शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे सुपुत्र, बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
2
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
3
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
4
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर? कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
5
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
6
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
7
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
8
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
9
भारत-पाकिस्तान तणावामुळे आलिया भटने घेतला हा मोठा निर्णय, वाचून कराल तिचं कौतुक
10
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
11
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
12
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
13
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
14
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
15
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
16
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
17
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
18
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
19
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
20
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश

पाण्यासाठी महामोर्चाची तयारी

By admin | Updated: November 8, 2015 00:28 IST

मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी आणि अहमदनगर - नाशिक जिल्ह्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सुमारे ५० हजार शेतकरी, नागरिक आणि सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा मोर्चा काढण्याबाबत

औरंगाबाद : मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी आणि अहमदनगर - नाशिक जिल्ह्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सुमारे ५० हजार शेतकरी, नागरिक आणि सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा मोर्चा काढण्याबाबत शनिवारी येथे सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या बैठकीत चर्चा झाली. मराठवाडा जनता विकास परिषदेतर्फे आयोजित बैठकीला माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. आ. अब्दुल सत्तार, आ. अर्जुन खोतकर, आ. संजय शिरसाट, आ. सुभाष झांबड, आ. अतुल सावे, आ. प्रशांत बंब, माजी आ. कल्याण काळे, माजी खा. व्यंकटेश काब्दे आदी उपस्थित होते. बैठकीचे संयोजक तथा परिषदेचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रदीप देशमुख आणि आ. शिरसाट यांनी मोर्चा काढण्याबाबतचा विषय उपस्थित केला. इतरांनीही त्याला दुजोरा दिला.अशोक चव्हाण म्हणाले की, ‘पाण्याचा विषय हा कोणत्या एका पक्षाचा नाही. एकत्रितरीत्या हा प्रश्न सोडविला पाहिजे.’ पंकजा मुंडे म्हणाल्या की, ‘हक्काचे पाणी वेळेत मिळाले पाहिजे. योग्य निर्णय योग्य वेळी झाला पाहिजे, अशी अपेक्षा आहे.’ (प्रतिनिधी)भाजपा आमदार मुख्यमंत्र्यांना भेटलेगंगापूर व दारणा धरण समूहातून पाणी सोडल्याप्रकरणी नाशिकचे भाजपा आमदार बाळासाहेब सानप आणि सीमा हिरे यांनी शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. प्राधिकरणाने घेतलेला निर्णय चुकीचा असून, त्याच्या चौकशीची मागणी त्यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी समिती नेमण्याचे आश्वासन दिले. नाशिक महापालिकेत ‘संतप्तधार’नाशिकमध्ये सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाणीप्रश्नी महापालिकेने तातडीने बोलाविलेल्या विशेष महासभेत पालकमंत्र्यांसह स्थानिक भाजपा आमदार आणि राज्य सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. तब्बल साडेपाच तास चाललेल्या चर्चेत सरकारविरोधी ‘संतप्तधार’ बरसली. उच्च न्यायालयात महापालिकेमार्फत फेरयाचिका दाखल करण्याचा ठराव करण्यात आला.