शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
5
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
6
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
7
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
8
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
9
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
10
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
11
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
12
ऑनलाइन गेमिंग विधेयकावरुन अनुपम मित्तल यांची सरकारवर टीका; म्हणाले 'या निर्णयामुळे थेट...'
13
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
14
श्रावण शनि अमावास्या: शनिदोष, प्रतिकूल प्रभाव कसा ओळखावा? ‘हे’ ५ उपाय तारतील, कृपा होईल!
15
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
16
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
17
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
18
युद्ध थांबण्याचे नाव नाही! रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; एकाच वेळी डागली ४० क्षेपणास्त्र
19
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
20
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विदेश दौरे फायद्याचेच

By admin | Updated: September 27, 2015 05:34 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विदेश दौऱ्यांवरील टीका कानावर पडते. परंतु प्रत्यक्षात त्यांच्या या दौऱ्यांमुळे जागतिकस्तरावर भारताची प्रतिमा उंचावते आहे.

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विदेश दौऱ्यांवरील टीका कानावर पडते. परंतु प्रत्यक्षात त्यांच्या या दौऱ्यांमुळे जागतिकस्तरावर भारताची प्रतिमा उंचावते आहे. विविध करारांमधून विदेशी गुंतवणूक देशात येण्यासंदर्भातील मार्ग मोकळे होत आहेत, या शब्दात प्रसिद्ध उद्योगपती राहुल बजाज यांनी मोदी यांच्या कार्यप्रणालीला ‘अ’ दर्जा दिला आहे.काही आठवड्यांपूर्वी बजाज यांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली होती, हे विशेष. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या कोनशिला सोहळ्याला आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. विकास लगेच होत नसतो. त्यामुळे ‘अच्छे दिन’ लगेच येणार नाहीत. गेल्या १६ महिन्यांत केंद्र सरकारकडून आश्वासक कामगिरी झाली आहे. उद्योगक्षेत्रात सकारात्मक वातावरण निर्माण होत आहे व हे देशासाठी सकारात्मक संकेत आहेत. १६ महिन्यांत सरकारच्या कामकाजाचे मूल्यांकन करणे योग्य होणार नाही. त्यामुळे वेळ दिला पाहिजे, असे मत बजाज यांनी व्यक्त केले. केंद्र शासनातील बहुतांश मंत्री चांगले काम करीत आहेत. परंतु मंत्रिमंडळात काही फेरबदल आवश्यक वाटत असून, बिहार विधानसभा निवडणुकानंतर नव्या व अभ्यासू चेहऱ्यांना संधी देण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. १९९० नंतर मुंबईत काही उद्योगपतींनी एकत्र येत देशातील उद्योगांना डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या विकासाचा आराखडा तयार केला होता. पंतप्रधानांचा ‘मेक इन इंडिया’ हा उपक्रम हे त्याचेच स्वरूप असल्याचे बजाज यांनी सांगितले.------सत्ताधारी-विरोधकांनी ‘जीएसटी’साठी एकत्र यावेदेशाच्या उद्योगक्षेत्राचा विकास लक्षात घेता ‘जीएसटी’ (गुडस् अ‍ॅन्ड सर्व्हिसेस टॅक्स) विधेयकाला लवकरात लवकर मंजुरी मिळणे आवश्यक आहे. देशहित लक्षात घेता विरोधक व सत्ताधारी यांनी एकत्र येणे आवश्यक आहे. ‘संपुआ’च्या (संयुक्त पुरोगामी आघाडी) काळात ‘जीएसटी’ला ‘रालोआ’ने (राष्ट्रीय लोकशाही आघाडी) विरोध केला होता. आता ‘संपुआ’कडून विरोध करण्यात येत आहे. देशाला विकास अपेक्षित आहे. त्यामुळे चांगल्या कामांसाठी राजकारण दूर सारण्याची गरज असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. (प्रतिनिधी)