शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
2
Operation Sindoor: 'पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला अन् त्यानंतर...', भारताचे डीजीएमओ घई काय बोलले?
3
Operation Sindoor : "चीनचं मिसाईल अयशस्वी, तुर्कीचे ड्रोन पाडले"; एअर मार्शल एके भारती यांनी पुरावेच दाखवले
4
गुंतवणूकदारांची एकाच दिवसात ४ वर्षातील सर्वात मोठी कमाई! 'या' शेअरमध्ये प्रचंड वाढ
5
व्हेज बिर्याणीच्या गाडीवर लिहिलं होतं 'जय श्री श्याम', भाजप आमदार बालमुकुंद आचार्य संतापले अन्...
6
शाहरुख खानसोबत ३० वर्षांनी दिसणार 'हा' एव्हरग्रीन अभिनेता, 'किंग' सिनेमात झाली एन्ट्री
7
घराबाहेर पडताना आई तुम्हाला आवर्जून दही-साखर देते का? फायदे समजल्यावर रोजच मागाल
8
काय होता ५००० कोटींचा 'पॅनकार्ड' इनव्हेस्टमेंट फ्रॉड? ५१ लाख गुंतवणूकदारांना घातला गंडा
9
पाकिस्तानचा शेअर बाजार अचानक १ तास करावा लागला बंद! युद्धविरामनंतर नेमकं काय घडलं?
10
'याचना नहीं, अब रण होगा...' कवितेने सुरुवात; आर्मीने दाखवला 'ऑपरेशन सिंदूर'चा नवा व्हिडिओ
11
Operation Sindoor : "हौसले बुलंद हो, तो..." क्रिकेटचा किस्सा ऐकवत DGMO नी दिला स्पष्ट मेसेज, पाकचा 'खेळ खल्लास' कसा केला ते सांगितलं!
12
भारत-पाकिस्तान डीजीएमओंची हॉटलाईन कनेक्ट होऊ शकली नाही; थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करणार
13
जग कधीच विसरू शकणार नाही विराट कोहलीचे हे 10 कसोटी विक्रम; कुण्याही भारतीयाला जमला नाही असा पराक्रम
14
"मी विराटचे अश्रू पाहिलेत..."; 'किंग कोहली'च्या कसोटी निवृत्तीनंतर अनुष्का शर्माची भावनिक पोस्ट
15
स्मिता पाटील यांच्या मृत्यूनंतर प्रतीकला दत्तक घेणार होती बॉलिवूडची 'ही' प्रसिद्ध जोडी! अभिनेत्याचा मोठा खुलासा 
16
Kangana Ranaut : "जितके संयमी, तितकेच धाडसी"; ऑपरेशन सिंदूरच्या यशाने कंगना राणौत खूश, मोदींचं केलं कौतुक
17
'युद्ध रोमँटिक चित्रपट नाही, गंभीर मुद्दा आहे', माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचे सूचक विधान
18
संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयाने काम करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सुतोवाच
19
सेव्हिंग अकाऊंटमध्ये पैसे ठेवूनही मिळेल FD इतकं व्याज; फक्त करावं लागेल 'हे' महत्त्वाचं काम
20
विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीवर 'हेड कोच' गौतम गंभीरचे ट्विट, सिंहाशी तुलना करत म्हणाला...

‘डाळीची भाववाढ हा तर सुनियोजित कट’

By admin | Updated: January 20, 2016 02:32 IST

दिवाळीच्या काळात डाळींच्या विशेषत: तूरडाळींच्या दरात झालेली प्रचंड भाववाढ एका सुनियोजित कारस्थानाचा भाग होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट

मुंबई : दिवाळीच्या काळात डाळींच्या विशेषत: तूरडाळींच्या दरात झालेली प्रचंड भाववाढ एका सुनियोजित कारस्थानाचा भाग होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांना या प्रकाराची माहिती होती, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी पत्रकार परिषदेत केला.अन्न व नागरी पुरवठा तेलबिया व खाद्यतेलावरील निर्बंध शिथिल करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. त्यामध्ये डाळींचा समावेश नव्हता. परंतु, निर्णय घेताना त्यामध्ये अचानक डाळींचा समावेश करण्यात आला. मुख्यमंत्री व अन्न नागरी पुरवठा मंत्र्यांना या प्रकाराची संपूर्ण कल्पना होती व या प्रस्तावावर त्यांच्यादेखील स्वाक्षरी आहेत. डाळींवरील निर्बंध मागे घेताना केंद्र सरकारची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक होती. परंतु, केंद्र व राज्यातील मोठ्या नेत्यांच्या प्रभावामुळे ही परवानगी घेण्याची अट नियमबाह्य पद्धतीने शिथिल करण्यात आली. निर्बंध मागे घेणे हे एक व्यापारी कारस्थान होते आणि भारतीय जनता पार्टीचा केंद्रातील एक वरिष्ठ नेता या कटात सामील होता, असा आरोपही सावंत यांनी केला. डाळ भाववाढीचे प्रकरण अंगलट येण्याच्या भीतीपोटी अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांनी त्यांच्याच विभागाचे सचिव दीपक कपूर यांना ४ पानांचे पत्र लिहून आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. परंतु, मुख्यमंत्री व अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांनी कितीही सावरासावर केली तरी ते या प्रकारातून अंग काढू शकत नाहीत. अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांनीतर डाळींचे साठे असलेल्या एका गोदामालाही भेट दिली. ही भेट पाहणीचा प्रकार नव्हता तर त्यामागेही मोठे गुपित आहे. पुरेशी कागदपत्रे जमा झाली की त्याचाही गौप्यस्फोट आपण करणार असल्याचे सावंत यांनी सांगितले. (प्रतिनिधी)