शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

अ‍ॅट्रॉसिटीबद्दल सर्वांशीच चर्चेची तयारी - मुख्यमंत्री

By admin | Updated: September 17, 2016 02:48 IST

अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर टाळण्यासंदर्भात मराठा समाजाच्या मोर्चेकऱ्यांचे नेते, दलित समाजाच्या नेत्यांसह विविध राजकीय पक्षांशी चर्चेची तयारी आहे.

मुंबई : अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर टाळण्यासंदर्भात मराठा समाजाच्या मोर्चेकऱ्यांचे नेते, दलित समाजाच्या नेत्यांसह विविध राजकीय पक्षांशी चर्चेची तयारी आहे. आपल्यासमोरील सामाजिक प्रश्न महाराष्ट्राने आजवर स्वत: सोडवले आहेत. तेच याबाबतीत देखील घडावे, अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. ‘सह्याद्री’ वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, अ‍ॅट्रॉसिटीचा काही ठिकाणी गैरवापर झाला. त्यामुळेही मराठा समाजामध्ये आक्रोश आहे. तर गटागटाच्या राजकारणात त्याचा गैरवापर झाला. या कायद्याचा गैरवापर व्हावा, असे दलित नेतेदेखील म्हणणार नाहीत. असा गैरवापर होऊ नये यासाठी काय-काय करता येईल, यासंदर्भात सर्वांनी एकत्रित बसून चर्चेने प्रश्न सोडवावेत, ही माझी भूमिका आहे.

मराठा समाजाचे मोर्चे हे विशिष्ट जातीविरुद्ध नाहीत. त्यांना प्रतिमोर्चाने आव्हान देण्याची भूमिका कोणीही घेऊ नये, अशी माझी विनंती आहे. अशाने राज्याचे भले होणार नाही. दलित समाजाला संरक्षण राहणारच याबाबत कुठलीही शंका असता कामा नये, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

मराठा समाजाचे आजचे मोर्चे हे विस्थापितांनी प्रस्थापितांविरुद्ध काढलेले मोर्चे आहेत. अनेक वर्षांचा समाजाचा आक्रोश त्याद्वारे व्यक्त होत आहे. हे मोर्चे सरकारविरुद्ध नाहीत. माझे सरकार तर दोन वर्षांपूर्वी आले. या समाजाच्या मागण्या अनेक वर्षांपासूनच्या आहेत. एकीकडे गावागावांत मोठ्या भावाच्या भूमिकेत असलेल्या या समाजाच्या समस्यांना हात घालण्यात आजवरच्या राज्यकर्त्यांना अपयश आले, असेही मुख्यमंत्री म्हणाले.मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजेमराठा समाजाला आरक्षण हे मिळालेच पाहिजे, ही माझ्या सरकारची ठाम भूूमिका आहे. ही मागणी सामाजिक आहे; राजकीय नाही. आधीच्या सरकारने या समाजाला दिलेले आरक्षण या सरकारने रद्द केले, हा विरोधकांचा प्रचार म्हणजे निव्वळ धूळफेक आहे. आधीच्या सरकारने आरक्षणाचा कायदा केलाच नव्हता. केवळ अध्यादेश काढला आणि तोदेखील लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर. आम्ही सत्तेत आल्यानंतर कायदा केला, पण तो न्यायालयात टिकला नाही. आरक्षण देताना सामाजिक मागासलेपणाचे पुरावे जोडले नाहीत, असे न्यायालयाने म्हटले होते. आता आमच्या सरकारने त्यासाठीचे अनेक पुरावे गोळा केले आहेत. मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे, यासाठी आम्ही नामवंत वकिलांची फौज उभी केली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.आरक्षण तर या समाजाला दिलेच पाहिजे पण त्याचवेळी खासगी क्षेत्रात या समाजातील तरुणाईला रोजगारक्षम करणे, खासगी शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती देणे या उपाययोजनाही आपले सरकार करेल, असे ते म्हणाले.