शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
3
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
4
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
5
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
6
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
7
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
8
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
9
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
10
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
11
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
12
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
13
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
14
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
15
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
16
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
17
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
18
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
19
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
20
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले

‘सर्व ४८ मतदारसंघात लोकसभेची तयारी’

By admin | Updated: April 26, 2017 02:32 IST

२०१९ मधील लोकसभेची निवडणूक महाराष्ट्रात भाजपाला स्वबळावर लढायची आहे या दृष्टीनेच आगामी काळात लक्ष केंद्रित केले जाईल, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांनी आज सांगितले.

मुंबई : २०१९ मधील लोकसभेची निवडणूक महाराष्ट्रात भाजपाला स्वबळावर लढायची आहे या दृष्टीनेच आगामी काळात लक्ष केंद्रित केले जाईल, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांनी आज सांगितले. २०१९ मधील लोकसभेची निवडणूक नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात लढण्याचा निर्णय एनडीएच्या दिल्लीतील बैठकीत घेण्यात आला होता. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्या बैठकीला उपस्थित होते. त्यामुळे २०१९ ची निवडणूक भाजपा-शिवसेना एकत्रित लढणार असल्याचे चित्र निर्माण केले जात असतानाच त्याला फाटा देत दानवे यांनी लोकसभेसाठीही ‘शत प्रतिशत भाजपा’ची भूमिका लोकमतशी बोलताना मांडली. ते म्हणाले की भाजपा-शिवसेना युतीचा निर्णय उद्या कदाचित होईलही पण तो होणारच आहे असे समजून सध्या शिवसेनेकडे असलेल्या मतदारसंघांमध्ये भाजपाचा विस्तारच करू नये हे शक्य नाही. तशी चर्चादेखील पक्षामध्ये झालेली नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे किमान २५ आमदार भाजपाच्या संपर्कात असल्याचा दावा खा. दानवे यांनी केला. दुसरे पक्ष फोडण्यात आम्हाला रस नाही पण ते होऊन येणार असतील तर आम्ही दारे का बंद करायची, असा सवाल त्यांनी केला. (प्रतिनिधी)