शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
3
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
4
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
5
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
6
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
7
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
8
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
9
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
10
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
11
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
12
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
13
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
14
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
15
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
16
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
17
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
18
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
19
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
20
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?

गृहविभागाच्या प्रधान सचिवांना स्वत: शपथपत्र दाखल करण्याचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2017 21:11 IST

राज्याच्या गृह विभागाचे प्रधान सचिव यांनी १६ फेब्रुवारी अथवा त्यापुर्वी स्वत: शपथपत्र दाखल करावे, असे निर्देश दिले आहेत.

ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. 8 - शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनींच्या छेडछाडीच्या वाढत्या प्रकरणांची गंभीर दखल घेऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. के. के. सोनवणे यांनी राज्याच्या गृह विभागाचे प्रधान सचिव यांनी १६ फेब्रुवारी अथवा त्यापूर्वी स्वत: शपथपत्र दाखल करावे, असे निर्देश दिले आहेत. या संदर्भातील याचिकेवर २० फेब्रुवारी २०१७ रोजी पुढील सुनावणी होणार आहे. औरंगाबाद शहरातील एका अल्पवयीन महाविद्यालयीन विद्यार्थिनीच्या पित्याने दाखल केलेल्या फौजदारी याचिकेच्या अनुषंगाने खंडपीठाने वरीलप्रमाणे आदेश दिले आहेत. फौजदारी याचिका दाखलपीडित मुलीच्या वडिलांनी याचिकेत म्हटल्यानुसार त्यांच्या मुलीला अज्ञात इसम भ्रमणध्वनीद्वारे (मोबाईलद्वारे) अश्लील लघु संदेश (एसएमएस) पाठवून वेळोवेळी कॉल करतो. सदर अज्ञात इसम त्यांच्या मुलीचा पिच्छा पुरवत आहे. त्याच्या लघु संदेशांमुळे आणि मुलीच्या छेडछाडीमुळे संपूर्ण कुटुंब दहशतीच्या सावटाखाली आहे. त्यांची मुलगी महाविद्यालयात जाण्यास आणि शिकवणीच्या वर्गात हजर राहण्यास घाबरत आहे. या छेडछाडीसंदर्भात पीडितेच्या वडिलांनी जिन्सी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. तसेच पोलीस आयुक्तांना सुद्धा यासंदर्भात तक्रार अर्ज दिला होता. जिन्सी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता. म्हणून त्यांनी अ‍ॅड. सुदर्शन जी. साळुंके यांच्यामार्फत औरंगाबाद खंडपीठात फौजदारी याचिका दाखल केली आहे. शहरात छेडछाड प्रकरणात वाढयाचिकाकर्त्याने याचिकेत असेही म्हटले आहे की, गेल्या दोन-तीन वर्षांत औरंगाबाद शहरात अनेक विद्यार्थिनींनी छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केल्या आहेत. पोलिसांच्या असंवेदनशीलतेमुळे छेडछाडीच्या प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. मुलींची छेडछाड करणाऱ्यांवर पोलीस यंत्रणेचा कोणताही धाक राहिलेला नाही. अशा आरोपींची हिंमत दिवसेंदिवस वाढत आहे. म्हणून विद्यार्थिनींची छेडछाड करणाऱ्या आरोपींविरुद्ध ठोस कार्यवाही करण्याचे आदेश गृह विभाग, औरंगाबादचे पोलीस आयुक्त आणि औरंगाबादेतील जिन्सी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना द्यावेत, अशी विनंती याचिकाकर्त्याने केली आहे. या प्रकरणात याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. सुदर्शन जी. साळुंके तर शासनातर्फे सहायक सरकारी वकील प्रीती डिग्गीकर काम पाहत आहेत.