शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
4
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
5
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
6
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
7
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
8
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
9
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
10
मुत्सद्देगिरी आणि सैन्यदलांचं निर्विवाद यश!
11
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
12
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
13
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
14
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
15
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
16
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
17
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
18
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
19
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 
20
उद्धव ठाकरे ‘धनुष्यबाणा’साठी पुन्हा सक्रिय; याचिकेवर सुनावणी घेण्याची मागणी

जामिनाच्या प्रतीक्षेत वैफल्यग्रस्त झाल्याने कैद्याची आत्महत्या

By admin | Updated: September 21, 2016 03:52 IST

सिराज अलम रमजानअली शेख (२७) या बंदीवानाचे मृतदेह शवविच्छेदन झाल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी मंगळवारी ताब्यात घेतले.

ठाणे : ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात आत्महत्या करणाऱ्या सिराज अलम रमजानअली शेख (२७) या बंदीवानाचे मृतदेह शवविच्छेदन झाल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी मंगळवारी ताब्यात घेतले. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नसले तरी, एक वर्षापासून जामीन होत नसल्याने वैफल्यग्रस्त झाल्याने त्याने आत्महत्या केल्याची शक्यता आहे.मुंबईच्या बोरिवलीतील एका मुलीचे अपहरण आणि बलात्कार केल्याच्या आरोपाखाली त्याला २०१५ मध्ये समतानगर पोलिसांनी अटक केली होती. ताब्यात घेत असताना, त्याने मिळालेल्या संधीचा फायदा उचलून तिथून पळ काढला होता. याचदरम्यान, त्याला न्यायालयीन कोठडी मिळाल्याने त्याची रवानगी तळोजा कारागृहात झाली. तिथून फेब्रुवारी २०१६ मध्ये त्याला ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात आणले होते. येथील फॅक्टरीत छोटे-मोठे काम तो करीत असे. नेहमीप्रमाणे सोमवारीही तो इतर बंदीवानाप्रमाणे काम करण्यास गेला होता. तेव्हाच त्या फॅक्टरीच्या मागील शौचालयात जाऊन त्याने टॉवेलने गळफास घेऊन आत्महत्या केली. संध्याकाळी कारागृह प्रशासनाकडून बंदीवानांची मोजणी करण्यात आली, त्यावेळी एक जण कमी असल्याचे निदर्शनास आल्यावर बॅरेज, फॅक्टरीत येथे शोध घेतला असता तो शौचालयात आढळला.