शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
2
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
3
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
4
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
5
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
6
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
7
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
8
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
9
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
10
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
11
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
12
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
13
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
14
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
15
आम्हाला तोंड उघडण्यास भाग पाडू नका; ईडी.. तुमचा राजकीय वापर का हाेतोय?
16
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
17
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
18
मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्र्यातील नव्या इमारतीसाठी जमीन ताब्यात!
19
शाळकरी मुलीच्या गळ्याला लावला चाकू; पंधरा मिनिटांच्या थरारानंतर मुलीची सुटका
20
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा

भोंदूच्या उपचारांमुळे गर्भवतीचा मृत्यू

By admin | Updated: June 9, 2016 05:53 IST

राज्यात जादुटोणाविरोधी विधेयक पारित होऊनही, अंधश्रद्धेमुळे जाणारे बळी पूर्णपणे रोखण्यात शासन आणि समाजाला अद्यापही यश आलेले नाही

गडचिरोली : राज्यात जादुटोणाविरोधी विधेयक पारित होऊनही, अंधश्रद्धेमुळे जाणारे बळी पूर्णपणे रोखण्यात शासन आणि समाजाला अद्यापही यश आलेले नाही. एटापल्ली तालुक्यातील दुर्गम भाग असलेल्या बुर्गी येथील मीना संतोष हिचामी या २० वर्षीय गर्भवती महिलेचाही सोमवारी अंधश्रद्धेने बळी घेतला आहे. काविळीच्या आजारावर ती गेले १५ दिवस तुमरगुंडा येथील भोंदू पुजाऱ्याकडे उपचार घेत होती.१८ मे रोजी पोटात दुखत असल्याने मीनाने बुर्गी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारही घेतले होते. त्यानंतर तिला एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात आणि उपजिल्हा रुग्णालय अहेरी येथे हलविण्यात आले. तेथे १८ ते २४ मे या कालावधीत उपचार करून तिला सुटी देण्यात आली होती, अशी माहिती मीना पती संतोष याने दिली. मीनाला कावीळ, सिकलसेलचा आजार असल्याने अहेरी उपजिल्हा रुग्णालयातून सुटी मिळाल्यावर २४ मे पासून तिला येमली येथील पुजाऱ्याकडे ठेवण्यात आले होते. ५ जूनला रात्री मीनाची तब्येत झपाट्याने खालावली व तिला तुमरगुंडा गावात माहेरी आणण्यात आले. तुमरगुंडा येथे आणून त्या रात्री तुमरगुंडा गावातील पुजाऱ्याकडे तिच्यावर पुन्हा उपचार सुरू झाले. (प्रतिनिधी)>अंगणवाडी सेविकेचे दुर्लक्षबुर्गी प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांतर्गत गर्भवती मातांना पोषण आहार पुरविण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविकेकडे आहे व आरोग्य तपासणीचीही जबाबदारी अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांच्याकडे आहे. परंतु तब्बल १५ दिवस पुजाऱ्याकडे या महिलेवर उपचार सुरू असताना आरोग्य यंत्रणेच्या या कर्मचाऱ्यांना ही माहिती कशी मिळाली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.मीना हिचामी या महिलेचा मृत्यू आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे झालेला नाही. या महिलेने पुजाऱ्याकडे उपचार केल्यामुळे तिचा मृत्यू झाला. तिला काविळ व सिकलसेल आजार होता. असे मृत्यू टाळण्यासाठी कोणत्याही रुग्णांनी पुजाऱ्यांकडे उपचार घेऊ नये.- डॉ. पवन राऊत, प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी, एटापल्ली.