शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

सध्या बोलायचीही भीती वाटते

By admin | Updated: March 9, 2016 06:07 IST

‘सध्या देशात असुरक्षितेचे वातावरण वाढत असून, या पार्श्वभूमीवर साधे काही बोलायचे म्हटले, तर आपल्याला देशद्रोही ठरवतील अशी भीती वाटते,’ अशी खंत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते

पुणे: ‘सध्या देशात असुरक्षितेचे वातावरण वाढत असून, या पार्श्वभूमीवर साधे काही बोलायचे म्हटले, तर आपल्याला देशद्रोही ठरवतील अशी भीती वाटते,’ अशी खंत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी येथे व्यक्त केली.मुस्लीम सत्यशोधक मंडळ व मुस्लीम सत्यशोधक महिला मंच यांच्या वतीने मुस्लीम महिलांच्या अधिकारासंदर्भात पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे आंदोलन करण्यात आले. या वेळी आयोजित सभेत ते बोलत होते. मोर्चासाठी मंडळाचे अध्यक्ष प्रा. शमसुद्दीन तांबोळी, मंचच्या प्रमुख तमन्ना शेख-इनामदार, डॉ. बेनझीर तांबोळी, हमीद दलवाई स्टडी सर्कलच्या जरीना मेहबूब तांबोळी आदी उपस्थित होते. आढाव म्हणाले की, ‘चौकशीच्या नावाखाली पोलीस कधीही मुस्लीम तरुणांना उचलून नेतात, यामुळे या तरुणांमध्ये भीतीचे वातावरण आहे, तसेच अन्य समाजातील स्त्रियांप्रमाणेच मुस्लीम स्त्रियादेखील स्वत:च्या हक्कासाठी पुढे येत आहेत. केंद्र व राज्य सरकारने एकत्र येऊन समान नागरी कायदा केला पाहिजे,’ असे सांगून प्रा. तांबोळी यांनी सच्चर समिती, रंगनाथ मिश्रा आयोगाच्या शिफारशी सरकारने त्वरित लागू कराव्यात. या शिवाय तोंडी तलाक, बहुपत्नीत्वसारख्या प्रथा बंद करण्याला सरकारने प्राधान्य द्यावे, असे सांगितले. आंदोलनामध्ये सहभागी महिलांनी कालबाह्य प्रथांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. (प्रतिनिधी)रुक्साना शेख : मुस्लीम धर्मीयांमध्ये बहुपत्नीत्व किंवा तोंडी तलाकसारखे कायदे कित्येक वर्षांपासून सुरू आहेत. हे कायदे स्त्रियांवर लादून त्यांचे शोषण करण्याचा प्रयत्न होत आहे. मुस्लीम स्त्रियांच्या हक्कांवर गदा आणणाऱ्या प्रथा बंद झाल्या पाहिजेत. बदलत्या काळानुसार महिलांनीही या अन्याय-अत्याचाराविरुद्ध आवाज उठविण्याची गरज आहे.तोंडी तलाक, बहुपत्नीत्व या प्रथा बंद करण्यासाठी कायदा करावा, जिल्हा पातळीवर कौटुंबिक न्यायालये, समान नागरी कायद्यासाठी समिती नेमावी, मुस्लीम महिलांसह सर्वच महिलांवरील अन्याय-अत्याचार थांबविण्यासाठी कायदा करावा, सच्चर समिती, न्या. रंगनाथ मिश्रा आयोग, डॉ. मेहमूद उर रेहमान अभ्यास गटाच्या शिफारशी अंमलात आणण्यासाठी धोरण आखावे, या मागण्यांचे निवेदन राज्य सरकारकडे पाठविण्यात आले आहे.