शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
3
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
4
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
5
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
6
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
7
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
8
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
9
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
10
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
11
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
12
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
13
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
14
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
15
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
16
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
17
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
18
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
19
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
20
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली

माथाडी कामगारांना थेट पणनमध्येही प्राधान्य

By admin | Updated: July 4, 2016 03:09 IST

कृषी उत्पन्न बाजार समितीमधील नोंदीत कामगारांना थेट पणन धोरणामध्येही स्थान दिले जाईल.

नवी मुंबई : कृषी उत्पन्न बाजार समितीमधील नोंदीत कामगारांना थेट पणन धोरणामध्येही स्थान दिले जाईल. मार्केटबाहेरील कामांमध्येही त्यांना प्राधान्य दिले जाणार असल्याचे आश्वासन शासनाने दिले आहे. शासनाच्या या निर्णयाचे माथाडी संघटनेने स्वागत केले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ मध्ये सुधारणा करून बाजार समितीच्या आवाराबाहेर फळे व भाजीपाला यांचे व्यवहार नियमन मुक्त करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यापूर्वी व्यापारी व कामगार या सर्वांचे मत विचारात घेण्यासाठी उपसमिती स्थापन केली होती. समितीची बैठक २ जूनला आयोजित केली होती. या बैठकीमध्ये माथाडी कामगार, वारणार, मापाडी कामगारांबाबत सकारात्मक विचार करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. याशिवाय मार्केटबाहेर शेतकऱ्यांची फसवणूक होवू नये यासाठी स्वतंत्र नियमावली तयार करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाप्रमाणे लवकरच अधिसूचना काढण्यात येणार आहे. या बैठकीला पणन व सहकार मंत्री चंद्रकांत पाटील, दिवाकर रावते, राम शिंदे, दादाजी भुसे, प्रवीण पोटे, अप्पर मुख्य सचिव सुनील पोरवाल उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते आमदार शशिकांत शिंदे, नरेंद्र पाटील व युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी गत आठवड्यात मुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी झालेल्या चर्चेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामगारांचे सर्व प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते. (प्रतिनिधी)