शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
3
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
4
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
5
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
6
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
7
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
8
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
9
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
10
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
11
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
12
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
13
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
14
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
15
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
16
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
17
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
18
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
19
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
20
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना

साहित्य जल्लोषची जय्यत तयारी

By admin | Updated: November 19, 2016 03:33 IST

वसई नगरीत उद्या रविवारी एकदिवसीय साहित्य जल्लोष प्रतिष्ठान आयोजित साहित्य संमेलनाची जोरदार तयारी सुरू आहे.

वसई : ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा असलेल्या वसई नगरीत उद्या रविवारी एकदिवसीय साहित्य जल्लोष प्रतिष्ठान आयोजित साहित्य संमेलनाची जोरदार तयारी सुरू आहे. वसई विरार महानगरपालिका, ग्रंथालय विभाग व साहित्य जल्लोष प्रतिष्ठानने हे १७ वे संमेलन आयोजित केले आहे.रविवारी सकाळी ग्रंथदिंडी, उद्घाटन सोहळा, परिसंवाद, कवीसंमेलन, महाराष्ट्र महोत्सव हा पोवाडा, गोंधळ, शाहिरी व भारूडाचा सांस्कृतिक कार्यक्रम अशी भरगच्च संमेलनाची कार्यक्रम पत्रिका बनली आहे. वसईतील नवे-जुने लेखक, कवी, साहित्यिक, प्रकाशक, विद्यार्थी, प्राध्यापक, लोकप्रतिनिधी, प्राचार्य असे सर्वच प्रथित यश या संमेलनासाठी झटत आहेत. वसई पारनाका येथून सकाळी ९ वाजता ग्रंथदिंडी निघणार आहे. त्यात मराठी भाषेचा जागर होणार आहे.फलक, घोषणा, विविध वेशभूषा हे ग्रंथदिंडीचे वैशिष्ट्य असणार आहे. पालखीत विविध धर्माचे ग्रंथ असणार आहेत. या संमेलनात ज्येष्ठ नाटककार व पत्रकार जयंत पवार, माजी न्यायमूर्ती सी.एस.थूळ, लेखक सुभाष देशमुख, कादंबरीकार रमेश इंगळे उत्रादकर, अभिराम भडकमकर, प्रगती बाणखेले, डॉ. महेश केळुस्कर, साहेबराव ठाणगे, महापौर प्रविणा ठाकूर आदी मान्यवर उपस्थित असणार आहेत. त्याशिवाय पालघर जिल्ह्यातील नवे-जुने लेखक, कवी यांचाही सहभाग मोठा असणार आहे. (प्रतिनिधी) >सर्वदूरचे साहित्य रसिक लावणार हजेरीवसई पारनाका येथील अनंतराव ठाकूर नाट्यगृहात दिवसभर चालणाऱ्या या संमेलनासाठी शाळा, महाविद्यालयांचे विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक हे मोठ्या संख्येने हजेरी लावणार आहेत. त्याशिवाय सर्वदूरचे साहित्य रसिक यांची उपस्थिती असणार आहे. पालिकेच्या परिवहन सेवेतर्फे विरार, नालासोपारा, अर्नाळा, वसई येथून रसिकांना संमेलन स्थळी येण्यासाठी खास बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. साहित्य जल्लोषचे अध्यक्ष प्रा. कोडोलिकर, अ‍ॅण्ड्र्यू कोलासो, सचिव अशोक मुळे, संदेश जाधव, प्रकाश वनमाळी, अजीव पाटील आदी मान्यवर परिश्रम घेत आहेत.