शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

मुंबईच्या सुरक्षेवरील कृती अहवाल अधिवेशन संपण्यापूर्वी मांडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 05:56 IST

विरोधकांची मागणी : २६/११च्या दहा वर्षांनंतरही असुरक्षिततेची भावना

मुंबई : २६/११च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर माजी केंद्रीय सचिव राम प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीच्या अहवालातील शिफारसींवर राज्य सरकारने कार्यवाही केलेली नाही. चार वर्षांत मुंबईच्या सुरक्षेबाबत एकही बैठक झाली नाही. त्यामुळे हे सरकार बेजबाबदार असल्याचा आरोप करत, विरोधकांनी सोमवारी प्रधान समितीच्या अहवालावरील कृती अहवाल सादर करण्याची मागणी केली.

२६/११च्या दहशतवादी हल्ल्याला दहा वर्षे झाली. या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना आणि सुरक्षा यंत्रणातील जवानांना सभागृहात श्रद्धांजली वाहण्यात आली. या श्रद्धांजली प्रस्तावावर बोलताना विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.

राम प्रधान यांच्या समितीने तीन महिन्यांत मुंबईच्या सुरक्षेबाबतचा परिपूर्ण अहवाल सरकारला सादर केला. मात्र, दहा वर्षांनंतरही त्यावर सरकारकडून कोणतीच कार्यवाही करण्यात आली नाही.

दहा वर्षांनंतरही मुंबई सुरक्षित नसल्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले. काँग्रेस सदस्य शरद रणपिसे यांनी प्रधान समितीच्या अहवालावरील कृती अहवाल मांडण्यात आला नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. हल्ल्याच्या वेळी काँग्रेस आघाडीचेच म्हणजेच तुमचेच सरकार सत्तेवर होते. त्या वेळी तुम्ही काय केले, असा प्रश्न सभागृहनेते चंद्रकांत पाटील यांनी रणपिसे यांना केला.

‘राजकारण नको, पुनर्वसन करा’उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना, सरकार तुमचे काय आणि आमचे काय, दोन्ही सरकारकडून याबाबत हलगर्जीपणाच झाला, असे रणपिसे म्हणाले. मात्र, आधीच्या किंवा आताच्या सरकारचा मुद्दा नाही. २६/११ नंतर समितीने महत्त्वाच्या शिफारसी केल्या. त्यावर काय कारवाई केली, हे सभागृहाला कळायला हवे. त्यामुळे हिवाळी अधिवेशन संपण्यापूर्वी कृती अहवाल सादर करावा, अशी मागणी रणपिसे यांनी केली. शिवसेना सदस्य नीलम गोºहे यांनी या दहशतवादी हल्ल्यावर कोणतेही राजकारण न करता, हल्ल्यात बळी पडलेल्या सामान्यांचे पुनर्वसनकरण्याची मागणी केली.

टॅग्स :26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्लाVidhan Bhavanविधान भवन