शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

अर्धवेळ संरक्षणमंत्री परवडणारा नाही, कॉंग्रेस लिहिणार पंतप्रधानाना पत्र

By admin | Updated: September 19, 2016 19:50 IST

सीमे पलिकडून अतिरेकी येऊन लष्करी छावण्यांवर प्राणघातक हल्ले करीत असताना देशाला अर्धवेळ संरक्षणमंत्री परवडणारा नाही असा टोला कॉंग्रेसने संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांना हाणला आहे

ऑनलाइन लोकमतपणजी, दि. १९ : सीमे पलिकडून अतिरेकी येऊन लष्करी छावण्यांवर प्राणघातक हल्ले करीत असताना देशाला अर्धवेळ संरक्षणमंत्री परवडणारा नाही असा टोला कॉंग्रेसने संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांना हाणला आहे. गोव्यातील राजकारणात अधिक रस घेऊन पर्रीकर यांचे वारंवार गोव्यात येण्याच्या प्राकाराची गंभीर दखल घेतली जावी यासाठी मुख्यमंत्र्यांना कॉंग्रेस पक्षातर्फे पत्र लिहिले जाणार असल्याची माहिती पक्षाचे प्रवक्ते सुनिल कवठणकर यांनी दिली.

देशाच्या सीमेवर आकांडतांडव माजले असता संरक्षणमंत्री गोव्यात राजकारण करीत आहेत हे चित्र वारंवार पाहायला मिळत आहे ते देशासाठी घातक तर आहेच, परंतु गोव्याच्या दृष्टीने लज्जास्पदही आहे असे कवठणकर यांनी सांगितले. आपल्या परवानगी शिवाय किटकही प्रवेश करू शकत नाही अशा बढाया मारत असतानाच पठाणकोट हल्ला आणि उरी येथील हल्ला झाला. हे अतिरेकी काय संरक्षण मंत्र्यांची परवानगी घेऊन आत शिरले होते काय असा प्रस्नही कवठणकर यांनी केला. कॉंग्रेस राजवटीत सीमेवर एखादी घटना जरी घडली तरी मोठ मोठ्या गर्जना आणि चिथावण्या देणारे आता कुठे झोपले आहेत असे त्यांनी विचारले.

पर्रीकर यांना एक तर संरक्षणमंत्री म्हणून ठेवावे किंवा त्यांना कायमचा गोव्यात तरी पाठवावे, परंतु असे तळ््यात मळ््यात करणारे संरक्षणमंत्री म्हणून ठेवू नये अशी मागणी करणारे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहीणार असल्याचे त्यांनी सांगितले.राज्यात भाजप सरकारने जनतेचा विश्वास घात केला आहे. त्यामुळे पुन्हा निवडणुकीला सामोरे जाण्याचे धाडस या पक्षाकडे नाही. मोफत इंटरनेट देण्याच्या घोषणा ह्या त्यामुळेच करण्यात आल्या आहेत. परंतु मोफत इंटरनेट देऊन तरुणांची मते विकत घेता येतात या समजुतीत सरकारने राहू नये. गोव्यातील युवकही विकावू नाहीत आणि महिलाही गृहआधार घेऊन मते विकणार नाहीत असे त्यांनी सांगितले.