शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
3
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
4
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
5
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
6
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
7
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
8
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
9
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
10
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
11
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
13
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
14
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
15
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
16
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
17
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
18
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
19
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
20
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली

किंमत १२,८३५ कोटींनी वाढली

By admin | Updated: August 31, 2016 05:26 IST

आघाडी सरकारच्या काळात सिंचन प्रकल्पांच्या किमती वाढल्याची टीका भाजपाचे नेते विरोधी पक्षात असताना करीत होते.

मुंबई : आघाडी सरकारच्या काळात सिंचन प्रकल्पांच्या किमती वाढल्याची टीका भाजपाचे नेते विरोधी पक्षात असताना करीत होते. मात्र, सत्तेवर आल्यानंतर मागच्याच सरकारचे धोरण पुढे राबवत देवेंद्र फडणवीस सरकारने प्रकल्पांची किंमत प्रचंड वाढल्याची एकप्रकारे कबुली देत विदर्भातील महत्त्वाकांक्षी गोसीखुर्द सिंचन प्रकल्पास आज सुधारित प्रशासकीय मान्यता दिली. या प्रकल्पाची किंमत गेल्या १० वर्षांत १२ हजार ८३५ कोटी रुपयांनी वाढली असल्याने एकूण १८ हजार ४९४ कोटी रुपयांच्या प्रस्तावास मंत्रिपरिषदेच्या आजच्या बैठकीत सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. २००५-०६ मध्ये या प्रकल्पाची किंमत ५ हजार ६५९ कोटी रुपये इतकी होती. हा राष्ट्रीय प्रकल्प असून त्यासाठी ९० टक्के निधी केंद्र सरकार तर १० टक्के राज्य सरकार देते. भंडारा जिल्ह्यात वैनगंगा नदीवर बांधण्यात येत असलेल्या या प्रकल्पाची मूळ किंमत केवळ ३७२ कोटी रुपये होती. ती आज १८ हजार ८३५ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांना सांगितले की, गेल्या दहा वर्षांत प्रकल्पाची किंमत १२ हजार ८३५ कोटी रुपयांनी वाढण्यामागे अनेक कारणे आहेत. निव्वळ दरवाढीमुळे ३५५५ कोटी, भूसंपादन दरातील वाढीमुळे १९७४ कोटी, संकल्पचित्रातील बदलामुळे १६४६ कोटी, अतिरिक्त भौतिक प्रकल्प घटकांमुळे ३०६७ कपटेल पुनर्वसन पॅकेज आदींमुळे १४९० कोटी, आस्थापना आणि संबंधित खर्चापोटी ८६४ कोटी तसेच मागील काळात दिलेल्या जादा दराच्या निविदा अशा कारणांमुळे ही वाढ झाली आहे. या प्रकल्पामुळे पूर्व विदर्भातील नागपूर, चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यातील २ लाख ५० हजार ८०० हेक्टर इतकी सिंचन क्षमता निर्माण होणार आहे.प्रकल्पातील अनियमिततांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत करण्यात येत असलेली चौकशी यापुढेदेखील सुरू राहील. तसेच मेंढीगिरी आणि वडनेरे समितीच्या चौकशी अहवालानुसार सुरू असेली कार्यवाहीदेखील सुरूच राहील, असे महाजन यांनी स्पष्ट केले.