शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

चाकरमान्यांची ‘प्रीमियम’ लूट

By admin | Updated: August 26, 2014 04:16 IST

गणेशोत्सवासाठी कोकणात लाखोंच्या संख्येने जाणाऱ्या सर्वसामान्य चाकरमान्यांना एसटी आणि खाजगी वाहतूक सेवांपेक्षा स्वस्त आणि जलद सेवा असलेल्या रेल्वेचा खूप मोठा आधार वाटतो

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात लाखोंच्या संख्येने जाणाऱ्या सर्वसामान्य चाकरमान्यांना एसटी आणि खाजगी वाहतूक सेवांपेक्षा स्वस्त आणि जलद सेवा असलेल्या रेल्वेचा खूप मोठा आधार वाटतो. म्हणूनच विशेष ट्रेनची संख्या गणेशोत्सवकाळात वाढवण्यात यावी, अशी मागणी वारंवार केली जाते आणि त्याप्रमाणे मध्य, पश्चिम आणि कोकण रेल्वेकडून सोयही करण्यात येते. मात्र यंदा जादा आणि विशेष ट्रेनच्या नावाखाली रेल्वेकडून ४६ ‘प्रिमियम’ (अधिमूल्य, चढाभाव) ट्रेनही चालवण्यात आल्या असून या ट्रेनच्या तिकिट सेवेतून मोठी लूट चालवण्यात येत आहे. या प्रिमियम ट्रेनचे अवाढव्य वाढत जाणाऱ्या भाड्यामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांनी त्याकडे पाठ फिरवली आहे. गणेशोत्सवकाळात रेल्वेचे तिकिट मिळवताना बरीच मारामार करावी लागत असल्याने अनेक जण एसटीचा पर्याय निवडतात आणि त्यामुळे या काळात एसटी हाऊसफुल्ल होऊन जातात. तरीही काहीजण रेल्वेला गर्दी असतानाही तिकिटांच्या किंमतीकडे पाहून उभ्यानेही प्रवास करणे पसंत करतात. एकूणच प्रत्येक वर्षी वाढत जाणारी गर्दी पाहता रेल्वेकडून यंदा जादा आणि विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला. मागील वर्षी साधारण १२0 विशेष गाड्या सोडण्यात आल्या होत्या. यंदा १९८ विशेष ट्रेन सोडण्यात आल्या असून यात ४६ ट्रेन एसी प्रिमियम ट्रेन सोडण्यात आल्या आहेत. मात्र प्रिमियम ट्रेनचे तिकिट वाढत्या मागणीनुसार वाढत जात असल्याने एका तिकिटांची किंमत ही एक हजार रुपयांपासून ते चार हजार रुपये आणि त्याही पुढे जात आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांना हे तिकिट परवडणारे नसल्याने अनेक जणांनी या ट्रेनकडे पाठ फिरवली आहे. मुळात या काळात प्रवाशांची गर्दी आटोक्यात राहावी आणि त्यांचा प्रवास सुकर व्हावा यानिमित्ताने जादा आणि विशेष गाड्या सोडण्याऐवजी अशा न परवडणाऱ्या ४६ प्रिमियम ट्रेन सोडून रेल्वेने नेमके काय साध्य केले असा प्रश्न चाकरमान्यांना सतावू लागला आहे. याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांकडून मात्र कुठलेही ठोस असे उत्तरही देण्यात येत नसल्याचे दिसून आले. (प्रतिनिधी)