शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
2
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
3
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
4
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
5
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
6
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
7
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
8
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
9
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
10
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
12
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
13
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
14
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
15
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
16
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
17
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
18
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
19
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
20
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न

पाण्यासाठी महामोर्चाची तयारी

By admin | Updated: November 8, 2015 00:28 IST

मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी आणि अहमदनगर - नाशिक जिल्ह्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सुमारे ५० हजार शेतकरी, नागरिक आणि सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा मोर्चा काढण्याबाबत

औरंगाबाद : मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी आणि अहमदनगर - नाशिक जिल्ह्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सुमारे ५० हजार शेतकरी, नागरिक आणि सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा मोर्चा काढण्याबाबत शनिवारी येथे सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या बैठकीत चर्चा झाली. मराठवाडा जनता विकास परिषदेतर्फे आयोजित बैठकीला माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. आ. अब्दुल सत्तार, आ. अर्जुन खोतकर, आ. संजय शिरसाट, आ. सुभाष झांबड, आ. अतुल सावे, आ. प्रशांत बंब, माजी आ. कल्याण काळे, माजी खा. व्यंकटेश काब्दे आदी उपस्थित होते. बैठकीचे संयोजक तथा परिषदेचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रदीप देशमुख आणि आ. शिरसाट यांनी मोर्चा काढण्याबाबतचा विषय उपस्थित केला. इतरांनीही त्याला दुजोरा दिला.अशोक चव्हाण म्हणाले की, ‘पाण्याचा विषय हा कोणत्या एका पक्षाचा नाही. एकत्रितरीत्या हा प्रश्न सोडविला पाहिजे.’ पंकजा मुंडे म्हणाल्या की, ‘हक्काचे पाणी वेळेत मिळाले पाहिजे. योग्य निर्णय योग्य वेळी झाला पाहिजे, अशी अपेक्षा आहे.’ (प्रतिनिधी)भाजपा आमदार मुख्यमंत्र्यांना भेटलेगंगापूर व दारणा धरण समूहातून पाणी सोडल्याप्रकरणी नाशिकचे भाजपा आमदार बाळासाहेब सानप आणि सीमा हिरे यांनी शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. प्राधिकरणाने घेतलेला निर्णय चुकीचा असून, त्याच्या चौकशीची मागणी त्यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी समिती नेमण्याचे आश्वासन दिले. नाशिक महापालिकेत ‘संतप्तधार’नाशिकमध्ये सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाणीप्रश्नी महापालिकेने तातडीने बोलाविलेल्या विशेष महासभेत पालकमंत्र्यांसह स्थानिक भाजपा आमदार आणि राज्य सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. तब्बल साडेपाच तास चाललेल्या चर्चेत सरकारविरोधी ‘संतप्तधार’ बरसली. उच्च न्यायालयात महापालिकेमार्फत फेरयाचिका दाखल करण्याचा ठराव करण्यात आला.