शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

विधानसभा बंद पाडण्याचा डाव अध्यक्षांनी रोखला!

By अतुल कुलकर्णी | Updated: July 17, 2018 04:28 IST

राज्यात शेतकरी संघटनेने दुधाच्या प्रश्नावर तीव्र आंदोलन सुरू केले असताना विरोधकांना या विषयावर सभागृह बंद पाडायचे होते.

नागपूर : राज्यात शेतकरी संघटनेने दुधाच्या प्रश्नावर तीव्र आंदोलन सुरू केले असताना विरोधकांना या विषयावर सभागृह बंद पाडायचे होते. अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या दालनात बैठक झाली त्यावेळी अध्यक्षांनी व स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, कामकाज खूप शिल्लक आहे, १३ विधेयके आहेत, असे सांगत दिवसभर सभागृह बंद करण्यास विरोध केला. शेवटी विरोधकांच्या सरकारच्या भूमिकेचा निषेध करत सभात्यागाचा मार्ग स्वीकारला.मात्र शिवसेनेचे राज्यमंत्री विजय शिवतारे आणि भाजपाचे आ. योगेश सागर यांनी दूध संघाचे मालक शेतकऱ्यांना हमीभाव मिळू देत नाहीत, त्यांच्या नावावर हे राजकारण करत आहेत, असे आक्षेप घेतले. त्यावर विरोधकांनी भाजपा शिवसेनेचे शेतकरी विरोधी रूप बाहेर पडल्याचा आरोप केला.शेतकºयांना थेट पाच रुपये अनुदान द्यावे, अशी विरोधकांची मागणी होती. त्यासाठी त्यांनी विधानसभेत विरोधकांनी स्थगन प्रस्ताव मांडला होता. प्रश्नोत्तराचा तास थांबवून हा विषय चर्चेला घ्या, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. त्याला राष्टÑवादीचे नेते अजित पवार, ज्येष्ठ सदस्य गणपतराव देशमुख यांनी पाठिंबा दिला. शिवसेनेतर्फे चंद्रदीप नरके आणि सुनील प्रभू यांनी पाच रुपये अनुदानाची मागणी केली; पण मंत्री शिवतारे यांनी मात्र दूध संघ शेतकºयांना दर देत नाहीत, अशी टीका करत कॉँग्रेस, राष्टÑवादीकडे बोट केले. कारण अनेक दूध संघ हे या दोन पक्षांच्या ताब्यात आहेत. एकीकडे दुधाच्या आंदोलनाला पाठिंबा देत असताना दुसरीकडे सरकार मात्र दूध संघावर खापर फोडतानाचे चित्र सभागृहात होते.विरोधकांच्या स्थगनवर कोणताही निर्णय न देता अध्यक्षांनी मंत्री महादेव जानकर यांना निवेदन करण्यास सांगितले. जानकर यांनी याआधीच केलेल्या घोषणा पुन्हा नव्याने सांगितल्या. त्यावेळी सभागृहात गोंधळ सुरू झाला. त्यामुळे सभागृह तीनवेळा तहकूब करावे लागले. मात्र शेवटी विरोधकांनी सभात्याग केला आणि पुन्हा कामकाज सुरू झाले.>भाव वाढवून देण्याची मागणी होत असेल तरी खरेदी संघाने दूध विक्रीचा दर एक रुपयानेही कमी केलेला नाही. गोकुळ १० लाख लिटर दूध गोळा करत आहे. शेतकºयांना सरकार नाही हे दूध संघवालेच लुटत आहेत.- विजय शिवतारे,राज्यमंत्री, शिवसेनाशिवसेनेचे आश्चर्य वाटते. सभागृहात शेतकरी प्रश्नावर ते गप्प बसतात. शेतकºयांनी रक्ताचे पाणी करून सहकारी यंत्रणा उभी केली; मात्र दूध संघावर आरोप करताना शिवसेनेच्या मंत्र्यांनी आपण शेतकरी विरोधात बोलत आहोत याचे भान ठेवायला हवे होते. जे दूध संघ नीट चालत नाहीत, त्यांच्यावर कारावाई करा, गुन्हे दाखल करा, पण सरसकट सहकाराला बदनाम करू नका.- राधाकृष्ण विखे पाटील,विरोधी पक्षनेते, विधानसभाशेतकरी दूध स्वत:हून आणून देण्यास तयार आहेत. मात्र दूध संघ दूध घेत नाहीत, तर त्यांचे दूध रस्त्यावर ओतत आहेत. हे आंदोलन शेतकरीविरोधी आहे आणि सरकार ते खपवून घेणार नाही.- चंद्रकांत पाटील,महसूल मंत्री

टॅग्स :milkदूध