शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
3
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
4
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
5
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
6
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
7
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
8
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
9
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
10
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
11
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
12
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
13
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
14
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
15
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
16
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
17
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
18
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
19
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
20
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."

दुष्काळामुळे अध्यक्षपदास महानोर यांचा नकार

By admin | Updated: June 7, 2015 02:17 IST

राज्यात विशेषत: मराठवाडा आणि विदर्भात दुष्काळी परिस्थित्ी असल्याने विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारण्यास

पुणे : राज्यात विशेषत: मराठवाडा आणि विदर्भात दुष्काळी परिस्थित्ी असल्याने विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारण्यास कवी ना़धों़ महानोर यांनी असमर्थता दर्शविली आहे़ यासंदर्भातील पत्र गतवर्षी डिसेंबरमध्येच साहित्य महामंडळाला दिल्याचे महानोर यांनी सांगितले़ मात्र, त्या पत्राला उत्तर देण्याचे सौजन्यही अद्याप महामंडळाने न दाखविल्याने महानोरांनी नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या वर्षी टोरँंटो (कॅनडा) येथील मराठी मंडळाच्या निमंत्रणामुळे विश्व साहित्य संमेलनाचा मुहूर्त जुळून आला. त्याचवेळी अध्यक्षपदी महानोर यांची निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. परंतु आयोजकांनी खर्च करण्यास नकार दिल्याने हे संमेलनच रद्द करावे लागले. त्यामुळे शासनाकडून मिळालेले २५ लाख रूपये परत करण्याची नामुष्की महामंडळावर ओढवली. ते संमेलनच न झाल्यामुळे महानोरांना अध्यक्षपदाची संधीच मिळू शकली नाही. त्यानंतर एका वर्षाच्या विलंबाने दक्षिण आफ्रिकेमधील जोहान्सबर्ग शहरातील मराठी मंडळाकडून आयोजनाचा प्रस्ताव आल्याने महामंडळाच्या आशा पल्लवित झाल्या. नऊ महिन्यांपूर्वी महामंडळाने जोहान्सबर्गचे अध्यक्षपद स्वीकारावे असे पत्र महानोरांना पाठविले. विश्व संमेलन अंदमानला घेण्यासाठी इच्छुक असलेल्या शिवसंघ विकास मंचाचा प्रस्ताव ४ वर्षांपासून साहित्य महामंडळाकडे पडून आहे. त्या प्रस्तावाला दरवर्षी बगल देत विदेशातच संमेलनाची पताका फडकविण्यात महामंडळाने धन्यता मानली. आता कुणीच वाली न राहिल्यामुळे महामंडळाकडूनच संमेलनासंबंधी विचारणा झाल्याने आयोजकांनी, पदाधिकाऱ्यांबरोबर रसिकांचा देखील २ दिवसाचा खर्च करावा लागेल, अशी अट ठेवून महामंडळालाच पेचात टाकले आहे.