शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

तूर डाळीचे भाव भिडले गगनाला!

By admin | Updated: April 3, 2015 02:24 IST

घाऊक दर प्रतिक्विंटल ८५00, किरकोळ बाजारात किलोच्या दराने गाठली शंभरी.

राजरत्न सिरसाट/अकोला: गतवर्षी पाऊस कमी झाल्याने इतर पिकांसह डाळवर्गीय पिकांचे उत्पादन घटले असून, यातील जीवनसत्त्वयुक्त तूर डाळीचे उत्पादन सरासरी ३५ टक्क्यांनी घटले आहे. त्यामुळे या डाळीचे भाव गगनाला भिडले असून, घाऊक बाजारात ८,५00 रुपये क्विंटलच्यावर, तर किरकोळ बाजारात शंभर रुपये प्रतिकिलोच्या जवळपास दर आहेत. या दरवाढीचा ताण यावर्षी सामान्यांच्या खिशावर पडला आहे. भारतात तूर या कडधान्याचे सर्वाधिक लागवड क्षेत्र महाराष्ट्रात आहे. गतवर्षी ९३.२0 लाख हेक्टर क्षेत्रावर तुरीची पेरणी झाली होती. यावर्षी पावसाला विलंब झाल्याने, तुरीचे लागवडक्षेत्र घटले असून, ८३.२४ लाख हेक्टरपर्यंत ते खाली आले. तूर पीक मुख्यत: कोरडवाहू क्षेत्रात घेतले जाते. यावर्षी या पिकाचे उत्पादन २.७४ लाख टन अपेक्षित होते, पण यामध्ये प्रचंड घसरण झाली आहे. महाराष्ट्रात १0 लाख हेक्टर क्षेत्रावर तुरीची लागवड होते. २0१३-१४ मध्ये हेक्टरी ८ क्विंटल ८१ किलो डाळीचे उत्पादन झाले; तथापि यावर्षी या उत्पादनात घसरण झाली असून, हेक्टरी केवळ ७00 किलो, म्हणजे सात क्विंटल उत्पादन झाले आहे. अपेक्षित हेक्टरी उत्पादन ११ क्विंटलच्या वर हवे होते, पण गतवर्षी ऐन फुलोरा, शेंगा येण्याच्या अवस्थेत नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये पावसाने दडी मारली होती. त्याचा फटका या पिकाला बसला. परिणामी या डाळीचे किरकोळ बाजारातील दर शंभर रुपये क्विंटलपर्यंंत पोहोचले. या दरवाढीचा नागरिकांच्या खिशावर ताण पडला आहे. *तुरीचे क्षेत्र दोन दशकांत स्थिर गेल्या दोन दशकांत भारतातील तुरीचे उत्पादन २.७४ ते ३ लाख टन आहे. भारतीय कृषी संचालनालयाच्या आकडेवारीनुसार, यावर्षी तुरीचे उत्पादन २.७४ लाख टन अपेक्षित होते; तथापि पाऊस विलंबाने सुरू झाल्याने यावर्षी उत्पादन घटले आहे.