शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
3
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
4
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
5
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
6
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
7
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
8
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
9
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
10
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
11
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
12
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
13
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
14
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
15
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
16
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
17
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
18
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
19
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
20
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!

वसना, माणगंगासाठी आराखडा तयार

By admin | Updated: May 25, 2015 00:32 IST

मुख्यमंत्री : कायम दुष्काळी भाग ‘बागायती’ करणार

सातारा : जिल्ह्यातील वसना आणि माणगंगा या दोन नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी आराखडा तयार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ही योजना तसेच जिहे-कटापूर योजना पूर्ण करण्याचा विडा राज्य शासनाने उचलला असून, कायम दुष्काळी भाग ‘बागायती’ म्हणून नावारूपाला आणण्याचा आमचा संकल्प आहे, असे त्यांनी सांगितले.वसना आणि माणगंगा नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी अनुक्रमे १३ आणि १७ नवीन बंधाऱ्यांचा प्रस्ताव असून, या नद्यांवरील कोल्हापूर पद्धतीचे सर्व बंधारे दुरुस्त करण्यात येणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. ‘मोठ्या सिंचन योजनांऐवजी स्थानिक पातळीवर छोटे जलसाठे तयार करण्याचा पर्याय शासनाने निवडला असून, जिल्ह्यात जलयुक्त शिवार ही लोकचळवळ होताना दिसते आहे. मोहिमेतील सर्व योजना सुरू होण्यापूर्वी, काम सुरू असताना आणि नंतर अशी तीन छायाचित्रे उपग्रहावरून घेतली जाणार आहेत. तसेच त्रयस्थ संस्थेकडून कामांचे मूल्यमापन करण्यात येणार असल्यामुळे भ्रष्टाचाराचा प्रश्नच उद््भवणार नाही,’ असे फडणवीस यांनी सांगितले. ‘जलयुक्त शिवार’च्या जिल्ह्यातील टीमने उत्कृष्ट काम केले असून, टंचाईमुक्तीचा शाश्वत मार्ग दृष्टिपथात आला असल्याचे ते म्हणाले. जिल्हा रुग्णालयाच्या दुरवस्थेसंदर्भात विचारले असता, त्यासंदर्भात आरोग्यमंत्र्यांशी चर्चा करून सर्व अडचणी दूर करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. (प्रतिनिधी)‘लवासा’ला जमीन; कॉलेजला का नाही?कृष्णा खोरे विकास महामंडळाची जमीन ‘लवासा’ला दिली गेली; पण सातारच्या वैद्यकशास्त्र महाविद्यालयाला जमीन देताना अनेक अटी महामंडळाने घातल्या. महाविद्यालयाच्या उभारणीतील हा प्रमुख अडथळा दूर करून आम्ही तातडीने जमीन मिळवू आणि काम सुरू करू, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले.‘जिहे-कटापूर’ पूर्ण करणारचदुष्काळी भागाचे चित्र पालटण्याची ताकद असणारा जिहे-कटापूर प्रकल्प पूर्ण करणे राज्यपालांच्या अखत्यारीत येत असले, तरी खास बाब म्हणून हा प्रकल्प राज्यपालांच्या कार्यक्षेत्रातून बाहेर आणण्यासाठी त्यांना विश्वासात घेणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. हा प्रकल्प तातडीने मार्गी लावण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू करण्यात आले असून, निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असे ते म्हणाले.