शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जनताच निवडणार आता नगराध्यक्ष!

By admin | Updated: May 11, 2016 04:25 IST

नगरपालिकांच्या अध्यक्षांची निवड नगरसेवकांऐवजी आता थेट जनतेतून करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने आज घेतला. याशिवाय, नगरपालिकांमध्ये दोन वॉर्डांचा एक प्रभाग करण्यात येणार आहे.

मुंबई : नगरपालिकांच्या अध्यक्षांची निवड नगरसेवकांऐवजी आता थेट जनतेतून करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने आज घेतला. याशिवाय, नगरपालिकांमध्ये दोन वॉर्डांचा एक प्रभाग करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे नगराध्यक्षांच्या निवडीत एरवी होणारा घोडेबाजार रोखला जाणार आहे. भाजपाने राजकीय फायद्याचे गणित म्हणूनही हा निर्णय घेतल्याचे म्हटले जाते. राज्यात २००१ ते २००६ या काळात थेट नगराध्यक्ष निवडून देण्याची पद्धत होती. त्या काळात राज्यात आघाडीचे सरकार असले तरी नगराध्यक्ष निवडीत भाजपाला चांगले यश मिळाले होते. आता ही पद्धत पुन्हा आणल्यास पक्षाला फायदा होईल, असा अहवाल प्रदेश भाजपाकडून देण्यात आला होता. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी अनेकांशी चर्चा करून थेट नगराध्यक्षांची पद्धत आणण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्यानुसार आज हा निर्णय घेण्यात आला, असे सूत्रांनी सांगितले. सध्या नगरपालिकांमध्ये असलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व मोडीत काढण्याचा हेतू यामागे असल्याचेही सांगितले जाते. नगरपालिकेच्या अर्थसंकल्पापैकी २५ टक्के रक्कम खर्च करण्याचा अधिकार नगराध्यक्षांना असेल. चालू वर्षाअखेर १९५ नगरपालिकांची निवडणूक नवीन निर्णयानुसार होणार आहे. मुंबईमध्ये सध्याची प्रभाग (एक वार्ड) पद्धत कायम राहणार आाहे. मात्र, अन्य महापालिकांमध्ये चार वॉर्डांचा मिळून एक प्रभाग असेल. त्यामुळे प्रभागातून निवडून येण्यासाठी संबंधित नगरसेवकास चार वॉर्डांमधून लोकप्रियता सिद्ध करावी लागेल. असा आहे इतिहासविलासराव देशमुख आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्री असताना २००१मध्ये थेट नगराध्यक्षाची पद्धत आणली गेली. २००६मध्ये विलासरावांनीच नगरसेवकांमधून नगराध्यक्ष निवडण्याची पूर्वीचीच पद्धत लागू केली. लातूरमध्ये बहुमत काँग्रेसचे पण नगराध्यक्ष राष्ट्रवादीचे प्रा. जनार्दन वाघमारे असे चित्र होते. ही बाब जिव्हारी लागल्यानेच देशमुख यांनी पूर्वीची पद्धत आणली असे म्हटले गेले. (विशेष प्रतिनिधी)>या पद्धतीचे तोटेनगराध्यक्ष एका पक्षाचा आणि न.प.मध्ये बहुमत दुसऱ्या पक्षाचे असेल तर शहराच्या विकासकामांना खीळ बसू शकते.> शहरातील लोकप्रिय व्यक्तीला संधी मिळते. त्यामुळे प्रभावीपणे काम करता येते.नगरसेवकांमधून नगराध्यक्ष निवडताना घोडेबाजार होतो. त्या प्रकारांना आळा बसतो. ५ वर्षे एकच नगराध्यक्ष असल्याने स्थैर्य प्राप्त होते.>नगरपालिकांमध्ये दोन वॉर्डांचा एक प्रभाग असेल. याचा अर्थ दोन वॉर्ड हा नगरसेवकाचा मतदारसंघ असेल. सध्या एका वॉर्डातून निवडून यावे लागते. आता दोन वॉर्डांमध्ये लोकप्रियता सिद्ध करावी लागणार आहे.