शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

राष्ट्रपती म्हणजे रबर स्टॅम्प - राज ठाकरे

By admin | Updated: June 25, 2017 02:11 IST

राष्ट्रपती म्हणजे केवळ एक रबर स्टॅम्प आहे, असे वादग्रस्त विधान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केल्याने नवा वाद ओढवला आहे

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राष्ट्रपती म्हणजे केवळ एक रबर स्टॅम्प आहे, असे वादग्रस्त विधान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केल्याने नवा वाद ओढवला आहे. राष्ट्रपती निवडीबाबत प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर राज यांनी हे विधान केले. वादग्रस्त विधान करतानाच, राज यांनी राष्ट्रपतींचा देशाला कधीच फायदा झालेला नाही, असेही म्हटले आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर होत आहेत. मराठा आरक्षणासाठी आंदोलन झाले. अशा वेळी राष्ट्रपती कुठे होते, या विषयांवर त्यांनी काय केले, नागरिक राष्ट्रपतींना पत्र पाठवत प्रश्नांविषयी विचारणा करतात. मात्र, त्यांनी नागरिकांच्या प्रश्नांना उत्तर दिल्याचे ऐकिवात नाही. असे राष्ट्रपती आमच्या काय कामाचे, असा प्रश्न राज यांनी उपस्थित केला आहे. महत्त्वाचे म्हणजे, ज्यांचे सरकार असते, त्यांचाच राष्ट्रपती असतो. परिणामी, काहीच फायदा होत नाही, अशी टीकाही राज यांनी केली आहे. राष्ट्रपती कोविंद झाले काय आणि गोपाळ झाले काय, आम्हाला काहीच फरक पडत नाही, असे म्हणताच, राज यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार रामनाथ कोविंद यांच्यावरही भाष्य केले आहे.