शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
3
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
4
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
5
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
6
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
7
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
8
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
9
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
10
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
11
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
12
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
13
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
14
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
15
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
16
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
17
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
18
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
19
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
20
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत

गुजरातच्या गुरांना महाराष्ट्रात बंदी

By admin | Updated: February 10, 2015 02:33 IST

महाराष्ट्रातील टंचाईग्रस्त गावांची संख्या १८ हजारांवरून २४ हजार एवढी वाढल्याने राज्यातील चारा बाहेरील राज्यांत घेऊन जाण्यावर बंदी

मुंबई : महाराष्ट्रातील टंचाईग्रस्त गावांची संख्या १८ हजारांवरून २४ हजार एवढी वाढल्याने राज्यातील चारा बाहेरील राज्यांत घेऊन जाण्यावर बंदी घालताना गुजरात राज्यातून काठेवाडी समाजासोबत येणाऱ्या गुरांवर बंदी घातली आहे. याची अंमलबजावणी या महिन्यापासून सुरू झाली आहे. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितले की, राज्यातील टंचाईग्रस्त गावांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मराठवाड्यात परिस्थिती दिवसागणिक भीषण होण्याची चिन्हे दिसत आहेत. गुजरातमधून दरवर्षी लक्षावधी गुरेढोरे चाऱ्याच्या शोधात महाराष्ट्रात येतात. यंदा उन्हाळ््यात महाराष्ट्रात चाऱ्याची टंचाई जाणवेल अशी स्थिती असल्याने हा निर्णय घेतला आहे. महसूल विभागात सर्वाधिक भ्रष्टाचार होत असल्याची आकडेवारी समोर आल्याने खात्याचे प्रधान सचिव व सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव यांना या समस्येचे मूळ शोधण्यास सांगितले होते. महसूल खात्यातील ७० टक्के भ्रष्टाचार तलाठी व सर्कल स्तरावर होत असल्याचे आढळून आले. सातबाराचे उतारे देताना किंवा नोंदीची फेरफार करताना भ्रष्टाचार होत असल्याने सातबारा उतारे सही-शिक्क्यासह आॅनलाईन देण्यास सुरुवात केली आहे. नोंदींच्या फेरफारीकरिता इ-फेरफार करण्याची योजना लागू केली असून लवकरच ती ९० टक्के तालुक्यांत अमलात आणली जाईल, असे खडसे यांनी सांगितले. यामुळे येत्या काही दिवसांत महसूल खात्यामधील भ्रष्टाचार आटोक्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. खात्यामधील बदल्याचे अधिकार विकेंद्रीत केले असल्याचेही त्यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)