शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

मुंबईच्या सुरक्षेवरील कृती अहवाल अधिवेशन संपण्यापूर्वी मांडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 05:56 IST

विरोधकांची मागणी : २६/११च्या दहा वर्षांनंतरही असुरक्षिततेची भावना

मुंबई : २६/११च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर माजी केंद्रीय सचिव राम प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीच्या अहवालातील शिफारसींवर राज्य सरकारने कार्यवाही केलेली नाही. चार वर्षांत मुंबईच्या सुरक्षेबाबत एकही बैठक झाली नाही. त्यामुळे हे सरकार बेजबाबदार असल्याचा आरोप करत, विरोधकांनी सोमवारी प्रधान समितीच्या अहवालावरील कृती अहवाल सादर करण्याची मागणी केली.

२६/११च्या दहशतवादी हल्ल्याला दहा वर्षे झाली. या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना आणि सुरक्षा यंत्रणातील जवानांना सभागृहात श्रद्धांजली वाहण्यात आली. या श्रद्धांजली प्रस्तावावर बोलताना विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.

राम प्रधान यांच्या समितीने तीन महिन्यांत मुंबईच्या सुरक्षेबाबतचा परिपूर्ण अहवाल सरकारला सादर केला. मात्र, दहा वर्षांनंतरही त्यावर सरकारकडून कोणतीच कार्यवाही करण्यात आली नाही.

दहा वर्षांनंतरही मुंबई सुरक्षित नसल्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले. काँग्रेस सदस्य शरद रणपिसे यांनी प्रधान समितीच्या अहवालावरील कृती अहवाल मांडण्यात आला नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. हल्ल्याच्या वेळी काँग्रेस आघाडीचेच म्हणजेच तुमचेच सरकार सत्तेवर होते. त्या वेळी तुम्ही काय केले, असा प्रश्न सभागृहनेते चंद्रकांत पाटील यांनी रणपिसे यांना केला.

‘राजकारण नको, पुनर्वसन करा’उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना, सरकार तुमचे काय आणि आमचे काय, दोन्ही सरकारकडून याबाबत हलगर्जीपणाच झाला, असे रणपिसे म्हणाले. मात्र, आधीच्या किंवा आताच्या सरकारचा मुद्दा नाही. २६/११ नंतर समितीने महत्त्वाच्या शिफारसी केल्या. त्यावर काय कारवाई केली, हे सभागृहाला कळायला हवे. त्यामुळे हिवाळी अधिवेशन संपण्यापूर्वी कृती अहवाल सादर करावा, अशी मागणी रणपिसे यांनी केली. शिवसेना सदस्य नीलम गोºहे यांनी या दहशतवादी हल्ल्यावर कोणतेही राजकारण न करता, हल्ल्यात बळी पडलेल्या सामान्यांचे पुनर्वसनकरण्याची मागणी केली.

टॅग्स :26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्लाVidhan Bhavanविधान भवन