शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
3
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
4
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
5
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
6
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
7
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
8
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
9
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
10
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
11
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
12
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
13
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
14
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
15
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
16
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
17
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
18
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
19
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई

पाण्यासाठी महामोर्चाची तयारी

By admin | Updated: November 8, 2015 00:28 IST

मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी आणि अहमदनगर - नाशिक जिल्ह्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सुमारे ५० हजार शेतकरी, नागरिक आणि सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा मोर्चा काढण्याबाबत

औरंगाबाद : मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी आणि अहमदनगर - नाशिक जिल्ह्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सुमारे ५० हजार शेतकरी, नागरिक आणि सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा मोर्चा काढण्याबाबत शनिवारी येथे सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या बैठकीत चर्चा झाली. मराठवाडा जनता विकास परिषदेतर्फे आयोजित बैठकीला माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. आ. अब्दुल सत्तार, आ. अर्जुन खोतकर, आ. संजय शिरसाट, आ. सुभाष झांबड, आ. अतुल सावे, आ. प्रशांत बंब, माजी आ. कल्याण काळे, माजी खा. व्यंकटेश काब्दे आदी उपस्थित होते. बैठकीचे संयोजक तथा परिषदेचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रदीप देशमुख आणि आ. शिरसाट यांनी मोर्चा काढण्याबाबतचा विषय उपस्थित केला. इतरांनीही त्याला दुजोरा दिला.अशोक चव्हाण म्हणाले की, ‘पाण्याचा विषय हा कोणत्या एका पक्षाचा नाही. एकत्रितरीत्या हा प्रश्न सोडविला पाहिजे.’ पंकजा मुंडे म्हणाल्या की, ‘हक्काचे पाणी वेळेत मिळाले पाहिजे. योग्य निर्णय योग्य वेळी झाला पाहिजे, अशी अपेक्षा आहे.’ (प्रतिनिधी)भाजपा आमदार मुख्यमंत्र्यांना भेटलेगंगापूर व दारणा धरण समूहातून पाणी सोडल्याप्रकरणी नाशिकचे भाजपा आमदार बाळासाहेब सानप आणि सीमा हिरे यांनी शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. प्राधिकरणाने घेतलेला निर्णय चुकीचा असून, त्याच्या चौकशीची मागणी त्यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी समिती नेमण्याचे आश्वासन दिले. नाशिक महापालिकेत ‘संतप्तधार’नाशिकमध्ये सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाणीप्रश्नी महापालिकेने तातडीने बोलाविलेल्या विशेष महासभेत पालकमंत्र्यांसह स्थानिक भाजपा आमदार आणि राज्य सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. तब्बल साडेपाच तास चाललेल्या चर्चेत सरकारविरोधी ‘संतप्तधार’ बरसली. उच्च न्यायालयात महापालिकेमार्फत फेरयाचिका दाखल करण्याचा ठराव करण्यात आला.