शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
2
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
3
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
4
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
5
ओसामा बिन लादेनच्या घरात सापडल्या होत्या बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायिकेच्या कॅसेट, ती म्हणाली...
6
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या गोळीबारात भारताचे आठ जवान जखमी
7
मोठ्या विक्रीदरम्यान रेखा झुनझुनवालांची चांदी, २ शेअर्समधून झाला ८९२ कोटी रुपयांचा फायदा; तुमच्याकडे आहे का?
8
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण
9
"दहशतवाद्यांनी भरलेला देश..", कंगनाचं पाकिस्तानवर टीकास्त्र, म्हणाली - जगाच्या नकाशातून मिटवलं पाहिजे...
10
Sofia Qureshi : Video - "माझ्या सुनेचा मला अभिमान, ६ महिन्यांपूर्वी..."; कर्नल सोफिया कुरेशी यांचे सासरे भावुक
11
Weather Update : वेळेआधीच मान्सून धडकणार! कधी सुरू होणार पाऊस?हवामान विभागाने सांगितली तारीख
12
India Pakistan Tension : भारताने पाकिस्तानच्या 'या' ३ एअरबेसवरच हल्ला का केला? जाणून घ्या यामागची रणनीती
13
पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड! भारतातील उधमपूर बेस उद्ध्वस्त केल्याचा दावा निघाला खोटा
14
"मुस्लिम नवऱ्याला सोडून दे", पाकिस्तानी युजरचा देवोलिनाला सल्ला; सडेतोड उत्तर देत म्हणाली...
15
Swiggy Q4 Results: इन्स्टामार्ट ठरतंय स्विगीसाठी डोकेदुखी, हजारो कोटींचं केलं नुकसान; जाणून घ्या
16
Anushka Sharma : अनुष्का शर्मा ११ वर्षांची असताना वडील लढलेले कारगिल युद्ध; घरी आईची असायची 'अशी' अवस्था
17
अण्वस्त्रांबाबतच्या चर्चेची बैठक बोलावल्याचं वृत्त पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांनी नाकारलं! ख्वाजा असिफ म्हणाले... 
18
India Pakistan Tension: पाकिस्तानने किती वाजता केला हायस्पीड मिसाईल हल्ला? लष्कराने सांगितलं ९-१० मेच्या रात्री काय घडलं?
19
India Pakistan: दहशतवाद्यांच्या अड्ड्यांमधून नुसता धूर; लष्कराने सीमेवरील लॉन्च पॅड्स केले उद्ध्वस्त; व्हिडीओही दाखवला
20
वृद्धापकाळात दर महिन्याला मिळतील ₹५०००; मोदी सरकारच्या या स्कीममध्ये मिळतेय संधी

सध्या बोलायचीही भीती वाटते

By admin | Updated: March 9, 2016 06:07 IST

‘सध्या देशात असुरक्षितेचे वातावरण वाढत असून, या पार्श्वभूमीवर साधे काही बोलायचे म्हटले, तर आपल्याला देशद्रोही ठरवतील अशी भीती वाटते,’ अशी खंत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते

पुणे: ‘सध्या देशात असुरक्षितेचे वातावरण वाढत असून, या पार्श्वभूमीवर साधे काही बोलायचे म्हटले, तर आपल्याला देशद्रोही ठरवतील अशी भीती वाटते,’ अशी खंत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी येथे व्यक्त केली.मुस्लीम सत्यशोधक मंडळ व मुस्लीम सत्यशोधक महिला मंच यांच्या वतीने मुस्लीम महिलांच्या अधिकारासंदर्भात पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे आंदोलन करण्यात आले. या वेळी आयोजित सभेत ते बोलत होते. मोर्चासाठी मंडळाचे अध्यक्ष प्रा. शमसुद्दीन तांबोळी, मंचच्या प्रमुख तमन्ना शेख-इनामदार, डॉ. बेनझीर तांबोळी, हमीद दलवाई स्टडी सर्कलच्या जरीना मेहबूब तांबोळी आदी उपस्थित होते. आढाव म्हणाले की, ‘चौकशीच्या नावाखाली पोलीस कधीही मुस्लीम तरुणांना उचलून नेतात, यामुळे या तरुणांमध्ये भीतीचे वातावरण आहे, तसेच अन्य समाजातील स्त्रियांप्रमाणेच मुस्लीम स्त्रियादेखील स्वत:च्या हक्कासाठी पुढे येत आहेत. केंद्र व राज्य सरकारने एकत्र येऊन समान नागरी कायदा केला पाहिजे,’ असे सांगून प्रा. तांबोळी यांनी सच्चर समिती, रंगनाथ मिश्रा आयोगाच्या शिफारशी सरकारने त्वरित लागू कराव्यात. या शिवाय तोंडी तलाक, बहुपत्नीत्वसारख्या प्रथा बंद करण्याला सरकारने प्राधान्य द्यावे, असे सांगितले. आंदोलनामध्ये सहभागी महिलांनी कालबाह्य प्रथांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. (प्रतिनिधी)रुक्साना शेख : मुस्लीम धर्मीयांमध्ये बहुपत्नीत्व किंवा तोंडी तलाकसारखे कायदे कित्येक वर्षांपासून सुरू आहेत. हे कायदे स्त्रियांवर लादून त्यांचे शोषण करण्याचा प्रयत्न होत आहे. मुस्लीम स्त्रियांच्या हक्कांवर गदा आणणाऱ्या प्रथा बंद झाल्या पाहिजेत. बदलत्या काळानुसार महिलांनीही या अन्याय-अत्याचाराविरुद्ध आवाज उठविण्याची गरज आहे.तोंडी तलाक, बहुपत्नीत्व या प्रथा बंद करण्यासाठी कायदा करावा, जिल्हा पातळीवर कौटुंबिक न्यायालये, समान नागरी कायद्यासाठी समिती नेमावी, मुस्लीम महिलांसह सर्वच महिलांवरील अन्याय-अत्याचार थांबविण्यासाठी कायदा करावा, सच्चर समिती, न्या. रंगनाथ मिश्रा आयोग, डॉ. मेहमूद उर रेहमान अभ्यास गटाच्या शिफारशी अंमलात आणण्यासाठी धोरण आखावे, या मागण्यांचे निवेदन राज्य सरकारकडे पाठविण्यात आले आहे.