शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
3
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
4
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
6
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
7
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
8
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
9
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
10
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
11
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
12
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
13
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
14
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
15
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
16
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
17
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
18
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
19
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
20
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

जनताच निवडणार आता नगराध्यक्ष!

By admin | Updated: May 11, 2016 04:25 IST

नगरपालिकांच्या अध्यक्षांची निवड नगरसेवकांऐवजी आता थेट जनतेतून करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने आज घेतला. याशिवाय, नगरपालिकांमध्ये दोन वॉर्डांचा एक प्रभाग करण्यात येणार आहे.

मुंबई : नगरपालिकांच्या अध्यक्षांची निवड नगरसेवकांऐवजी आता थेट जनतेतून करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने आज घेतला. याशिवाय, नगरपालिकांमध्ये दोन वॉर्डांचा एक प्रभाग करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे नगराध्यक्षांच्या निवडीत एरवी होणारा घोडेबाजार रोखला जाणार आहे. भाजपाने राजकीय फायद्याचे गणित म्हणूनही हा निर्णय घेतल्याचे म्हटले जाते. राज्यात २००१ ते २००६ या काळात थेट नगराध्यक्ष निवडून देण्याची पद्धत होती. त्या काळात राज्यात आघाडीचे सरकार असले तरी नगराध्यक्ष निवडीत भाजपाला चांगले यश मिळाले होते. आता ही पद्धत पुन्हा आणल्यास पक्षाला फायदा होईल, असा अहवाल प्रदेश भाजपाकडून देण्यात आला होता. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी अनेकांशी चर्चा करून थेट नगराध्यक्षांची पद्धत आणण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्यानुसार आज हा निर्णय घेण्यात आला, असे सूत्रांनी सांगितले. सध्या नगरपालिकांमध्ये असलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व मोडीत काढण्याचा हेतू यामागे असल्याचेही सांगितले जाते. नगरपालिकेच्या अर्थसंकल्पापैकी २५ टक्के रक्कम खर्च करण्याचा अधिकार नगराध्यक्षांना असेल. चालू वर्षाअखेर १९५ नगरपालिकांची निवडणूक नवीन निर्णयानुसार होणार आहे. मुंबईमध्ये सध्याची प्रभाग (एक वार्ड) पद्धत कायम राहणार आाहे. मात्र, अन्य महापालिकांमध्ये चार वॉर्डांचा मिळून एक प्रभाग असेल. त्यामुळे प्रभागातून निवडून येण्यासाठी संबंधित नगरसेवकास चार वॉर्डांमधून लोकप्रियता सिद्ध करावी लागेल. असा आहे इतिहासविलासराव देशमुख आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्री असताना २००१मध्ये थेट नगराध्यक्षाची पद्धत आणली गेली. २००६मध्ये विलासरावांनीच नगरसेवकांमधून नगराध्यक्ष निवडण्याची पूर्वीचीच पद्धत लागू केली. लातूरमध्ये बहुमत काँग्रेसचे पण नगराध्यक्ष राष्ट्रवादीचे प्रा. जनार्दन वाघमारे असे चित्र होते. ही बाब जिव्हारी लागल्यानेच देशमुख यांनी पूर्वीची पद्धत आणली असे म्हटले गेले. (विशेष प्रतिनिधी)>या पद्धतीचे तोटेनगराध्यक्ष एका पक्षाचा आणि न.प.मध्ये बहुमत दुसऱ्या पक्षाचे असेल तर शहराच्या विकासकामांना खीळ बसू शकते.> शहरातील लोकप्रिय व्यक्तीला संधी मिळते. त्यामुळे प्रभावीपणे काम करता येते.नगरसेवकांमधून नगराध्यक्ष निवडताना घोडेबाजार होतो. त्या प्रकारांना आळा बसतो. ५ वर्षे एकच नगराध्यक्ष असल्याने स्थैर्य प्राप्त होते.>नगरपालिकांमध्ये दोन वॉर्डांचा एक प्रभाग असेल. याचा अर्थ दोन वॉर्ड हा नगरसेवकाचा मतदारसंघ असेल. सध्या एका वॉर्डातून निवडून यावे लागते. आता दोन वॉर्डांमध्ये लोकप्रियता सिद्ध करावी लागणार आहे.