शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
3
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
4
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
5
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
6
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
8
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
9
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
10
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
11
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
12
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
13
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
14
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
15
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
16
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
17
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
18
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
19
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
20
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल

साहित्य जल्लोषची जय्यत तयारी

By admin | Updated: November 19, 2016 03:33 IST

वसई नगरीत उद्या रविवारी एकदिवसीय साहित्य जल्लोष प्रतिष्ठान आयोजित साहित्य संमेलनाची जोरदार तयारी सुरू आहे.

वसई : ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा असलेल्या वसई नगरीत उद्या रविवारी एकदिवसीय साहित्य जल्लोष प्रतिष्ठान आयोजित साहित्य संमेलनाची जोरदार तयारी सुरू आहे. वसई विरार महानगरपालिका, ग्रंथालय विभाग व साहित्य जल्लोष प्रतिष्ठानने हे १७ वे संमेलन आयोजित केले आहे.रविवारी सकाळी ग्रंथदिंडी, उद्घाटन सोहळा, परिसंवाद, कवीसंमेलन, महाराष्ट्र महोत्सव हा पोवाडा, गोंधळ, शाहिरी व भारूडाचा सांस्कृतिक कार्यक्रम अशी भरगच्च संमेलनाची कार्यक्रम पत्रिका बनली आहे. वसईतील नवे-जुने लेखक, कवी, साहित्यिक, प्रकाशक, विद्यार्थी, प्राध्यापक, लोकप्रतिनिधी, प्राचार्य असे सर्वच प्रथित यश या संमेलनासाठी झटत आहेत. वसई पारनाका येथून सकाळी ९ वाजता ग्रंथदिंडी निघणार आहे. त्यात मराठी भाषेचा जागर होणार आहे.फलक, घोषणा, विविध वेशभूषा हे ग्रंथदिंडीचे वैशिष्ट्य असणार आहे. पालखीत विविध धर्माचे ग्रंथ असणार आहेत. या संमेलनात ज्येष्ठ नाटककार व पत्रकार जयंत पवार, माजी न्यायमूर्ती सी.एस.थूळ, लेखक सुभाष देशमुख, कादंबरीकार रमेश इंगळे उत्रादकर, अभिराम भडकमकर, प्रगती बाणखेले, डॉ. महेश केळुस्कर, साहेबराव ठाणगे, महापौर प्रविणा ठाकूर आदी मान्यवर उपस्थित असणार आहेत. त्याशिवाय पालघर जिल्ह्यातील नवे-जुने लेखक, कवी यांचाही सहभाग मोठा असणार आहे. (प्रतिनिधी) >सर्वदूरचे साहित्य रसिक लावणार हजेरीवसई पारनाका येथील अनंतराव ठाकूर नाट्यगृहात दिवसभर चालणाऱ्या या संमेलनासाठी शाळा, महाविद्यालयांचे विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक हे मोठ्या संख्येने हजेरी लावणार आहेत. त्याशिवाय सर्वदूरचे साहित्य रसिक यांची उपस्थिती असणार आहे. पालिकेच्या परिवहन सेवेतर्फे विरार, नालासोपारा, अर्नाळा, वसई येथून रसिकांना संमेलन स्थळी येण्यासाठी खास बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. साहित्य जल्लोषचे अध्यक्ष प्रा. कोडोलिकर, अ‍ॅण्ड्र्यू कोलासो, सचिव अशोक मुळे, संदेश जाधव, प्रकाश वनमाळी, अजीव पाटील आदी मान्यवर परिश्रम घेत आहेत.