शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
3
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
4
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
5
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
6
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
7
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
8
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
9
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
10
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
11
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
12
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
13
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
14
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
15
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
16
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
17
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
18
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
19
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
20
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण

गुजरातच्या गुरांना महाराष्ट्रात बंदी

By admin | Updated: February 10, 2015 02:33 IST

महाराष्ट्रातील टंचाईग्रस्त गावांची संख्या १८ हजारांवरून २४ हजार एवढी वाढल्याने राज्यातील चारा बाहेरील राज्यांत घेऊन जाण्यावर बंदी

मुंबई : महाराष्ट्रातील टंचाईग्रस्त गावांची संख्या १८ हजारांवरून २४ हजार एवढी वाढल्याने राज्यातील चारा बाहेरील राज्यांत घेऊन जाण्यावर बंदी घालताना गुजरात राज्यातून काठेवाडी समाजासोबत येणाऱ्या गुरांवर बंदी घातली आहे. याची अंमलबजावणी या महिन्यापासून सुरू झाली आहे. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितले की, राज्यातील टंचाईग्रस्त गावांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मराठवाड्यात परिस्थिती दिवसागणिक भीषण होण्याची चिन्हे दिसत आहेत. गुजरातमधून दरवर्षी लक्षावधी गुरेढोरे चाऱ्याच्या शोधात महाराष्ट्रात येतात. यंदा उन्हाळ््यात महाराष्ट्रात चाऱ्याची टंचाई जाणवेल अशी स्थिती असल्याने हा निर्णय घेतला आहे. महसूल विभागात सर्वाधिक भ्रष्टाचार होत असल्याची आकडेवारी समोर आल्याने खात्याचे प्रधान सचिव व सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव यांना या समस्येचे मूळ शोधण्यास सांगितले होते. महसूल खात्यातील ७० टक्के भ्रष्टाचार तलाठी व सर्कल स्तरावर होत असल्याचे आढळून आले. सातबाराचे उतारे देताना किंवा नोंदीची फेरफार करताना भ्रष्टाचार होत असल्याने सातबारा उतारे सही-शिक्क्यासह आॅनलाईन देण्यास सुरुवात केली आहे. नोंदींच्या फेरफारीकरिता इ-फेरफार करण्याची योजना लागू केली असून लवकरच ती ९० टक्के तालुक्यांत अमलात आणली जाईल, असे खडसे यांनी सांगितले. यामुळे येत्या काही दिवसांत महसूल खात्यामधील भ्रष्टाचार आटोक्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. खात्यामधील बदल्याचे अधिकार विकेंद्रीत केले असल्याचेही त्यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)