शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईच्या सुरक्षेवरील कृती अहवाल अधिवेशन संपण्यापूर्वी मांडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 05:56 IST

विरोधकांची मागणी : २६/११च्या दहा वर्षांनंतरही असुरक्षिततेची भावना

मुंबई : २६/११च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर माजी केंद्रीय सचिव राम प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीच्या अहवालातील शिफारसींवर राज्य सरकारने कार्यवाही केलेली नाही. चार वर्षांत मुंबईच्या सुरक्षेबाबत एकही बैठक झाली नाही. त्यामुळे हे सरकार बेजबाबदार असल्याचा आरोप करत, विरोधकांनी सोमवारी प्रधान समितीच्या अहवालावरील कृती अहवाल सादर करण्याची मागणी केली.

२६/११च्या दहशतवादी हल्ल्याला दहा वर्षे झाली. या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना आणि सुरक्षा यंत्रणातील जवानांना सभागृहात श्रद्धांजली वाहण्यात आली. या श्रद्धांजली प्रस्तावावर बोलताना विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.

राम प्रधान यांच्या समितीने तीन महिन्यांत मुंबईच्या सुरक्षेबाबतचा परिपूर्ण अहवाल सरकारला सादर केला. मात्र, दहा वर्षांनंतरही त्यावर सरकारकडून कोणतीच कार्यवाही करण्यात आली नाही.

दहा वर्षांनंतरही मुंबई सुरक्षित नसल्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले. काँग्रेस सदस्य शरद रणपिसे यांनी प्रधान समितीच्या अहवालावरील कृती अहवाल मांडण्यात आला नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. हल्ल्याच्या वेळी काँग्रेस आघाडीचेच म्हणजेच तुमचेच सरकार सत्तेवर होते. त्या वेळी तुम्ही काय केले, असा प्रश्न सभागृहनेते चंद्रकांत पाटील यांनी रणपिसे यांना केला.

‘राजकारण नको, पुनर्वसन करा’उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना, सरकार तुमचे काय आणि आमचे काय, दोन्ही सरकारकडून याबाबत हलगर्जीपणाच झाला, असे रणपिसे म्हणाले. मात्र, आधीच्या किंवा आताच्या सरकारचा मुद्दा नाही. २६/११ नंतर समितीने महत्त्वाच्या शिफारसी केल्या. त्यावर काय कारवाई केली, हे सभागृहाला कळायला हवे. त्यामुळे हिवाळी अधिवेशन संपण्यापूर्वी कृती अहवाल सादर करावा, अशी मागणी रणपिसे यांनी केली. शिवसेना सदस्य नीलम गोºहे यांनी या दहशतवादी हल्ल्यावर कोणतेही राजकारण न करता, हल्ल्यात बळी पडलेल्या सामान्यांचे पुनर्वसनकरण्याची मागणी केली.

टॅग्स :26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्लाVidhan Bhavanविधान भवन