शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने घेरले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
3
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
4
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
5
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
6
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
7
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
8
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
9
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
10
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
11
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
12
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
13
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
14
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
15
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
17
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
18
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
19
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
20
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?

‘त्या’ आंदोलनकर्त्या नेत्यांची नावे सादर करा

By admin | Updated: February 23, 2017 04:07 IST

उच्च न्यायालयलयाच्या आदेशावरून दिघ्यातील इमारती सील करण्यासाठी गेलेल्या सरकारी अधिकाऱ्यांना राजकीय

मुंबई : उच्च न्यायालयलयाच्या आदेशावरून दिघ्यातील इमारती सील करण्यासाठी गेलेल्या सरकारी अधिकाऱ्यांना राजकीय नेत्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलने करून अडवण्याचा प्रयत्न झाल्याच्या पार्श्वभूमीवर आंदोलनासाठी चिथावणाऱ्या सर्व राजकीय नेत्यांची नावे सादर करण्याचे निर्देश बुधवारी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले.दिघ्यातील बेकायदेशीर बांधकामांविरुद्ध राजीव मिश्रा व अन्य एकाने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. बेकायदा बांधकामांवर तसेच त्यांना परवानगी देणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे.या याचिकेवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठापुढे होती. न्यायालयाच्या आदेशानुसार बेकायदा इमारत सील करण्यासाठी गेलेल्या सरकारी अधिकाऱ्यांविरुद्ध आंदोलन करण्यात आल्याची माहिती बुधवारच्या सुनावणीत खंडपीठाला दिली.त्यावर खंडपीठाने संताप व्यक्त केला. न्यायालयाच्या आदेशावरून अधिकारी कारवाई करण्यासाठी गेले होते. त्यांच्याविरुद्ध आंदोलन करण्यासाठी नागरिकांना कोणी चिथावले ? राजकीय नेत्यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आल्याने त्यांची नावे पुढील सुनावणीस सादर करण्याचे निर्देश खंडपीठाने राज्य सरकारला दिले. (प्रतिनिधी)अतिक्रमणाचा विळखानियोजित आणि सर्व सुविधायुक्त असे शहर असावे, या हेतूने नवी मुंबईची निर्मिती करण्यात आली. त्यासाठी राज्य सरकारने कोट्यवधी रुपये खर्चून भूखंड संपादित केले. मात्र याही शहराला अतिक्रमणाचा विळखा बसला आहे. ही बेकायदा बांधकामेही नियमित करणार का? असा प्रश्न उच्च न्यायालयाने सरकारला केला. त्यावर सरकारी वकिलांनी, बांधकाम नियमित करण्यापूर्वी शहर नियोजन प्राधिकरण ‘ना-हरकत’ प्रमाणपत्र देईल आणि त्यानुसार बांधकाम नियमित केले जाईल, अशी माहिती खंडपीठाला दिली.एवढा मोठा निर्णय आम्हाला शहर नियोजन प्राधिकरणावर सोडायचा नाही. याबाबत राज्य सरकारनेच भूमिका स्पष्ट करावी. राज्य सरकारने एकादा का हे धोरण लागू केले तर ते संपूर्ण राज्यासाठी लागू होईल. त्यामुळे राज्य सरकारने त्यांची भूमिका स्पष्ट करावी, असे खंडपीठाने म्हटले.