा होता. पण त्याऐवजी आता ‘जेएनएनयूआरएम’ या योजनेचे नाव बदलून आयटी कंपन्यांच्या दबावाखाली ‘स्मार्ट सिटी’ ही योजना आणण्यात आली आहे. स्मार्ट सिटीसाठी कंपनी स्थापन करणे बंंधनकारक करण्यात आले आहे. त्या माध्यमातून व्यवस्थांचे खासगीकरण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी येथे केला. तसेच केंद्र सरकारने नवीन शहरे उभारण्यासाठी पैसे खर्च करावेत, असेही चव्हाण म्हणाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्यात स्मार्ट सिटी योजनेतील प्रकल्पांचे उद्घाटन झाले. या पार्श्वभूमीवर चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधत या योजनेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले, स्मार्ट सिटी या योजनेला आमचा मुळापासून विरोध आहे. त्यांनी यूपीए सरकारच्या ‘जेएनएनयूआरएम’ या योजनेऐवजी स्मार्ट सिटी ही योजना आणली. पंतप्रधान मोदींचे आयटी कंपन्यांमधील अनेक मित्र आहेत. त्यांच्या दबावाखाली ही योजना आणण्यात आली. पण स्मार्ट सिटीची व्याख्या अद्याप केंद्र शासनाला करता आलेली नाही. याबाबत त्यांच्या मनात संभ्रम आहे. विविध शहरांमध्ये नागरीकरण, घनकचरा व्यवस्थापनाचा मोठा प्रश्न आहे. त्यावर केंद्राने खर्च करायला हवा. भाजपाने निवडणूक जाहीरनाम्यात नवीन शहरांचा मुद्दा मांडला होता. नवीन शहरेच निर्माण करण्याची आवश्यकता आहे. मोठ्या शहरांमध्ये सुधारणा करण्यासाठी तेथील महापालिका समर्थ आहेत. त्यासाठी केंद्राने केवळ निधी द्यावा, त्यात हस्तक्षेप करू नये. पण स्मार्ट सिटी विकास महामंडळ स्थापन करण्याचे बंधन घालून केंद्र सरकार खासगीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे. याला आमचा विरोध आहे. ७४व्या घटनादुरुस्तीने मिळालेले अधिकार हिसकावून घेण्याचा हा प्रयत्न आहे, असा आरोप चव्हाण यांनी केला. (प्रतिनिधी)स्मार्ट सिटी योजनेत शहरांची निवड करताना पक्षपात करण्यात आला. भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांमधील प्रमुख शहरांना वगळण्यात आले. पिंपरी-चिंचवड शहरावरही अन्याय करण्यात आला. निकष बदलून मुंबईचा समावेश करण्यात आला. निधीचे वाटप करतानाही पक्षपात झाला आहे. ११ हजार लोकसंख्या असलेले शहर व मुंबईसारख्या शहरालाही वर्षाला १०० कोटी रुपयेच मिळणार आहेत. शहरांचे लोकसंख्येनुसार वर्गीकरण करून निधी द्यायला हवा.- पृथ्वीराज चव्हाण