शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

किंमत १२,८३५ कोटींनी वाढली

By admin | Updated: August 31, 2016 05:26 IST

आघाडी सरकारच्या काळात सिंचन प्रकल्पांच्या किमती वाढल्याची टीका भाजपाचे नेते विरोधी पक्षात असताना करीत होते.

मुंबई : आघाडी सरकारच्या काळात सिंचन प्रकल्पांच्या किमती वाढल्याची टीका भाजपाचे नेते विरोधी पक्षात असताना करीत होते. मात्र, सत्तेवर आल्यानंतर मागच्याच सरकारचे धोरण पुढे राबवत देवेंद्र फडणवीस सरकारने प्रकल्पांची किंमत प्रचंड वाढल्याची एकप्रकारे कबुली देत विदर्भातील महत्त्वाकांक्षी गोसीखुर्द सिंचन प्रकल्पास आज सुधारित प्रशासकीय मान्यता दिली. या प्रकल्पाची किंमत गेल्या १० वर्षांत १२ हजार ८३५ कोटी रुपयांनी वाढली असल्याने एकूण १८ हजार ४९४ कोटी रुपयांच्या प्रस्तावास मंत्रिपरिषदेच्या आजच्या बैठकीत सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. २००५-०६ मध्ये या प्रकल्पाची किंमत ५ हजार ६५९ कोटी रुपये इतकी होती. हा राष्ट्रीय प्रकल्प असून त्यासाठी ९० टक्के निधी केंद्र सरकार तर १० टक्के राज्य सरकार देते. भंडारा जिल्ह्यात वैनगंगा नदीवर बांधण्यात येत असलेल्या या प्रकल्पाची मूळ किंमत केवळ ३७२ कोटी रुपये होती. ती आज १८ हजार ८३५ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांना सांगितले की, गेल्या दहा वर्षांत प्रकल्पाची किंमत १२ हजार ८३५ कोटी रुपयांनी वाढण्यामागे अनेक कारणे आहेत. निव्वळ दरवाढीमुळे ३५५५ कोटी, भूसंपादन दरातील वाढीमुळे १९७४ कोटी, संकल्पचित्रातील बदलामुळे १६४६ कोटी, अतिरिक्त भौतिक प्रकल्प घटकांमुळे ३०६७ कपटेल पुनर्वसन पॅकेज आदींमुळे १४९० कोटी, आस्थापना आणि संबंधित खर्चापोटी ८६४ कोटी तसेच मागील काळात दिलेल्या जादा दराच्या निविदा अशा कारणांमुळे ही वाढ झाली आहे. या प्रकल्पामुळे पूर्व विदर्भातील नागपूर, चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यातील २ लाख ५० हजार ८०० हेक्टर इतकी सिंचन क्षमता निर्माण होणार आहे.प्रकल्पातील अनियमिततांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत करण्यात येत असलेली चौकशी यापुढेदेखील सुरू राहील. तसेच मेंढीगिरी आणि वडनेरे समितीच्या चौकशी अहवालानुसार सुरू असेली कार्यवाहीदेखील सुरूच राहील, असे महाजन यांनी स्पष्ट केले.