शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

वसना, माणगंगासाठी आराखडा तयार

By admin | Updated: May 25, 2015 00:32 IST

मुख्यमंत्री : कायम दुष्काळी भाग ‘बागायती’ करणार

सातारा : जिल्ह्यातील वसना आणि माणगंगा या दोन नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी आराखडा तयार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ही योजना तसेच जिहे-कटापूर योजना पूर्ण करण्याचा विडा राज्य शासनाने उचलला असून, कायम दुष्काळी भाग ‘बागायती’ म्हणून नावारूपाला आणण्याचा आमचा संकल्प आहे, असे त्यांनी सांगितले.वसना आणि माणगंगा नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी अनुक्रमे १३ आणि १७ नवीन बंधाऱ्यांचा प्रस्ताव असून, या नद्यांवरील कोल्हापूर पद्धतीचे सर्व बंधारे दुरुस्त करण्यात येणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. ‘मोठ्या सिंचन योजनांऐवजी स्थानिक पातळीवर छोटे जलसाठे तयार करण्याचा पर्याय शासनाने निवडला असून, जिल्ह्यात जलयुक्त शिवार ही लोकचळवळ होताना दिसते आहे. मोहिमेतील सर्व योजना सुरू होण्यापूर्वी, काम सुरू असताना आणि नंतर अशी तीन छायाचित्रे उपग्रहावरून घेतली जाणार आहेत. तसेच त्रयस्थ संस्थेकडून कामांचे मूल्यमापन करण्यात येणार असल्यामुळे भ्रष्टाचाराचा प्रश्नच उद््भवणार नाही,’ असे फडणवीस यांनी सांगितले. ‘जलयुक्त शिवार’च्या जिल्ह्यातील टीमने उत्कृष्ट काम केले असून, टंचाईमुक्तीचा शाश्वत मार्ग दृष्टिपथात आला असल्याचे ते म्हणाले. जिल्हा रुग्णालयाच्या दुरवस्थेसंदर्भात विचारले असता, त्यासंदर्भात आरोग्यमंत्र्यांशी चर्चा करून सर्व अडचणी दूर करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. (प्रतिनिधी)‘लवासा’ला जमीन; कॉलेजला का नाही?कृष्णा खोरे विकास महामंडळाची जमीन ‘लवासा’ला दिली गेली; पण सातारच्या वैद्यकशास्त्र महाविद्यालयाला जमीन देताना अनेक अटी महामंडळाने घातल्या. महाविद्यालयाच्या उभारणीतील हा प्रमुख अडथळा दूर करून आम्ही तातडीने जमीन मिळवू आणि काम सुरू करू, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले.‘जिहे-कटापूर’ पूर्ण करणारचदुष्काळी भागाचे चित्र पालटण्याची ताकद असणारा जिहे-कटापूर प्रकल्प पूर्ण करणे राज्यपालांच्या अखत्यारीत येत असले, तरी खास बाब म्हणून हा प्रकल्प राज्यपालांच्या कार्यक्षेत्रातून बाहेर आणण्यासाठी त्यांना विश्वासात घेणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. हा प्रकल्प तातडीने मार्गी लावण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू करण्यात आले असून, निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असे ते म्हणाले.